शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
2
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
3
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
4
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
5
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
6
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
7
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
8
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
9
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
10
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
11
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
12
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
13
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
14
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
15
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
16
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
17
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
18
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
19
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
20
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती

निविदांवर कंत्राटदारांचा बहिष्कार कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 00:28 IST

जीएसटीसह अन्य प्रश्नांवर कोणत्याही प्रकारचा तोडगा राज्य सरकार काढण्यास तयार नसल्याने व मागण्या पूर्ण होत नसल्याने सर्व शासकीय-निमशासकीय निविदांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय कायम ठेवण्याचा राज्यातील सरकारी कंत्राटदारांच्या विविध संघटनांच्या बैठकीत घेण्यात आला आहे. त्यामुळे राज्यात पडलेले खड्डे तसेच अन्य कामे रखडणार असून, त्यांचा फटका नागरिकांना बसणार आहे.

नाशिक : जीएसटीसह अन्य प्रश्नांवर कोणत्याही प्रकारचा तोडगा राज्य सरकार काढण्यास तयार नसल्याने व मागण्या पूर्ण होत नसल्याने सर्व शासकीय-निमशासकीय निविदांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय कायम ठेवण्याचा राज्यातील सरकारी कंत्राटदारांच्या विविध संघटनांच्या बैठकीत घेण्यात आला आहे. त्यामुळे राज्यात पडलेले खड्डे तसेच अन्य कामे रखडणार असून, त्यांचा फटका नागरिकांना बसणार आहे. केंद्र सरकारने जीएसटी लागू केल्यानंतर पूर्वलक्षी प्रभावाने हा कर लागू करण्यात आल्याने ठेकेदारांना मोठा भुर्दंड सोसावा लागणार आहे. त्यामुळे राज्य सरकारने त्याची भरपाई द्यावी, अशी सरकारी कंत्राटदारांची मागणी आहे. तसेच राज्य सरकारने घेतलेल्या अन्य निर्णयांच्या संदर्भात बिल्डर्स असोसिएशन आॅफ इंडियाचे राज्यातील सर्व पदाधिकारी, रोड हॉटमिक्स प्लॅँट तसेच सुशिक्षित बेरोजगार व मजूर संघांचे जिल्हानिहाय पदाधिकारी उपस्थित होते. अविनाश पाटील, गोपाळ अटल, विठ्ठल वाजे, मजूर संस्थांचे संचालक विठ्ठल वाजे, सुशिक्षित बेरोजगार अभियंता संघटनेचे कोषाध्यक्ष विनायक माळेकर, सदस्य अजित सकाळे, रामनाथ कुटे, ज्ञानेश्वर महाजन यांच्यासह संपूर्ण राज्यातून आलेले प्रतिनिधी उपस्थित होते.  राज्यातील कामांना पूर्वी व्हॅट इस्टिमेटवर आधारित होते, आता मात्र झालेल्या कामांवर जीएसटी लागू करण्यात आला आहे. त्यामुळे राज्य सरकारने भरपाई द्यावी, या मागणीवर कोणताही निर्णय घेतलेला नाही. प्राइस व्हेरिएशन कॉज रद्द न केल्याने भाववाढीचादेखील मोठा भुर्दंड सहन करावा लागणार आहे. याशिवाय सार्वजनिक बांधकाम विभागाकडे नोंदणीची पद्धत पूर्वीप्रमाणेच कायम ठेवावी ही मागणीदेखील मान्य करण्यात आलेली नाही.  केवळ १९ सप्टेंबर रोजी काढलेल्या नव्या निर्णयात महाराष्टÑ दरसूचित सुधारणा करण्यात आली आहे. राज्य सरकार कोणतीही मागणी मान्य करीत नसल्याने राज्यभरात सुरू असलेला बहिष्कार कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.