शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
3
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
4
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
5
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
6
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
7
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
8
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
9
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
10
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
11
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
12
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
13
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
14
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
15
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
16
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
17
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
18
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
19
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
20
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत

दहा वर्षांची ‘मौनी’ भूमिका बनकरांना भोवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2019 00:53 IST

नाशिक : शेतकरी व जनतेच्या प्रश्नांवर गेल्या दहा वर्षांत विरोधी पक्षाचे माजी आमदार म्हणून दिलीप बनकर यांनी घेतलेली सोईस्कर मौनी भूमिकाच त्यांना यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मारक ठरण्याची चिन्हे असून, शेतकरीहित व जनआंदोलनाच्या घोषणा फोल ठरल्याने मतदारांसमोर मते मागण्यासाठी जाताना बनकरांना या प्रश्नांवर मतदारच जाब विचारण्याच्या मानसिकतेत आहेत.

ठळक मुद्देशेतकरीहित वाऱ्यावर : जनआंदोलनाच्या वेळी कुठे गेले होते, असा सवाल

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : शेतकरी व जनतेच्या प्रश्नांवर गेल्या दहा वर्षांत विरोधी पक्षाचे माजी आमदार म्हणून दिलीप बनकर यांनी घेतलेली सोईस्कर मौनी भूमिकाच त्यांना यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मारक ठरण्याची चिन्हे असून, शेतकरीहित व जनआंदोलनाच्या घोषणा फोल ठरल्याने मतदारांसमोर मते मागण्यासाठी जाताना बनकरांना या प्रश्नांवर मतदारच जाब विचारण्याच्या मानसिकतेत आहेत.विधानसभा निवडणुकीत आजी- माजी आमदारांनी जनसामान्यांच्या प्रश्नावर घेतलेल्या भूमिकेचा विचार करून मतदार गेल्या काही वर्षांतील हिशेब मतदानातून चुकता करतात. त्यामुळे यंदा निफाड विधानसभा मतदारसंघात विरोधी पक्षाचे उमेदवार म्हणून दिलीप बनकरांनी गेल्या दहा वर्षांत जनसामान्यांच्या प्रश्नावर घेतलेल्या सोईस्कर भूमिकांना उजाळा देण्यात येत आहे. मतदारसंघातील गावोगावच्या प्रश्नांवर बनकर यांनी साधलेल्या सोईस्कर मौनाचीदेखील चर्चा होऊ लागली आहे.विरोधी पक्षाची भूमिका निभावण्यात बनकर पूर्णत: अपयशी ठरले असून, ज्या शेतकऱ्यांचे प्रतिनिधित्व ते करू इच्छितात त्या शेतकºयांच्या प्रश्नावरदेखील त्यांची भूमिका सोयीची ठरली आहे. कांदा व द्राक्ष उत्पादक म्हणून ओळखल्या जाणाºया निफाड तालुक्यातील शेतकºयांचे कंबरडे मोडण्याचा निर्णय अनेकवार सत्ताधाºयांनी घेतल्याचे दिसून आले. त्यावेळी अन्य स्वाभिमानी शेतकरी संघटनांसारख्यांनी आंदोलने केली; पण त्याकडे डोळेझाक केल्याचे बोलले जात आहे. त्यांच्याच पक्षातर्फे मतदारसंघातील लासलगाव, विंचूरलाच काय पिंपळगावनजीक, चांदवडला केल्या गेलेल्या आंदोलनांकडेही बनकर फिरकले नव्हते, असे पक्षाचे कार्यकर्तेच बोलून दाखवित आहेत. त्यामुळे निवडणूक आल्यावरच दारात येणाºयाला कसे पाठबळ द्यायचे, असा त्यांचा प्रश्न आहे.कांद्याच्या निर्यातबंदीचा विषय असो वा कांदा साठवणूक, या दोन्ही प्रश्नांनी कांदा उत्पादक शेतकरी व व्यापारी त्रस्त असताना बनकर यांनी बाजार समितीचे सभापती म्हणून सरकारच्या विरोधात कोणतीही ठोस भूमिका घेतली नाही.सरकारला सदरचा निर्णय मागे घेण्यास भाग पाडण्यासाठी शेतकरी उत्सुक असताना बनकर यांनी बाजार समित्या बंद करण्याचा निव्वळ इशारा देऊन आपली तलवार म्यान केली. त्यामुळे अशा ‘मौनी’भूमिका घेणाºयांना निवडणुकीत मते मागण्याचा अधिकार आहे काय, असा प्रश्न आता मतदारच विचारताना दिसत आहेत.रस्त्याची अक्षरश: चाळणीनाशिक-औरंगाबाद या राष्टÑीय महामार्गावर नैताळे ते पिंपळस रामाचेदरम्यान गेल्या काही वर्षांत प्रचंड खड्डे पडून अपघातांची मालिका सुरू झाली असताना एकदाही बनकर यांनी विरोधी पक्षाचा नेता म्हणून ना जनआंदोलन छेडले ना सरकारला जाब विचारण्याची भूमिका घेतली. एवढेच नव्हे तर त्यांची कर्मभूमी म्हणून ओळखल्या जाणाºया पिंपळगाव बसवंत ते निफाड या रस्त्याची अक्षरश: चाळणी झाल्यामुळे वाहनचालक हैराण झाले आहेत. खुद्द बनकर यांनी या रस्त्याचा अनेकवेळा अनुभव घेतला असताना त्यांना या प्रश्नाचे गांभीर्य का कळू शकले नाही, असा प्रश्न या परिसरातील मतदार विचारू लागले आहेत.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019nifadनिफाड