शहरं
Join us  
Trending Stories
1
कष्टकऱ्यांचा आधारवड काेसळला: डाॅ. बाबा आढाव यांचे निधन, वयाच्या ९५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
वंचित, कष्टकऱ्यांसाठी लढणारा महान संघर्षयोद्धा हरपला; बाबा आढाव यांच्या निधनानंतर पवार-फडणवीसांकडून म्हणून श्रद्धांजली
3
"ठाकरे ब्रँड एकच होता, सध्या राज ठाकरेंचा वापर करून..."; CM देवेंद्र फडणवीसांचे रोखठोक मत
4
"असदुद्दीन ओवेसींचे पूर्वज हिंदू होते, ब्राह्मण कुटुंबात झाला होता जन्म" बृजभूषण शरण सिंह यांचा दावा 
5
IndiGoला मोठा दणका! CEO, COO, बड्या अधिकाऱ्यांना DGCA कडून समन्स, उद्या सकाळी चौकशी
6
“धर्मवीर ३ ची स्क्रिप्ट मलाच लिहावी लागेल, आनंद दिघे...”; एकनाथ शिंदेंनी सांगितले ‘राज’कारण
7
बाबरी मशिदीचे भूमिपूजन करणाऱ्या हुमायूं कबीर यांचा मोठा 'यू-टर्न'; आता काय म्हणाले?
8
1 रुपये 34 पैशांच्या शेअरची कमाल, ₹90 वर गेला भाव, खरेदीसाठी लोकांची झुंबड; आता कंपनीनं केली मोठी घोषणा!
9
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? युतीच्या चर्चांवर जयंत पाटलांकडून मौन; म्हणाले, "याचं उत्तर शोधणार नाही"
10
गोवा अग्निकांडाचे आरोपी इंडिगोच्या फ्लाईटने फुकेतला पसार; पोलीस पोहोचण्याआधीच काढला पळ
11
“...तर २०२९ मध्ये महायुतीच्या हातातून सत्ता जाऊ शकते, मराठे सोपे नाहीत”: मनोज जरांगे पाटील
12
जपानच्या उत्तर किनाऱ्यावर ७.२ रिश्टर स्केलचा तीव्र भूकंप; ३ मीटर उंचीच्या त्सुनामीचा इशारा
13
"कोण बसवणार आहे मला? काय बोलताय"; 'वंदे मातरम्'वर बोलत असताना राजनाथ सिंह प्रचंड भडकले
14
'क्वीन इज बॅक'..! कणखर मानसिकतेची 'रन'रागिणी! स्मृती मानधना पुन्हा मैदानात उतरण्याच्या तयारीत
15
“मंत्री येणार म्हणून फक्त देखावा नको, ३६५ दिवस प्रवाशांना सेवा द्या”: मंत्री प्रताप सरनाईक
16
लग्न करताच 'या' कपलला मिळतात 2.5 लाख रुपये, 90% लोकांना ही योजनाच माहीत नाही!
17
VIDEO: नववधूला सरप्राईज! शेजारी बसलेला नवरदेव अचानक उठला अन् सुरु केला भन्नाट डान्स
18
भाजपाच्या मित्रपक्षातील नेत्याचे बाबरी मशि‍दीला समर्थन; म्हणाले, “मुस्लीम समजाला अधिकार...”
19
"जेवढ्या दिवसांपासून मोदी PM आहेत, जवळपास तेवढे दिवस नेहरू जेलमध्ये होते"; 'वंदे मातरम'वरील चर्चेदरम्यान प्रियांका गांधींचा निशाणा
20
निवृत्तीसाठी कोणता फंड सर्वोत्तम? EPF, PPF की NPS? कोणासाठी कोणती योजना चांगली? वाचा तज्ज्ञांचा सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

दहा वर्षांची ‘मौनी’ भूमिका बनकरांना भोवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2019 00:53 IST

नाशिक : शेतकरी व जनतेच्या प्रश्नांवर गेल्या दहा वर्षांत विरोधी पक्षाचे माजी आमदार म्हणून दिलीप बनकर यांनी घेतलेली सोईस्कर मौनी भूमिकाच त्यांना यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मारक ठरण्याची चिन्हे असून, शेतकरीहित व जनआंदोलनाच्या घोषणा फोल ठरल्याने मतदारांसमोर मते मागण्यासाठी जाताना बनकरांना या प्रश्नांवर मतदारच जाब विचारण्याच्या मानसिकतेत आहेत.

ठळक मुद्देशेतकरीहित वाऱ्यावर : जनआंदोलनाच्या वेळी कुठे गेले होते, असा सवाल

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : शेतकरी व जनतेच्या प्रश्नांवर गेल्या दहा वर्षांत विरोधी पक्षाचे माजी आमदार म्हणून दिलीप बनकर यांनी घेतलेली सोईस्कर मौनी भूमिकाच त्यांना यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मारक ठरण्याची चिन्हे असून, शेतकरीहित व जनआंदोलनाच्या घोषणा फोल ठरल्याने मतदारांसमोर मते मागण्यासाठी जाताना बनकरांना या प्रश्नांवर मतदारच जाब विचारण्याच्या मानसिकतेत आहेत.विधानसभा निवडणुकीत आजी- माजी आमदारांनी जनसामान्यांच्या प्रश्नावर घेतलेल्या भूमिकेचा विचार करून मतदार गेल्या काही वर्षांतील हिशेब मतदानातून चुकता करतात. त्यामुळे यंदा निफाड विधानसभा मतदारसंघात विरोधी पक्षाचे उमेदवार म्हणून दिलीप बनकरांनी गेल्या दहा वर्षांत जनसामान्यांच्या प्रश्नावर घेतलेल्या सोईस्कर भूमिकांना उजाळा देण्यात येत आहे. मतदारसंघातील गावोगावच्या प्रश्नांवर बनकर यांनी साधलेल्या सोईस्कर मौनाचीदेखील चर्चा होऊ लागली आहे.विरोधी पक्षाची भूमिका निभावण्यात बनकर पूर्णत: अपयशी ठरले असून, ज्या शेतकऱ्यांचे प्रतिनिधित्व ते करू इच्छितात त्या शेतकºयांच्या प्रश्नावरदेखील त्यांची भूमिका सोयीची ठरली आहे. कांदा व द्राक्ष उत्पादक म्हणून ओळखल्या जाणाºया निफाड तालुक्यातील शेतकºयांचे कंबरडे मोडण्याचा निर्णय अनेकवार सत्ताधाºयांनी घेतल्याचे दिसून आले. त्यावेळी अन्य स्वाभिमानी शेतकरी संघटनांसारख्यांनी आंदोलने केली; पण त्याकडे डोळेझाक केल्याचे बोलले जात आहे. त्यांच्याच पक्षातर्फे मतदारसंघातील लासलगाव, विंचूरलाच काय पिंपळगावनजीक, चांदवडला केल्या गेलेल्या आंदोलनांकडेही बनकर फिरकले नव्हते, असे पक्षाचे कार्यकर्तेच बोलून दाखवित आहेत. त्यामुळे निवडणूक आल्यावरच दारात येणाºयाला कसे पाठबळ द्यायचे, असा त्यांचा प्रश्न आहे.कांद्याच्या निर्यातबंदीचा विषय असो वा कांदा साठवणूक, या दोन्ही प्रश्नांनी कांदा उत्पादक शेतकरी व व्यापारी त्रस्त असताना बनकर यांनी बाजार समितीचे सभापती म्हणून सरकारच्या विरोधात कोणतीही ठोस भूमिका घेतली नाही.सरकारला सदरचा निर्णय मागे घेण्यास भाग पाडण्यासाठी शेतकरी उत्सुक असताना बनकर यांनी बाजार समित्या बंद करण्याचा निव्वळ इशारा देऊन आपली तलवार म्यान केली. त्यामुळे अशा ‘मौनी’भूमिका घेणाºयांना निवडणुकीत मते मागण्याचा अधिकार आहे काय, असा प्रश्न आता मतदारच विचारताना दिसत आहेत.रस्त्याची अक्षरश: चाळणीनाशिक-औरंगाबाद या राष्टÑीय महामार्गावर नैताळे ते पिंपळस रामाचेदरम्यान गेल्या काही वर्षांत प्रचंड खड्डे पडून अपघातांची मालिका सुरू झाली असताना एकदाही बनकर यांनी विरोधी पक्षाचा नेता म्हणून ना जनआंदोलन छेडले ना सरकारला जाब विचारण्याची भूमिका घेतली. एवढेच नव्हे तर त्यांची कर्मभूमी म्हणून ओळखल्या जाणाºया पिंपळगाव बसवंत ते निफाड या रस्त्याची अक्षरश: चाळणी झाल्यामुळे वाहनचालक हैराण झाले आहेत. खुद्द बनकर यांनी या रस्त्याचा अनेकवेळा अनुभव घेतला असताना त्यांना या प्रश्नाचे गांभीर्य का कळू शकले नाही, असा प्रश्न या परिसरातील मतदार विचारू लागले आहेत.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019nifadनिफाड