शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
3
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
4
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
5
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
6
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
7
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
8
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
9
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
10
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
11
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
12
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
13
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
14
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
15
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
16
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
17
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
18
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
19
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
20
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
Daily Top 2Weekly Top 5

इगतपुरीच्या पूर्व भागात विजेच्या लपंडावाने दहा-बारा गावे अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:14 IST

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यात गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या संततधारेमुळे तालुक्यातील पूर्व भागात असलेल्या बेलगाव तऱ्हाळे, धामणगाव, धामणी, खेड, ...

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यात गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या संततधारेमुळे तालुक्यातील पूर्व भागात असलेल्या बेलगाव तऱ्हाळे, धामणगाव, धामणी, खेड, पिंपळगाव मोर, वासाळी, खडकेद, मांजरगाव, टाकेद खुर्द, बारशिंगवे, मायदरा, सोनोशी, अधरवड, धानोशी आदी गावांसह एकूण चाळीस वाड्यांमध्ये आठ दिवसांपासून सुरू असलेल्या विजेच्या लपंडावामुळे दहा ते बारा गावे अंधारात आहेत. तातडीने या गावांचा वीजपुरवठा सुरळीत सुरू करावा अशी मागणी परिसरातील नागरिकांनी इगतपुरी-बोरटेंबे येथील वीज वितरण केंद्राचे अभियंता यांना निवेदनाद्वारे केली आहे.

इगतपुरी तालुक्यात गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी विजेचे खांब, तसेच वीजपुरवठा करणाऱ्या मुख्य विद्युततारा तुटल्यामुळे परिसरातील बेलगाव तऱ्हाळे, टाकेद बुद्रुक, टाकेद खुर्द, धामणगाव, धामणी, पिंपळगाव मोर, धानोशी, मायदरा, वासाळी, खेड, अडसरे आदी गावांसह जवळपास छोट्या-मोठ्या ४० वाड्यांमध्ये आठ दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे. त्यामुळे ती गावे अंधारात असल्यामुळे येथील नागरिक त्रस्त झाले. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. गावात होणारा मुख्य पाणीपुरवठा बंद झाल्याने महिलांना पिण्याच्या पाण्यासाठीदेखील वणवण करावी लागत आहे. इगतपुरी तालुक्यातील पूर्व भागातील परिसरातील गावांचा वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे तसेच पावसामुळे ग्रामस्थांना दैनंदिन पाणीपुरवठा करणारे रोहित्र नादुरुस्त झाल्यामुळे बंद झाले. इगतपुरी-बोरटेंबे-घोटी वीज वितरणचे कर्मचारी गेल्या चार ते पाच दिवसांपासून रात्रंदिवस या कामात व्यस्त असून काम प्रगतीपथावर सुरू असल्याचे वीज वितरणचे अधिकारी यांनी माहिती देताना सांगितले.

----------------------

महिलांचा पाणीटंचाईशी सामना

परिसरासाठी पाणीपुरवठा करण्यास मुख्य विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे वीजच उपलब्ध नसल्यामुळे येथील महिलांना भर पावसाळ्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. आता जरी अवकाळी पावसामुळे वीजतारा, विजेचे खांब पडले असले तरी इगतपुरी-बोरटेंबे उपकेंद्राचा नेहमीच खेळखंडोबा सुरूच असल्याचे नागरिकांनी यावेळी सागितले. उपकेंद्रासाठी आलेल्या निधीचा योग्य वापर करून नेहमीच बिघाड होत असलेल्या ठिकाणी नवीन उपकरणे, रोहित्र, तसेच जीर्ण झालेले विजेचे खांब तत्काळ बदलण्यात यावेत, अशी मागणी परिसरातील शेतकरी तसेच ग्रामस्थ करीत आहेत.

-----------------

दरवर्षी पावसाळ्यात विजेच्या अडचणींचा सामना करावा लागतो. वीज वितरणने पावसाळ्यापूर्वी मुख्य रोहित्रांचे काम केल्यास अडचणी येणार नाहीत. गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या विजेच्या लपंडावामुळे नागरिक त्रस्त झाले असून शेतकऱ्यांना ऑनलाईन पीक विमा भरण्यासाठी अडचण निर्माण झाली आहे.

- पांडुरंग वारुंगसे, माजी उपसभापती, पंचायत समिती, इगतपुरी. (२८ नांदूरशिंगोटे ४)

280721\28nsk_5_28072021_13.jpg

२८ नांदुरशिंगोटे ४