शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
5
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
6
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
7
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
8
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
9
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
10
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
11
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
12
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
13
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
14
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
15
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
16
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
17
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
18
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
19
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
20
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...

इगतपुरीच्या पूर्व भागात विजेच्या लपंडावाने दहा-बारा गावे अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:14 IST

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यात गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या संततधारेमुळे तालुक्यातील पूर्व भागात असलेल्या बेलगाव तऱ्हाळे, धामणगाव, धामणी, खेड, ...

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यात गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या संततधारेमुळे तालुक्यातील पूर्व भागात असलेल्या बेलगाव तऱ्हाळे, धामणगाव, धामणी, खेड, पिंपळगाव मोर, वासाळी, खडकेद, मांजरगाव, टाकेद खुर्द, बारशिंगवे, मायदरा, सोनोशी, अधरवड, धानोशी आदी गावांसह एकूण चाळीस वाड्यांमध्ये आठ दिवसांपासून सुरू असलेल्या विजेच्या लपंडावामुळे दहा ते बारा गावे अंधारात आहेत. तातडीने या गावांचा वीजपुरवठा सुरळीत सुरू करावा अशी मागणी परिसरातील नागरिकांनी इगतपुरी-बोरटेंबे येथील वीज वितरण केंद्राचे अभियंता यांना निवेदनाद्वारे केली आहे.

इगतपुरी तालुक्यात गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी विजेचे खांब, तसेच वीजपुरवठा करणाऱ्या मुख्य विद्युततारा तुटल्यामुळे परिसरातील बेलगाव तऱ्हाळे, टाकेद बुद्रुक, टाकेद खुर्द, धामणगाव, धामणी, पिंपळगाव मोर, धानोशी, मायदरा, वासाळी, खेड, अडसरे आदी गावांसह जवळपास छोट्या-मोठ्या ४० वाड्यांमध्ये आठ दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे. त्यामुळे ती गावे अंधारात असल्यामुळे येथील नागरिक त्रस्त झाले. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. गावात होणारा मुख्य पाणीपुरवठा बंद झाल्याने महिलांना पिण्याच्या पाण्यासाठीदेखील वणवण करावी लागत आहे. इगतपुरी तालुक्यातील पूर्व भागातील परिसरातील गावांचा वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे तसेच पावसामुळे ग्रामस्थांना दैनंदिन पाणीपुरवठा करणारे रोहित्र नादुरुस्त झाल्यामुळे बंद झाले. इगतपुरी-बोरटेंबे-घोटी वीज वितरणचे कर्मचारी गेल्या चार ते पाच दिवसांपासून रात्रंदिवस या कामात व्यस्त असून काम प्रगतीपथावर सुरू असल्याचे वीज वितरणचे अधिकारी यांनी माहिती देताना सांगितले.

----------------------

महिलांचा पाणीटंचाईशी सामना

परिसरासाठी पाणीपुरवठा करण्यास मुख्य विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे वीजच उपलब्ध नसल्यामुळे येथील महिलांना भर पावसाळ्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. आता जरी अवकाळी पावसामुळे वीजतारा, विजेचे खांब पडले असले तरी इगतपुरी-बोरटेंबे उपकेंद्राचा नेहमीच खेळखंडोबा सुरूच असल्याचे नागरिकांनी यावेळी सागितले. उपकेंद्रासाठी आलेल्या निधीचा योग्य वापर करून नेहमीच बिघाड होत असलेल्या ठिकाणी नवीन उपकरणे, रोहित्र, तसेच जीर्ण झालेले विजेचे खांब तत्काळ बदलण्यात यावेत, अशी मागणी परिसरातील शेतकरी तसेच ग्रामस्थ करीत आहेत.

-----------------

दरवर्षी पावसाळ्यात विजेच्या अडचणींचा सामना करावा लागतो. वीज वितरणने पावसाळ्यापूर्वी मुख्य रोहित्रांचे काम केल्यास अडचणी येणार नाहीत. गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या विजेच्या लपंडावामुळे नागरिक त्रस्त झाले असून शेतकऱ्यांना ऑनलाईन पीक विमा भरण्यासाठी अडचण निर्माण झाली आहे.

- पांडुरंग वारुंगसे, माजी उपसभापती, पंचायत समिती, इगतपुरी. (२८ नांदूरशिंगोटे ४)

280721\28nsk_5_28072021_13.jpg

२८ नांदुरशिंगोटे ४