शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
2
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
3
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
4
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
5
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
6
एअर इंडिया विमान अपघातात सापडलेल्या ७० तोळे सोने आणि रोख रकमेवर कुणाचा हक्क? कायदा काय सांगतो?
7
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
8
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?
9
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
10
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
11
Viral Video: वा क्या कारीगरी है; विजेच्या खांबातून रस्ता, बंगळुरूतील व्हिडीओ व्हायरल, तुम्ही बघितला का?
12
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
13
Yogini Ekadashi 2025: योगिनी ते आषाढी एकादशी, १५ दिवस ऐका 'हे' स्तोत्र; मिटेल चिंता, होईल अपार लाभ!
14
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
15
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
16
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
17
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
18
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
19
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
20
Pandharpur Wari: वारीत गर्दी नियंत्रण, सुरक्षेसाठी ‘एआय’; ७ हजार पोलिस तैनात

दहा मुस्लीम जोडप्यांचा ‘निकाह’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 00:41 IST

मुस्लीम समाजातील गरीब-श्रीमंतीची दरी कमी व्हावी, समाजाचा सर्वांगीण विकास साधला जावा या उद्देशाने जुने नाशिकमधील युवा आदर्श मल्टीपर्पज संस्थेच्या वतीने आयोजित सामुदायिक विवाह सोहळ्यात दहा मध्यमवर्गीय युवक-युवतींचा सामुदायिक ‘निकाह’ पारंपरिक पद्धतीने पार पडला.

नाशिक : मुस्लीम समाजातील गरीब-श्रीमंतीची दरी कमी व्हावी, समाजाचा सर्वांगीण विकास साधला जावा या उद्देशाने जुने नाशिकमधील युवा आदर्श मल्टीपर्पज संस्थेच्या वतीने आयोजित सामुदायिक विवाह सोहळ्यात दहा मध्यमवर्गीय युवक-युवतींचा सामुदायिक ‘निकाह’ पारंपरिक पद्धतीने पार पडला.युवा आदर्श संस्था जुने नाशिक परिसरात मागील सात वर्षांपासून हा उपक्रम राबवित आहे. रविवारी (दि.२०) झालेल्या मुस्लीम सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी नाशिक, मालेगाव, वैजापूर, मुंबई या शहरांमधूनही नोंदणी झाली होती. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ धर्मगुरू हजरत सय्यद मौलाना मोईनुद्दीन अशरफ उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून खासदार हेमंत गोडसे, शहर-ए-खतीब हिसामुद्दीन अशरफी, आमदार देवयानी फरांदे, योगेश घोलप, नगरसेवक समिना मेमन यांच्यासह समाजातील विविध मान्यवर उपस्थित होते. दहा वधू-वरांचा सामूहिक निकाहचा विधी पारंपरिक व इस्लामिक धार्मिक पद्धतीने हजरत सय्यद मीर मुख्तार यांनी पार पाडला.सर्व विवाहबद्ध जोडप्यांना संस्थेच्या वतीने एकसमान संसारोपयोगी वस्तू भेट म्हणून देण्यात आल्या. तसेच दहा वधू-वरांकडून आलेल्या वºहाडी मंडळींकरिता भोजनाचीदेखील व्यवस्था संस्थेकडून करण्यात आली होती.यावेळी अशरफ यांनी राज्यातील काही भागांत असलेले दुष्काळाचे सावट दूर व्हावे, तसेच भारत प्रगतीची शिखरे सर करो अणि येथील राष्टÑीय एकात्मता अखंडितपणे जोपासली जावो, यासाठी विशेष प्रार्थना (दुआ) केली. तसेच विवाहबद्ध वरांना शुभाशीर्वाद देत त्यांच्या सुखी-समाधानी वैवाहिक आयुष्याकरिता प्रार्थना केली. प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष बबलू शेख यांनी केले. दरम्यान, गोडसे, फरांदे यांनीही आपल्या मनोगतामधून नववधू-वरांना शुभेच्छा दिल्या.सामूहिक निकाह सोहळ्याची आज गरजमुस्लीम समाजाच्या सर्वांगीण विकास साधण्यासाठी तसेच विवाहसोहळ्यांवर होणारा अनावश्यक खर्च टाळून गोरगरिबांचा आत्मविश्वास अधिकाधिक बळकट करण्यासाठी सामूहिक ‘निकाह’ सोहळा गरजेचा असल्याचे मत ज्येष्ठ धर्मगुरू मौलाना सय्यद मोईनुद्दीन अशरफ यांनी यावेळी व्यक्त केले. समाजाने शैक्षणिक स्तर उंचविण्याकडे अधिक लक्ष देऊन विवाह सोहळे साधेपणाने करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Muslimमुस्लीमNashikनाशिक