शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळाचे संकट असलेल्या 44 मंडळात आणखी दहा मंडळाची भर

By sandeep.bhalerao | Updated: August 29, 2023 18:50 IST

नाशिक जिल्ह्यातील दुष्काळाचे सावट असलेल्या मंडळांची संख्या आता 54 झाली आहे.

नाशिक : जिल्ह्यात केवळ ५६ टक्के इतकाच पाऊस झाल्याने ९२ पैकी ४४ मंडळांमध्ये दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली असताना त्यात आणखी दहा मंडळाचे भर पडणार आहे. जिल्ह्यातील दुष्काळाचे सावट असलेल्या मंडळांची संख्या आता 54 झाली आहे.

पावसाने ओढ दिल्याने जिल्ह्यातील काही भागांची स्थिती नक्कीच गंभीर होऊ पाहत आहे. २१ दिवसांचा खंड असलेली जिल्ह्यातील ९२ पैकी ४४ मंडळांमध्ये दुष्काळाची स्थिती असून, त्यामध्ये येत्या दोन दिवसांत आणखी दहा मंडळांची भर पडणार आहे. असे एकूण ५४ मंडळांमध्ये दुष्काळाचे सावट असल्याने पीकविमा कंपन्यांनी पंचनामे करावेत, अशा सूचना पालकमंत्री दादा भुसे यांनी दिल्या.

जिल्ह्यात ऑगस्ट अखेरपर्यंत ६७२ मिमी पाऊस अपेक्षित असतो. मागीलवर्षी आतापर्यंत ८७१ मिमी इतका पाऊस झाला होता तर आतापर्यंत ३८० मिमी पाऊस झालेला आहे. मागील वर्षापेक्षा ५६ टक्के इतकाच पाऊस झालेला आहे. आता परतीच्या पावसावरच भरवसा असून, मागील तीन वर्षांचा अनुभव लक्षात घेता सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या पावसावर पिण्याच्या आणि सिंचनाचा प्रश्न अवलंबून असतो. शिवाय रब्बी हंगामालाही मदत होते, असे भुसे यांनी सांगितले.

दुष्काळ जन्यस्थिती निर्माण झाल्याने जिल्हाधिकारी जलज लक शर्मा यांनी मंगळवारी कृषी आणि जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना पाणी नियोजन आणि चारा नियोजनाच्या सूचना दिल्या आहेत.