शहरं
Join us  
Trending Stories
1
'जे घडले, ते घडायला नको होते'; मोहसिन नक्वींनी बीसीसीआयची माफी मागितली, पण ट्रॉफी परत देण्यास नकार
2
असे कसे झाले...! सप्टेंबरमध्ये वाहनांची विक्री वाढायला हवी होती, १३ टक्क्यांनी कमी झाली...; नेमके काय झाले...
3
अर्थव्यवस्थेला ५ मोठे 'बूस्टर डोस'! रेपो दर जैसे थे, पण RBI च्या 'या' निर्णयाने मार्केटमध्ये येणार पैसा
4
फिलिपाईन्स भूकंपात 69 जणांचा मृत्यू, शेकडो जखमी; पाहा धक्कादायक व्हिडिओ...
5
ICC Rankings : अभिषेकनं सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड; T20I च्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं
6
"ही भिवंडी आहे, मराठीत कशाला बोलायचं?"; अबु आझमींचे वादग्रस्त वक्तव्य, मनसे म्हणाली, "लाज वाटते तर..."
7
गंगाखेडेतमध्ये धनगर आरक्षण आंदोलनात खळबळ; ओबीसी नेते सुरेश बंडगर यांचा आत्मदहनाचा प्रयत्न
8
नवरात्र घट विसर्जन २०२५: पुरणाचे दिवे आणि कलशाचे पाणी कसे वापरावे? देवीच्या कृपेसाठी खास विधी!
9
सर्व्हे! नितीश कुमार, तेजस्वी यादव की PK...कुणाला मुख्यमंत्री म्हणून मिळाली पहिली पसंती?
10
"चीन अमेरिकेला मागे टाकणार, तिसरं महायुद्ध, अन्...!"; 2026 साठी बाबा वेंगाची भविष्यवाणी, भारतासह जागात काय-काय घडणार?
11
बाजारात गेलेल्या सुनेचा २ वर्षांनी विहिरीत सापडला सांगाडा; राँग नंबरवरुन सुरू झालेली लव्हस्टोरी
12
जगात पहिल्यांदा 'ड्रोन वॉल' बनणार; रशियाला घाबरुन २७ देशांनी निर्णय घेतला, जाणून घ्या कसे करणार काम
13
'अनेकदा संघाला संपवण्याचे प्रयत्न झाले, तरीही संघ वटवृक्षासारखा ठाम उभा आहे'- PM नरेंद्र मोदी
14
Pune Viral Video: केस पकडले, कमरेत लाथा मारल्या; पुण्यात भररस्त्यात तरुणीला मारहाण; घटनेचा व्हिडीओ व्हायरल
15
३० वर्षांनी शुभ दसरा २०२५: ७ राजयोगात १० राशींना भरपूर लाभ, भरघोस यश-पैसा; सुख-सुबत्ता काळ!
16
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शतकपूर्तीनिमित्त सरकाने प्रसिद्ध केलं विशेष नाणं आणि टपाल तिकीट, मोदी म्हणाले...
17
Viral Video: मुंबई लोकलमध्ये नवरात्रीचा जल्लोष! 'एक नंबर, तुझी कंबर' गाण्यावर महिलांचा जबरदस्त डान्स
18
'मैत्रीमुळे विचारधारा सोडली, असे होत नाही.. ' संघाच्या निमंत्रण पत्रिकेवर न्यायाधीशांच्या आईचे नाव असल्याने वाद !
19
भोजपुरी अभिनेता पवन सिंह भाजपात; "जीवे मारले तरी मराठी बोलणार नाही", या विधानावरून झाला होता वाद
20
Asia Cup 2025 : ट्रॉफी द्या, अन्यथा..; BCCI ने मोहसिन नकवींना दिला ७२ तासांचा अल्टिमेटम

दहा दिवस ती राहिली आपल्या बहिणीच्या मृतदेहासोबत धक्कादायक घटना : देवळाली कॅम्प येथील घटनेने सारेच थक्क; मृत्यू कशामुळे झाला याबाबत अद्याप खुलासा नाही; दोन्ही बहिणी मनोरुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2019 01:47 IST

देवळाली कॅम्प/भगूर : दहा दिवसांपूर्वी मयत झालेल्या बहिणीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार न करता मोठी बहीण मृतदेहाजळच बसून असल्याची धक्कादायक घटना देवळाली कॅम्प येथे समोर आली आहे. परिसरात दुर्गंधी सुटल्याने सदर प्रकार उघडकीस आला.

देवळाली कॅम्प/भगूर : दहा दिवसांपूर्वी मयत झालेल्या बहिणीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार न करता मोठी बहीण मृतदेहाजळच बसून असल्याची धक्कादायक घटना देवळाली कॅम्प येथे समोर आली आहे. परिसरात दुर्गंधी सुटल्याने सदर प्रकार उघडकीस आला.देवळाली कॅम्प विजयनगर परिसरात पंचमोती सोसायटीत राहणाऱ्या कविता दिगंबर बागुल (४४) या महिलेचा दहा दिवसांपूर्वी मृत्यू झालेला असताना तिची मोठी बहीण मीना दिगंबर बागुल ही गेल्या दहा दिवसांपासून प्रेताजवळच बसून होती. शेजारील नागरिकांनी बागुल यांचे नातेवाईक रवींद्र रमेश खरोटे यांना माहिती दिली. ते स्वत: घटनास्थळी आले असता त्यांना कविता बागुल या मयत अवस्थेत आढळून आल्या. त्यांचे प्रेत कुजलेल्या अवस्थेत होते तर मीना बागुल या फक्त सुन्न नजरेने मृतदेहाकडे पाहत होत्या. या दोन्ही बहिणी मनोरुग्ण असल्याने एकत्रच याठिकाणी राहात होत्या.सदर घटनेची माहिती देवळाली कॅम्प पोलिसांना कळवली असता सहायक पोलीस निरीक्षक राहुल मोरे यांसह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. परिस्थिती बघून त्यांनी वरिष्ठांना घटनेची माहिती दिली. दरम्यान, कविता बागुल यांचे नातेवाईकही तातडीने घटनास्थळी आले. पोलिसांनी रात्री उशिरा जागेवरच पंचनामा करून अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. दिवाळीपूर्वी या मुलींची मावशी आणि काका त्यांची भेट घेऊन गेले होते.दिगंबर बागुल हे मुंबई येथे एमटीएनएलच्या सेवेत होते. अठरा वर्षांपूर्वी ते सेवानिवृत्त झाल्यानंतर देवळाली कॅम्प येथे पत्नी कांताबाई बागुल, मुली मीना व कविता यांच्यासह राहात होते. तीन वर्षांपूर्वी दिगंबर बागुल व कांता बागुल यांचे निधन झाल्याने दोन्ही मुलींवर मानसिक आघात झाला. त्यातून त्या मनोरु ग्ण झाल्या. दोघी बहिणींपैकी मीना बागुल यांचा विवाह घोटी येथे झालेला होता. आई-वडिलांच्या निधनानंतर त्यांच्याही मनावर परिणाम होऊन लहान बहीण कविता बागुल सोबत त्या राहू लागल्या होत्या. त्यांच्या पालनपोषणाची जबाबदारी नातेवाईक मामा, आत्या, काका, मावशी हेच बघत होते.आई-वडिलांच्या मृत्यूनंतर प्रचंड मानसिक धक्का बसल्यामुळे दोघी बहिणी मानसिकदृष्ट्या कमकुवत झाल्या आणि त्यातूनच त्या मनोरुग्ण झाल्याने काही वर्ष त्या एकत्रित, परंतु एकाकी जीवन जगत होत्या. अभावानेच त्यांच्याकडे नातेवाइकांचे येणे होते. दिवाळीपूर्वी या मुलींची मावशी, काका त्यांना भेटून गेले होते. त्यांच्या घरातून दुर्गंधी येऊ लागल्याने ही बाब उघड झाली. कविताचा मृत्यू नेमका कशाने झाला, याबाबत काहीही माहिती नाही.

टॅग्स :Nashikनाशिक