शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

तपमानवाढीचा फटका : पोल्ट्री व्यावसायिक चिंतित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2018 00:19 IST

सतत हवामानात होणाऱ्या बदलामुळे व वाढत्या तपमानामुळे पोल्ट्री फार्ममधील पक्षी मरण पावत असल्याने कुक्कुटपालन व्यवसाय धोक्यात आला आहे. त्यामुळे पोल्ट्री फार्म शेड रिकामे होत आहे असून, व्यावसायिक चिंताक्रांत झाले आहेत.

खामखेडा : सतत हवामानात होणाऱ्या बदलामुळे व वाढत्या तपमानामुळे पोल्ट्री फार्ममधील पक्षी मरण पावत असल्याने कुक्कुटपालन व्यवसाय धोक्यात आला आहे. त्यामुळे पोल्ट्री फार्म शेड रिकामे होत आहे असून, व्यावसायिक चिंताक्रांत झाले आहेत.  शेतकरी जोड व्यवसाय म्हणून गायी, म्हशी, बकरी पालन म्हणजे दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात करीत आहेत. त्याचबरोबर गावठी कोंबड्याही मोठ्या प्रमाणात पाळत असून, त्यामुळे अंडी व चिकनचा प्रश्न काही प्रमाणात सुटत असे. परंतु जस-जसा शेतीच्या विकास होत गेला तसतसे शेतीपूरक जोडधंद्यांमध्ये वाढ झाल्याने दुय्यम दर्जाचे व्यवसायाची गरज भासू लागली आहे. गेल्या दोन-तीन वर्षांपासून शेती व्यवसाय तोट्यात येऊ लागला आहे.  शेतमाल कवडीमोल भावाने विकला जात आहे. शेतकºयांचा मुलगा जरी शिकला असला तरी त्याला नोकरी न मिळाल्यामुळे वेगवेगळ्या व्यवसायात शेतकºयांचे साधन बनू लागल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात पोल्ट्री व्यवसायाकडे वळू लागले. खामखेडा परिसरात मोठ्या प्रमाणात पोल्ट्री शेडचे उभे राहिले. या पोल्ट्री बांधकामासाठी मोठ्या प्रमाणात खर्च येतो. यंदा पाऊस, ढगाळ व अतिउष्ण वातावरणामुळे पोल्ट्री व्यवसाय धोक्यात आला आहे. बॉयलर कोंबडीसाठी थंड हवामान पोषक असते. या हवामानामुळे कोंबड्यांचा मृत्यू मोठ्या प्रमाणात होतो. या हवामानापासून पक्ष्यांचा बचाव करण्यासाठी पोल्ट्री शेडच्या पत्र्यावर उसाचे पाचट, बारदान, नाराळाच्या झाडाच्या फांद्या आदी टाकले जाऊन उष्ण वातावरणापासून रक्षण केले जात आहे. एवढेही करून या वर्षाचे वातावरण पोल्ट्री व्यवसायासाठी अनुकूल नाही. यामुळे अनेक पोल्ट्रीवाल्यांनी पोल्ट्री शेडमध्ये पिल्ले न टाकल्याने अनेक पोल्ट्री शेड रिकामे दिसून येत आहेत. त्यामुळे बॉयलरच्या भावात वाढ झालेली दिसून येत आहे.

टॅग्स :Temperatureतापमान