शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
3
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
4
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
5
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
6
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
7
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
8
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
9
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
10
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
11
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
12
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
13
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
14
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
15
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
16
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
17
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
18
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
19
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
20
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."

तपमानाने आरोग्याच्या तक्रारी वाढल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 00:17 IST

यावर्षी तपमानात झालेल्या प्रचंड वाढीचा जनजीवनावर विपरीत परिणाम झाला असून, अनेकांना आरोग्याच्या समस्या भेडसावत आहेत. यामुळे रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. यंदा फेब्रुवारी महिन्यापासूनच तपमानाचा पारा वाढत असून, मे महिन्यात ४५ अंशापर्यंत वाढले आहे. या वाढत्या तपमानामुळे घामाने चिंब झालेल्या सर्वांना केव्हा पाऊस पडेल असे झाले आहे.

मालेगाव : यावर्षी तपमानात झालेल्या प्रचंड वाढीचा जनजीवनावर विपरीत परिणाम झाला असून, अनेकांना आरोग्याच्या समस्या भेडसावत आहेत. यामुळे रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. यंदा फेब्रुवारी महिन्यापासूनच तपमानाचा पारा वाढत असून,मे महिन्यात ४५ अंशापर्यंत वाढले आहे. या वाढत्या तपमानामुळे घामाने चिंब झालेल्या सर्वांना केव्हा पाऊस पडेल असे झाले आहे.सकाळी ८ वाजेपासून उन्हाचे चटके बसू लागल्याने नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. उन्हाची दाहकता वयोवृद्ध व लहान बालकांबरोबरच सर्वांना असह्य झाले आहे, यामुळे अनेकांना उष्णतेच्या विकारांना सामोरे जावे लागत आहे. या बदलत्या व वाढत्या तपमानामुळे इतर आजारांनी डोके वर काढले आहे. साहजिकच परिसरातील सर्व शासकीय व खासगी दवाखान्यात रुग्णांची गर्दी दिसून येत आहे. वाढलेल्या तपमानामुळे उलटी, मळमळ, ताप, सर्दी, खोकला आदी विकारांसह अंगावर पुरळ येणे, यासारख्या आजारांची लागण होताना दिसत आहे. या विकारांमुळे रुग्णांना प्रचंड प्रमाणात थकवा जाणवत आहे. असह्य अशा उकाड्याने सर्वांनाच घामाच्या धारांना सामोरे जावे लागत आहे. यामुळे त्वचेचे आजारही उद्भवत आहेत. मानेवर, पाठीवर, डोक्यावर तसेच हातापायांवर घामामुळे पुरळ येत असून त्वचा कोरडी पडणे, अंगाला खाज येणे, शरीराच्या अवघड भागात गाठी येणे असे विकार डोकावत आहेत.  वाढत्या उन्हामुळे सर्वच मंडळी स्वत:चा बचाव करण्यासाठी व उष्णतेची तीव्रता कमी होण्यासाठी जास्तीत जास्त शीतपेये घेताना दिसत आहेत; मात्र घातक अशा शीतपेयांमुळे घसा सुजणे, खवखवणे, सर्दी यांसारख्या आजारांना आमंत्रण देत आहे.अनेक भागात अघोषित संचारबंदीसकाळी ८ वाजेपासून सूर्यदेव आग ओकण्यास सुरुवात करत असून हा सूर्याचा प्रकोप दुपारी ४ ते ५ वाजेपर्यंत वाढता राहतो. त्यानंतर मात्र तपमानात घट होण्यास सुरुवात होते. या वेळेत शहरातील अत्यंत गर्दीच्या ठिकाणीही सामसूम होत आहे. शहरातील रस्त्यांवर शुकशुकाट होत असून अनेक भागात अघोषित संचारबंदी लागत आहे. नागरिक अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळत आहेत. त्यामुळे मुख्य रस्ते वगळता इतर रस्ते ओस पडत आहेत.  यंदा तपमानात वाढ असली तरी लग्नसराईने नागरिकांना गावोगावी फिरावे लागत आहे, याचा परिणाम नागरिकांच्या स्वास्थ्यावर होत आहे. दूषित पाणी व झाडांची कमतरता भासत असल्याने लोकांना पर्यावरणाचे महत्त्व कळत आहे.

टॅग्स :Temperatureतापमान