शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
4
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
5
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
6
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
7
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
8
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
9
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
10
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
11
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
12
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
13
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
14
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
17
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
18
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
19
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
20
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!

तपमानाने आरोग्याच्या तक्रारी वाढल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 00:17 IST

यावर्षी तपमानात झालेल्या प्रचंड वाढीचा जनजीवनावर विपरीत परिणाम झाला असून, अनेकांना आरोग्याच्या समस्या भेडसावत आहेत. यामुळे रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. यंदा फेब्रुवारी महिन्यापासूनच तपमानाचा पारा वाढत असून, मे महिन्यात ४५ अंशापर्यंत वाढले आहे. या वाढत्या तपमानामुळे घामाने चिंब झालेल्या सर्वांना केव्हा पाऊस पडेल असे झाले आहे.

मालेगाव : यावर्षी तपमानात झालेल्या प्रचंड वाढीचा जनजीवनावर विपरीत परिणाम झाला असून, अनेकांना आरोग्याच्या समस्या भेडसावत आहेत. यामुळे रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. यंदा फेब्रुवारी महिन्यापासूनच तपमानाचा पारा वाढत असून,मे महिन्यात ४५ अंशापर्यंत वाढले आहे. या वाढत्या तपमानामुळे घामाने चिंब झालेल्या सर्वांना केव्हा पाऊस पडेल असे झाले आहे.सकाळी ८ वाजेपासून उन्हाचे चटके बसू लागल्याने नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. उन्हाची दाहकता वयोवृद्ध व लहान बालकांबरोबरच सर्वांना असह्य झाले आहे, यामुळे अनेकांना उष्णतेच्या विकारांना सामोरे जावे लागत आहे. या बदलत्या व वाढत्या तपमानामुळे इतर आजारांनी डोके वर काढले आहे. साहजिकच परिसरातील सर्व शासकीय व खासगी दवाखान्यात रुग्णांची गर्दी दिसून येत आहे. वाढलेल्या तपमानामुळे उलटी, मळमळ, ताप, सर्दी, खोकला आदी विकारांसह अंगावर पुरळ येणे, यासारख्या आजारांची लागण होताना दिसत आहे. या विकारांमुळे रुग्णांना प्रचंड प्रमाणात थकवा जाणवत आहे. असह्य अशा उकाड्याने सर्वांनाच घामाच्या धारांना सामोरे जावे लागत आहे. यामुळे त्वचेचे आजारही उद्भवत आहेत. मानेवर, पाठीवर, डोक्यावर तसेच हातापायांवर घामामुळे पुरळ येत असून त्वचा कोरडी पडणे, अंगाला खाज येणे, शरीराच्या अवघड भागात गाठी येणे असे विकार डोकावत आहेत.  वाढत्या उन्हामुळे सर्वच मंडळी स्वत:चा बचाव करण्यासाठी व उष्णतेची तीव्रता कमी होण्यासाठी जास्तीत जास्त शीतपेये घेताना दिसत आहेत; मात्र घातक अशा शीतपेयांमुळे घसा सुजणे, खवखवणे, सर्दी यांसारख्या आजारांना आमंत्रण देत आहे.अनेक भागात अघोषित संचारबंदीसकाळी ८ वाजेपासून सूर्यदेव आग ओकण्यास सुरुवात करत असून हा सूर्याचा प्रकोप दुपारी ४ ते ५ वाजेपर्यंत वाढता राहतो. त्यानंतर मात्र तपमानात घट होण्यास सुरुवात होते. या वेळेत शहरातील अत्यंत गर्दीच्या ठिकाणीही सामसूम होत आहे. शहरातील रस्त्यांवर शुकशुकाट होत असून अनेक भागात अघोषित संचारबंदी लागत आहे. नागरिक अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळत आहेत. त्यामुळे मुख्य रस्ते वगळता इतर रस्ते ओस पडत आहेत.  यंदा तपमानात वाढ असली तरी लग्नसराईने नागरिकांना गावोगावी फिरावे लागत आहे, याचा परिणाम नागरिकांच्या स्वास्थ्यावर होत आहे. दूषित पाणी व झाडांची कमतरता भासत असल्याने लोकांना पर्यावरणाचे महत्त्व कळत आहे.

टॅग्स :Temperatureतापमान