शहरं
Join us  
Trending Stories
1
१० टक्के पगारवाढ राहुद्या...! दिवाळी दोन दिवसांवर आली, NHM कर्मचाऱ्यांना दोन महिन्यांपासून पगारच नाही...
2
छिंदवाडा'मध्ये झालेल्या मुलांच्या मृत्यूवर 'WHO' ने कडक कारवाई केली; या तीन सिरपबाबत इशारा दिला
3
IND vs WI : दिल्लीच्या बालेकिल्ल्यात टीम इंडियाचा मोठा पराक्रम! दक्षिण आफ्रिकेच्या वर्ल्ड रेकॉर्डशी बरोबरी
4
Cough Syrup : मोठा खुलासा! १०% कमिशनच्या नादात २३ मुलांचा मृत्यू; कफ सिरपसाठी डॉक्टरला मिळायचे पैसे
5
IND vs WI : KL राहुलचं नाबाद अर्धशतक; कसोटीत शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने जिंकली पहिली ट्रॉफी
6
बिहार निवडणूक: तेजस्वी यादव काँग्रेससोबतच्या बैठकीतून निघून आले; राहुल गांधी, खर्गेंना न भेटताच बिहारला पोहोचले...
7
बँकांच्या मागण्यांना कंटाळला विजय मल्ल्या; म्हणाला,"माझ्याकडून पैसे मागणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे," भारतातच प्रकरण मिटवण्याची दिली ऑफर
8
ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का! पहिल्याच वन-डेमधून 'हे' दोन महत्त्वाचे खेळाडू बाहेर; भारतीय संघाने टाकला सुटकेचा नि:श्वास...
9
ईपीएफओने पैसे काढण्यासंबंधी तब्बल १३ नियम बदलले; आता संपूर्ण शिल्लक काढता येणार नाही
10
दिवाळीच्या साफसफाईत आईला सापडला 'खजिना'; २ हजारांच्या तब्बल २ लाखांच्या नोटा, पण...
11
शांततेचे दूत! ट्रम्प यांच्यासाठी शाहबाज शरीफ यांच्याकडून नोबेलची मागणी; मेलोनींनी तोंडावर ठेवला हात
12
Diwali 2025: वास्तुशास्त्रानुसार दिवाळीत 'या' सहा वस्तू कोणाकडून भेट घेऊ नका आणि देऊही नका!
13
LG Electronics IPO Listing: बंपर लिस्टिंग, शेअर बाजारात एन्ट्री घेताच प्रत्येक शेअरवर ₹५७५ चा फायदा; एलजी आयपीओनं केलं मालामाल
14
डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, ‘मोदी चांगले मित्र आहेत’; बाजूलाच उभे असलेले पाकिस्तानचे शाहबाज शरीफ अवाक, व्हिडीओ व्हायरल
15
दिवाळी २०२५: धन-सुख-समृद्धीची इच्छा पूर्ण होईल, ‘अशी’ करा लक्ष्मी आगमनाची तयारी; शुभच घडेल!
16
दिवाळी २०२५ धमाका: या स्मार्टफोनवर मिळतोय मोठा डिस्काउंट! तुम्ही घेण्याच्या विचारात असाल तर... 
17
नेपाळनंतर 'Gen-Z' ने या देशातील सत्ता घालवली; राष्ट्रपती देश सोडून पळून गेले
18
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, निफ्टीमध्ये ७० अंकांची तेजी; IT आणि मेटल शेअर्स सुस्साट
19
Swami Samartha: पुष्य नक्षत्रावर सुरु करा स्वामीभक्ती, अध्यात्मात मिळेल गती, आयुष्यात होईल दुप्पट प्रगती!
20
५०० वर्षांनी हंस केंद्र त्रिकोण राजयोग: ९ राशींना बोनस, अकल्पनीय लाभ; भाग्योदय-पैसा-भरभराट!

सांगा भाऊ, पोटाला काय खाऊ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2020 00:19 IST

ओझर : कोरोनाच्या पुढे जगाने शरणागती पत्करली असून देशभर लागू झालेल्या लॉकडाऊनमुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात हजारो रोजंदारी करणाऱ्या कामगारांवरही उपासमारीची वेळ आली आहे.

ठळक मुद्दे हातावरच्या कामगारांची उपासमार; लॉकडाउनमुळे ग्रामीण भागात व्यावसायिकांना फटका.

लोकमत न्यूज नेटवर्कओझर : कोरोनाच्या पुढे जगाने शरणागती पत्करली असून देशभर लागू झालेल्या लॉकडाऊनमुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात हजारो रोजंदारी करणाऱ्या कामगारांवरही उपासमारीची वेळ आली आहे.कोरोनाचीची चाहूल जसजशी लागत गेली तशी कामगार जगतावर टांगती तलवार तीक्ष्ण होत गेली. त्यात बावीस मार्चच्या जनता कर्फ्यूनंतर तर संपूर्ण देश २१ दिवसांच्या लॉकडाऊनला सामोरे गेला. त्यात जीवनावश्यक वस्तू वगळता सर्वच उद्योग व्यवसाय व त्यात सुरू असलेले कामकाज थिजले. आठवडे बाजारात रेशन पाण्यापासून ते सर्वच बाबी हप्ता टू हप्ता भरणारे मजूर कुटुंब पुरते बेघर झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.ग्रामीण भागाच्या सर्वच स्थानिक प्रशासनाने आठवडे बाजार भरणार नसल्याचे जाहीर केले. एरव्ही ज्या दिवशी आठवडे बाजार असतो त्यादिवशी सकाळी सदर मजूर तो काम करत असलेल्या ठिकाणी मालकाकडे जातो व तेथील त्याच्या हजेरीनुसार त्याला त्या आठवड्याचा पगार दिला जातो.परंतु आता ही साखळी तुटली असल्याने कोरोनामुळे उद्योग व्यवसाय व स्थानिक छोटे मोठे काम करून उदरिनर्वाह करणाºया मजुरांचे मोठे हाल होताना दिसत आहे. गेल्या आठवड्यापासून कंत्राटदारच घरात बसलेला असल्याने तो रोजंदारीच्या मजुरांचे पालन पोषण कसा करणार हा यक्ष प्रश्न निर्माण झाला आहे.बाहेर गावाहून आलेले मजूर देखील अचानक उदभवलेल्या परिस्थतीशी दोन हात करताना हरले आहेत.त्यामुळे ग्रामीण भागातील काही सेवाभावी संस्थांनी एकत्र येत दोन वेळचे जेवण गरजूंना दिल्यास त्यांना देखील मोठा आधार मिळेल शिवाय यातून दातृत्वाची भावना देखील निर्माण होईल, अशी भावना व्यक्त केली जात आहे.स्थलांतरित मजूर कामाअभावी पायीच परतले !त्र्यंबकेश्वर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील स्थलांतरित झालेले मजूर कामाअभावी पायीच परतले आहेत. कोरडवाहू खरीप पिकांचा सीझन संपल्यानंतर शेतमजुरी करणाºया मजुरांना उदरनिर्वाहाचे साधन राहात नाही. अशावेळी दरवर्षी सीझन संपला की, त्र्यंबकेश्वर तालुक्यातून शेकडो कुटुंबे नाशिक, मुंबई, ठाणे, कल्याण, गुजरात अशा गावांना मोलमजुरीसाठी स्थलांतर करतात. यावर्षी असेच मजूर कामे करण्यासाठी गेले असताना सध्या आलेल्या जागतिक महामारीने शहरच्या शहरे गाव खेडेपाडे लॉकडाउन झाले आहेत. लोकांना कामधंदे बंद करून घरातच बसण्याचा सरकारने आदेश दिला. बसेस, टॅक्सी आदी वाहने बंद केली. साहजिकच असे मजूर उपाशी दूरवरून पायी पायी आपल्या गावाकडे येत आहेत. पिंपळशेत, सुतारपाडा येथील मजूर घोटी येथून पायी येत असताना अंबोली फाट्यादरम्यान दिसले. खूप थकलेले, भागलेले, भुकेमुळे व्याकुळ झालेले व तहानलेले असे हे लोक. कोणी पायाने लंगडत होते. डोक्यावर मोठे मोठे ओझे काही वृद्ध बघून गाडी थांबवली आणि विचारपूस केली असता दोन दिवसांपासून पायी चालून थकले होते. त्यांना आंब्याच्या झाडाखाली सावलीत बसून पाणी बिस्किटांची सोय करून गाडी पाठवून त्यांच्या गावी सोडायची व्यवस्था केली.

 

टॅग्स :OzarओझरHealthआरोग्य