शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
2
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
3
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
4
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
5
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
6
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
7
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
8
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
9
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य
10
HDB Financial Services IPO चा प्राईज बँड ठरला; 'या' तारखेपासून लावता येणार बोली, पाहा डिटेल्स
11
SNB report: स्विस बँकेंत भारतीयांचा पैसा वाढला तिप्पट, आकडा ऐकून चक्रावून जाल!
12
'दक्षिणायन' ही देवांची रात्र का समजली जाते? या काळात कोणत्या गोष्टी टाळायला हव्या? वाचा!
13
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशी समलैंगिक, तिला..."; ज्योतिषाचा खळबळजनक दावा, भविष्यवाणी ठरलीय खरी
14
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
15
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
16
IND vs ENG : हेडिंग्लेच्या मैदानात कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
17
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
18
दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं वाटतं का? सायली संजीव म्हणाली- "त्या दोघांनाही..."
19
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
20
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?

बदल्यांविरोधात शिक्षकांचा मोर्चा

By admin | Updated: June 18, 2017 01:05 IST

स्थगिती देण्याची मागणी : २७ फेब्रुवारीच्या शासन निर्णयाविरोधात आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या सर्वसाधारण बदल्यांविषयी २७ फेब्रुवारीच्या शासन निर्णयाविरोधात नाशिक जिल्हा शिक्षक संघटना समन्वय समितीने शनिवारी (दि.१७) जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषदेवर मोर्चा काढून बदल्यांच्या निषेध नोंदवला. बदल्यांविषयीच्या निर्णयातील त्रुटी दुरु स्त करण्याचे आश्वासन प्रशासनाने पाळले नसल्याचा आरोप करीत शिक्षकांनी शहरातून मोर्चा काढून २०१७-१८ शैक्षणिक वर्षासाठी शिक्षकांच्या बदल्या स्थगित करण्याची मागणी केली. राज्यातील प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीने शासनासोबत शिक्षकांच्या बदल्या व अन्य प्रलंबित प्रश्नांबाबत चर्चा व पत्रव्यवहार करूनही केवळ आश्वासनाशिवाय कोणताही ठोस निर्णय झाला नाही. प्रशासनाने बदल्यांविषयीच्या निर्णयातील त्रुटींमध्ये दुरु स्ती करण्याचे आश्वासन पाळले नाही. त्यामुळे राज्य शिक्षक संघटना समन्वय समितीने शनिवारी मोर्चा काढून आंदोलन केले. या माध्यमातून शिक्षक संघटनांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेतील १०० टक्के विद्यार्थ्यांना गणवेश मिळावा, २७ फेब्रुवारी २०१७ च्या बदलीविषयक शासन निर्णयात समन्वय समितीने सुचिवल्याप्रमाणे बदल करण्यात यावा, १५ जूनपासून शाळा सुरू झाल्याने विद्यार्थीहितासाठी यावर्षीच्या बदल्या रद्द करून जाचक अटींची दुरु स्ती करावी, शाळांच्या विद्युत बिलाची तरतूद करून आॅनलाइन कामासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करण्यात याव्यात, १ नोव्हेंबर २००५ नंतरच्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, संगणक प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी सप्टेंबर २०१७ पर्यंत मुदतवाढ द्यावी, पतसंस्थेची अट न ठेवता अंशकालीन निर्देशकांची पदे प्रत्येक शाळेत भरण्यात यावी, वसतिशाळा शिक्षकांची जुनी सेवा कायम करण्यात यावी, मासिक वेतन दरमहा एक तारखेस व्हावे, पदवीधर शिक्षकांना सरसकट ४३०० ग्रेड पे देण्यात यावा, उपशिक्षणाधिकारी व तत्सम पदांच्या स्पर्धा परीक्षांसाठी प्राथमिक शिक्षकास पात्र ठरवावे, शालेय पोषण आहार व बांधकामे मुख्याध्यापकांकडून काढून घ्यावीत, सर्व शाळांना मोफत वीज व पाणी द्यावे यांसह वेगवेगळ्या मागण्यांसाठी जिल्ह्यातील शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने शनिवारी जिल्हा परिषद व जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. विविध मागण्यांचे फलक हातातशिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांसह बदल्या स्थगित करण्यासाठी शिक्षकांनी गोल्फ क्लब मैदान येथून काढलेला मोर्चा पहिल्यांदा जिल्हा परिषदेवर येऊन धडकला. येथे शिष्टमंडळाने मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन दिले. त्यानंतर शालिमार, रेडक्रॉस सिग्नल व एमजी रोडमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा आल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात समन्वय समितीच्या शिष्टमंडळाने निवेदन दिले. दोन्ही कार्यालयात निवेदन सादर केल्यानंतर छत्रपती शिवाजी स्टेडिअम येथे मोर्चाचा समारोप करण्यात आला. मोर्चातील शिक्षक अधूनमधून बदल्या रद्द झाल्याचं पाहिजे, जुनी पेन्शन लागू करा, अशा घोषणा देत होते. मागण्यांचे फलक हातात घेऊन मोठ्या संख्येने शिक्षक-शिक्षिका मोर्चात सहभागी झाले होते.