शहरं
Join us  
Trending Stories
1
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
2
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
3
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
4
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
5
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
6
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
7
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
8
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा
9
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
10
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
11
वनडेतही नवे पर्व! रोहित शर्माचं मोठं स्वप्न भंगलं; गिलच्या कॅप्टन्सीत किंग कोहलीसमोरही असेल चॅलेंज
12
"अरे बिट्टू, मी तुझ्यासाठी काय केलं नाही, तरीही तू..."  मुलीचा ब्रेकअपनंतरचा व्हिडीओ व्हायरल!
13
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
14
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
15
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला १ रुपयांचा शिक्का करेल कमाल, नशीब उजळेल, व्हाल मालामाल 
16
धक्कादायक घटना ; 'कफ सिरप' घेतल्याने आठ बालकांचा मृत्यू ! जीव जाण्याला काय ठरले कारणीभूत ?
17
हृदयद्रावक! बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; ढसाढसा रडत नवऱ्याने ४ मुलांसह नदीत मारली उडी
18
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; रोहित शर्माला ठेंगा! शुबमन गिल वनडेचा नवा कॅप्टन
19
"हात पाय सलामत ठेवायचे असतील तर…", आमदार संतोष बांगर यांची अधिकाऱ्यांना धमकी, कॉल रेकॉर्डिंग व्हायरल
20
IND vs WI: मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजाची कमाल; सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडीजचा खेळ खल्लास!

शिक्षकांची अन्नत्याग पायी दिंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2020 18:41 IST

येवला : प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना अनुदान द्यावे, विनाअनुदानित, अंशत: अनुदानित व अतिरिक्त शिक्षकांना सेवा संरक्षण मिळावे या मागणीसाठी औरंगाबाद येथून चार शिक्षक अन्नत्याग पायी दिंडीने मंत्रालयाकडे निघाले आहेत.

येवला : प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना अनुदान द्यावे, विनाअनुदानित, अंशत: अनुदानित व अतिरिक्त शिक्षकांना सेवा संरक्षण मिळावे या मागणीसाठी औरंगाबाद येथून चार शिक्षक अन्नत्याग पायी दिंडीने मंत्रालयाकडे निघाले आहेत. नवयुग शिक्षक क्र ांती संघटनेचे अध्यक्ष प्रा. गजानन खैरे व अनिस कुरेशी यांनी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन पुकारले आहे. बुधवारी औरंगाबाद येथून निघालेले हे शिक्षक सुरेगाव रस्ता (ता. येवला) येथे गुरुवारी, (दि.३०) रात्री मुक्कामी होते. राज्यातील शंभर टक्के अनुदानाला पात्र शाळांना प्रचलित नियमाप्रमाणे शासन निर्णयानुसार अनुदान द्यावे, १३ सप्टेंबर २०१९च्या शासन निर्णयातील घोषित, अघोषित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक नैसर्गिक तुकड्यांना निधीसह प्रचलित नियमानुसार अनुदान द्यावे तसेच अतिरिक्त शिक्षकांना सेवा संरक्षण द्यावे या त्यांच्या मागण्या आहेत. मागण्या मान्य करून १५ ते १८ वर्षांपासून विनावेतन काम करत असलेल्या शिक्षकांना न्याय द्यावा, अशी विनंती आंदोलनकर्ते शिक्षक गजानन खैरे आणि अनिस कुरेशी यांनी शिक्षण विभागाला केली आहे.दरम्यान, अन्नत्याग दिंडीचा तिसरा दिवस असून, पायाला फोडं आली आणि तब्येत खालावली तरी आम्ही मागे हटणार नाही, असे सांगून शासन आश्वासने देते मात्र कृती करत नसल्याने अनेक शिक्षक वेतन नसल्याने रोजंदारी करून उदरनिर्वाह करत आहेत. त्यामुळे शासनाने ठोस निर्णय घ्यावा, या मागणीसाठी आणि राज्यातील ५० हजार शिक्षकांच्या न्यायहक्कासाठी हे आंदोलन सुरू केल्याचे खैरे यांनी सांगितले.

टॅग्स :Nashikनाशिक