शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी वाऱ्यावरच

By admin | Updated: May 5, 2015 01:07 IST

शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी वाऱ्यावरच

नाशिक : राज्यातील सुमारे पन्नास हजार अतिरिक्त शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा प्रश्न सोडविण्यासाठी शिक्षण खात्याने नियुक्त केलेल्या आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समितीची दोन महिन्यांची मुदत संपून गेली. तरीही अद्याप एकही बैठक न झाल्याने शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी वाऱ्यावरच असल्याचे दिसत आहे. शासनाच्या या अनास्थामुळे सध्या अतिरिक्त ठरलेल्या हजारो कर्मचाऱ्यांमध्ये मात्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.राज्यात शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी संख्येचे निकष बदलण्यात आले आणि तुकडीऐवजी पटसंख्येच्या आधारे पदे निश्चित करण्यात येतात. परिणामी निकषापेक्षा एक विद्यार्थी कमी असला तरी हजारो शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अतिरिक्तठरवणे त्यांना अन्य शाळेत सामावून घेणे आणि शिक्षकेतरांचे पद अतिरिक्त ठरविण्याचे प्रकार सुरू आहेत. त्याचाच फटका गेल्या वर्षी हजारो शिक्षक आणि शिक्षकेतरांना बसला. या प्रकाराच्या विरोधात राज्यात दोन वेळा शिक्षण संस्थांनी बंद पाळून आक्रमक आंदोलन केल्यानंतर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या दालनात बैठक घेण्यात आली. या बैठकीत अतिरिक्त कर्मचाऱ्यांच्या आकृतीबंधाचा प्रश्न सोडविण्यासाठी समिती आमदार आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधींचा समावेश असलेली समिती नियुक्त करण्याचे ठरले आणि या समितीने शिफारसी केल्यानंतर त्यानुसार कायद्यात सुधारणा करण्याचे ठरले. त्यानुसार १२ फेब्रुवारी २०१५ रोजी राज्यशासनाने शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली असून, त्यात आमदार रामनाथ मोते, नागो गाणोर, शिक्षण संचालक (प्राथमिक), मुख्याध्यापक महामंडळाचे अध्यक्ष निमंत्रक अरुण थोरात, राज्य शिक्षण परिषदेचे अध्यक्ष वेणूनाथ कडूू, महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर कानडे, महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनांचे महामंडळाचे शिवाजी खांडेकर, शिक्षण विभागाचे उपसचिव आणि वित्त विभागाचे सहसचिव हे समितीचे सदस्य असून, शिक्षण संचालक समितीचे सदस्य सचिव आहेत. दोन महिन्यात या समितीने बैठक घेऊन चिपळूणकर समितीचा विचार करावा आणि त्यानंतर अहवाल सादर करावा, असे शासनाच्या निर्णयात म्हटले आहे. तथापि, १२ एप्रिल रोजी दोन महिने पूर्ण होऊनही समितीची एकही बैठक झाली नाही. दुसरीकडे हजारो कर्मचारी या समितीच्या शिफारसींकडे डोळे लावून बसले असताना त्यांची मात्र फसवणूक झाली आहे. विशेषत: हजारो शिक्षकेतरांचे आॅफलाइन वेतन नियमित होत नसल्याने त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. (प्रतिनिधी)