शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी वाऱ्यावरच

By admin | Updated: May 5, 2015 01:07 IST

शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी वाऱ्यावरच

नाशिक : राज्यातील सुमारे पन्नास हजार अतिरिक्त शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा प्रश्न सोडविण्यासाठी शिक्षण खात्याने नियुक्त केलेल्या आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समितीची दोन महिन्यांची मुदत संपून गेली. तरीही अद्याप एकही बैठक न झाल्याने शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी वाऱ्यावरच असल्याचे दिसत आहे. शासनाच्या या अनास्थामुळे सध्या अतिरिक्त ठरलेल्या हजारो कर्मचाऱ्यांमध्ये मात्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.राज्यात शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी संख्येचे निकष बदलण्यात आले आणि तुकडीऐवजी पटसंख्येच्या आधारे पदे निश्चित करण्यात येतात. परिणामी निकषापेक्षा एक विद्यार्थी कमी असला तरी हजारो शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अतिरिक्तठरवणे त्यांना अन्य शाळेत सामावून घेणे आणि शिक्षकेतरांचे पद अतिरिक्त ठरविण्याचे प्रकार सुरू आहेत. त्याचाच फटका गेल्या वर्षी हजारो शिक्षक आणि शिक्षकेतरांना बसला. या प्रकाराच्या विरोधात राज्यात दोन वेळा शिक्षण संस्थांनी बंद पाळून आक्रमक आंदोलन केल्यानंतर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या दालनात बैठक घेण्यात आली. या बैठकीत अतिरिक्त कर्मचाऱ्यांच्या आकृतीबंधाचा प्रश्न सोडविण्यासाठी समिती आमदार आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधींचा समावेश असलेली समिती नियुक्त करण्याचे ठरले आणि या समितीने शिफारसी केल्यानंतर त्यानुसार कायद्यात सुधारणा करण्याचे ठरले. त्यानुसार १२ फेब्रुवारी २०१५ रोजी राज्यशासनाने शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली असून, त्यात आमदार रामनाथ मोते, नागो गाणोर, शिक्षण संचालक (प्राथमिक), मुख्याध्यापक महामंडळाचे अध्यक्ष निमंत्रक अरुण थोरात, राज्य शिक्षण परिषदेचे अध्यक्ष वेणूनाथ कडूू, महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर कानडे, महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनांचे महामंडळाचे शिवाजी खांडेकर, शिक्षण विभागाचे उपसचिव आणि वित्त विभागाचे सहसचिव हे समितीचे सदस्य असून, शिक्षण संचालक समितीचे सदस्य सचिव आहेत. दोन महिन्यात या समितीने बैठक घेऊन चिपळूणकर समितीचा विचार करावा आणि त्यानंतर अहवाल सादर करावा, असे शासनाच्या निर्णयात म्हटले आहे. तथापि, १२ एप्रिल रोजी दोन महिने पूर्ण होऊनही समितीची एकही बैठक झाली नाही. दुसरीकडे हजारो कर्मचारी या समितीच्या शिफारसींकडे डोळे लावून बसले असताना त्यांची मात्र फसवणूक झाली आहे. विशेषत: हजारो शिक्षकेतरांचे आॅफलाइन वेतन नियमित होत नसल्याने त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. (प्रतिनिधी)