शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

मनपा माध्यमिक शाळांमध्ये शिक्षक भरतीची प्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 00:36 IST

महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या माध्यमिक शाळांमधील रिक्त असलेली शिक्षकांची २१ पदे भरण्याची प्रक्रिया येत्या आठ-दहा दिवसांत राबविण्यात येणार असून, खासगी एजन्सीमार्फत इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जाणार असल्याची माहिती शिक्षण विभागाचे प्रशासनाधिकारी नितीन उपासनी यांनी दिली.

नाशिक : महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या माध्यमिक शाळांमधील रिक्त असलेली शिक्षकांची २१ पदे भरण्याची प्रक्रिया येत्या आठ-दहा दिवसांत राबविण्यात येणार असून, खासगी एजन्सीमार्फत इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जाणार असल्याची माहिती शिक्षण विभागाचे प्रशासनाधिकारी नितीन उपासनी यांनी दिली.  महापालिकेच्या शिक्षण विभागामार्फत १३ माध्यमिक शाळा चालविल्या जातात. या माध्यमिक शाळांमध्ये सध्या ५३ शिक्षक कार्यरत असून, २१ शिक्षकांची पदे रिक्त आहेत. सदर पदे भरण्यास महासभेने मान्यता दिल्यानंतर इच्छुक पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले होते. त्यानुसार, २१ पदांसाठी ९७६ उमेदवारांनी अर्ज केले आहेत. सदर प्राप्त अर्जांमधून पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे.  सदर मुलाखती या मनपा शिक्षण विभागामार्फत न घेता त्यासाठी खासगी एजन्सी नेमण्याचा प्रस्ताव आयुक्तांकडे मान्यतेसाठी ठेवण्यात आला आहे. सदर मुलाखती घेण्यासाठी खासगी एजन्सी नेमण्याकरिता निविदा मागविल्या होत्या. त्यात पाच एजन्सीने प्रतिसाद दिला आहे. एजन्सी मान्यतेनंतर प्रत्यक्ष मुलाखतींचा कार्यक्रम राबविला जाणार आहे. याशिवाय, महापालिकेच्या उर्दू माध्यमांच्या शाळांमधील ३४ शिक्षकांची पदे रिक्त आहेत.  सदर पदे भरण्याकरिताही लवकरच जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे. माध्यमिक व उर्दू माध्यमातील शिक्षकांच्या या भरती प्रक्रियेमुळे रिक्त असणाºया पदांचा प्रश्न मिटणार आहे.प्राथमिकमध्येही पदे रिक्त महापालिकेच्या १२९ प्राथमिक शाळा आहेत. सुमारे ९५० शिक्षक असून, १०४ शिक्षकांची पदे रिक्त आहेत. सदर पदे भरण्यासाठी मात्र शासनाचीच परवानगी लागणार आहे. तूर्त प्राथमिक शाळांसाठी शिक्षकांची गरज नसल्याचे सांगितले जाते.