शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक अडचणीत : सरकारविरोधात पुकारला एल्गार विना अनुदानित शाळांना अनुदान देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 00:19 IST

महाराष्ट्र शासनाने कायम विना अनुदानित धोरण स्वीकारले त्यास आता १७ वर्ष पूर्ण होत आहेत.

ठळक मुद्देमाय-बाप सरकार सांगा आम्ही जगायचं कसं? किमान ५० टक्के अनुदान देण्याची इच्छामतलबी, खोटारडेपणा जग जाहीर झाला

येवला : महाराष्ट्र शासनाने कायम विना अनुदानित धोरण स्वीकारले त्यास आता १७ वर्ष पूर्ण होत आहेत. गेल्या १७ वर्षांपासून विना वेतन ज्ञानदानाचे काम करणाºया शिक्षकांचे घर-कुटुंब आर्थिक संकटात असून, महाराष्ट्र विधानसभा व लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनात शिक्षण हक्क कायद्याचे पालन करण्याकरता राज्य व केंद्र सरकारने अर्थसंकल्पात विना अनुदानित शाळा, तुकड्यांना सरसकट १०० टक्के अनुदानाची तरतूद करून सर्व कायम विना अनुदानित, विना अनुदानित शाळा, तुकड्यांना विना अट अनुदान द्यावे, या मागणी विनाअनुदानित शिक्षकांच्या पत्नींनी सरकारविरोधी एल्गार पुकारला आहे.माय-बाप सरकार सांगा आम्ही जगायचं कसं? असा सवाल त्यांनी थेट राष्ट्रपती, प्रधानमंत्री, राज्याचे मुख्यमंत्री व शिक्षणमंत्री यांना पत्राद्वारे केला आहे. अध्यापक भारतीच्या संघटनेने याबाबत पुढाकार घेतला आहे. शिक्षणासारख्या मूलभूत बाबीसाठी कायम विना अनुदानित धोरण स्वीकारु न गेल्या १७ वर्षात या शाळा व तुकड्या चालविन्यासाठी टप्प्या-टप्प्याने किमान ५० टक्के अनुदान देण्याची इच्छा, तयारी शासन करू शकले नाही. वेठ बिगारा प्रमाणे शिक्षक राबत असून त्याने त्याचा प्रपंच, संसार, कुटुंब चालवायचं कसं असा सवाल पत्रात उपस्थित करण्यात आला आहे. सरकारच्या कायम विना अनुदानित धोरणामुळे शिक्षक कर्मचाºयांचे कुटुंब बेजार झाले आहे. राज्यकर्त्यांच्या इच्छा शक्ती व नकारात्मक धोरणाचे ते सर्वच बळी झाले आहे. मागसवर्गाचा ६८ वर्षात अनुशेष भरला नाही. आजही मागास वर्गाच्या जागांवर काम करणारे कर्मचारी, संस्थांवर कार्यवाही न करण्याचा शासन कर्त्यांच्या मतलबी, खोटारडेपणा जग जाहीर झाला आहे. सरकार व संस्था चालकांनी मागास वर्गातील जागेवर खुला प्रवर्ग कर्मचारी नियुक्त करून मागास वर्गाच्या पिढ्या उध्वस्त केल्या आहेत. असा आरोप पत्रात करण्यात आला आहे. एका बाजूला केंद्र राज्य सरकार शिक्षण हाक्क कायदा करून वय वर्ष ६ ते १४ वयोगटातील बालकाच्या शिक्षणाची कायदेशीर जबाबदारी घेते तर दुसºया बाजूला त्याच विद्यार्थाना अध्यापन करणाºया शिक्षकांना विना वेतन १७ वर्षांपासून फुकटात राबवते, वेठिबगार म्हणून वागणूक देते ? असंख्य कर्मचाºयांना तर शिक्षण विभागाची साधी मान्यताही नाही. २० टक्के अनुदानाची फसवी घोषणा आंदोलन फोडण्या करता केलेला डाव होता. हे वास्तव समोर आले आहे. सातव्या वेतन आयोगासाठी अब्जावधींची तरतूद होऊ शकते, मग १७ वर्षांहून अधिक काळ फुकट राबणाºया लाचार, गुलाम शिक्षकांवर अन्याय का, असा सवाल करीत आता केवळ निवेदन देऊन आम्ही विना अनुदानित शिक्षक कर्मचारी यांच्या पत्नी स्वस्त बसणार नसून तीव्र आंदोलनाची दिशा निश्चित करणार आहेत. नाशिक जिल्ह्यातील सर्व कायम विना अनुदानित शिक्षक पत्नी व कुटुंबातील व्यक्तींसह अध्यापक भारतीचे संस्थापक शरद शेजवळ,महिला-पालक प्रतिनिधी विनता सरोदे अ‍ॅड अरु ण दोंदे यासाठी प्रयत्न करीत आहेत.