शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

जिल्हाधिकाऱ्यांच्या पूर्वसंमतीनेच करवाढविरोधी सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 00:45 IST

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शहरातील नवीन मिळकती आणि मोकळ्या भूखंडांसाठी केलेल्या करवाढीमुळे संतप्त झालेल्या सर्वपक्षीयांनी एकत्र येऊन घेतलेल्या महासभेत करवाढ स्थगित करण्याचा निर्णय घेतला खरा; परंतु आयुक्तांनी आचारसंहिता भंग केल्याची तक्रार करणारा ठरावदेखील आचारसंहिता भंगाच्या कचाट्यात सापडण्याची शक्यता आहे.

नाशिक : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शहरातील नवीन मिळकती आणि मोकळ्या भूखंडांसाठी केलेल्या करवाढीमुळे संतप्त झालेल्या सर्वपक्षीयांनी एकत्र येऊन घेतलेल्या महासभेत करवाढ स्थगित करण्याचा निर्णय घेतला खरा; परंतु आयुक्तांनी आचारसंहिता भंग केल्याची तक्रार करणारा ठरावदेखील आचारसंहिता भंगाच्या कचाट्यात सापडण्याची शक्यता आहे. त्यामुळे महासभेचा ठराव अद्यापही महापौरांनी जिल्हाधिकाºयांकडे पाठविलेला नाही. दुसरीकडे, सदरची महासभा ही जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांच्या पूर्वमान्यतेनेच घेतल्याचा दावा महापौर रंजना भानसी यांनी केला आहे.  महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ३१ मार्च रोजी मोकळे भूखंड आणि नवीन बांधीव मिळकतींवर करवाढ करण्यासंदर्भातील अधिसूचना जारी केली आहे. त्यावेळी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १३ च्या एका जागेसाठी पोटनिवडणुकीची प्रक्रिया सुरू होती. म्हणजेच आदर्श आचारसंहिता सुरू असताना आयुक्तांनी निर्णय घेतला असा आरोप २३ एप्रिल रोजी करवाढीच्या विरोधातील विशेष महासभेत करण्यात आला होता. त्यासंदर्भात जिल्हाधिकाºयांकडे तक्रार करण्याचा ठरावही करण्यात आला होता; परंतु त्यानंतर जिल्हाधिकाºयांनीच महापौरांना अशा प्रकारचा ठराव पाठवू नका अन्यथा अडचणीत याल, असा अनाहुत सल्ला दिल्याचे सांगण्यात येत होते. त्याचे कारण म्हणजे आयुक्तांनी ज्याप्रमाणे महापालिकेच्या पोटनिवडणुकीची आचारसंहिता सुरू असताना निर्णय घेतला, त्याच पद्धतीने महासभेचा निर्णयदेखील विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पोटनिवडणुकीची आचारसंहिता सुरू असताना घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे, आयुक्तांनी करवाढ करण्याची अधिसूचना काढली होती तर महासभेने करवाढ स्थगित करणारा निर्णय घेतल्याने ते अधिक अडचणीचे ठरल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकारामुळे महासभेत आयुक्तांच्या विरोधात आचारसंहिता भंगाची तक्रार करण्याचा निर्णय घेऊनही प्रत्यक्षात मात्र महापौरांनी ठराव जिल्हाधिकाºयांकडे पाठविलेला नाही.  २३ एप्रिल रोजी करवाढीच्या विरोधात बोलावण्यात आलेली महासभा ही नाशिककरांच्या भावना व्यक्त करण्यासाठी होती, त्यातच ती जिल्हाधिकाºयांच्या पूर्वपरवानगीने घेण्यात आली होती, असे महापौर भानसी यांनी सांगितले.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका