शहरं
Join us  
Trending Stories
1
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
2
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
3
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
4
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
5
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
6
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
7
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
8
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
9
Viral Video: "ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
10
पदकं फेकली, प्रमाणपत्रं फाडली, भाजपा खासदारांच्या क्रीडा महोत्सवात खेळाडूंचा संताप, कारण काय?
11
"दोषींना शिक्षा झालीच पाहिजे..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येवरून भारताने सुनावलं
12
थरकाप उडवणारा VIDEO! चिनी शस्त्रांची पुन्हा पोलखोल, थायलंड विरोधात वापरताना रॉकेट सिस्टिमचाच स्फोट; कंबोडियाच्या 8 जवानांचा मृत्यू
13
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
14
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
15
भाजपा आमदारांच्या ‘ब्राह्मण भोजना’मुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणात खळबळ, भाजपामध्ये चाललंय काय? 
16
काही केलं तरी रात्री झोपच येत नाही? मग करा 'हे' एक छोटसं काम; १० मिनिटांत व्हाल डाराडूर
17
Shehnaaz Gill : "इथे सगळे राक्षस, मी खूप स्ट्रगल...", शहनाज गिलची झाली फसवणूक, इंडस्ट्रीबद्दल मोठा खुलासा
18
उद्धव ठाकरेंच्या भेटीत काय ठरले? जागावाटपाबाबत बैठकीत चर्चा झाली का?; जयंत पाटील म्हणाले...
19
अडीच वर्षातील काम जनता विसरणार नाही; शिवसेनेत येताच प्रकाश महाजनांचे शिंदेंबाबत कौतुकोद्गार
Daily Top 2Weekly Top 5

तळवाडे भामेर कालव्याला गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2020 01:19 IST

सटाणा : बागलाण तालुक्यातील तळवाडे भामेर येथील धरण २५वर्षानंतर पहिल्यांदाच पूर्ण क्षमतेने भरून धरणाच्या बांधाखालून गढूळ पाणी मोठया प्रमाणावर ...

ठळक मुद्देअनर्थ टळला : पावसाचा जोर वाढल्यास धोका कायम, प्रशासनाकडून उपाययोजना

सटाणा : बागलाण तालुक्यातील तळवाडे भामेर येथील धरण २५वर्षानंतर पहिल्यांदाच पूर्ण क्षमतेने भरून धरणाच्या बांधाखालून गढूळ पाणी मोठया प्रमाणावर वाहून जात असल्याचे स्थानिक नागरिकांना आढळून आल्याने धरण फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. प्रशासनाने तात्पुरती उपाययोजना केल्याने मोठा अनर्थ तूर्तास टळला असला तरी पावसाचा जोर वाढल्यास धोका कायम असल्याचे सांगितले जात आहे.बागलाण तालुक्यातील तळवाडे भामेर येथील ४५ दलघफू क्षमता असलेले धरण १९९४ नंतर पहिल्यांदा पूर्ण क्षमतेने भरले. मात्र धरणाच्या बांधाखालून गढूळ पाणी मोठया प्रमाणात वाहू लागल्याने धरण फुटण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र स्थानिक नागरिकांनी हा धोका ओळखून आमदार दिलीप बोरसे यांना याबाबत माहिती दिली असता बोरसे यांनी प्रांत विजय भांगरे, तहसीलदार जितेंद्र इंगळे,जलसंपदा विभागाचे अभियंता अभिजित रौदळ,शाखा अभियंता वाय जी पगार,पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जितेंद्र कोल्हे आदींनी घटनास्थळी धाव घेत पॉकलँड मशीनव्दारे तातडीची उपाययोजना करत सांडवा मोठा केला.धरणातील पाणी कमी करून संभाव्य धोका टाळण्यासाठी अधिकाऱ्यांकडून शर्थीचे प्रयत्न करण्यात आले असून धरण फुटल्याची शोशल मिडियावर अफवा पसरल्याने धरण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.तळवाडे धरण फुटण्याची शक्यता आहे. यामुळे मोठे नुकसान होणार असल्याचा फोन आला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ प्रशासनाच्या अधिका?्यांशी संपर्क साधून घटनास्थळी गेलो. पोकलँड मशीन उपलब्ध करून सांडव्यातून वाढीव पाणी काढून धरण फुटण्याचा धोका कमी झाला असून पुढील काम देखील युद्धपातळीवर सुरू आहे.- दिलीप बोरसे, आमदारतळवाडे धरण १९९४ नंतर प्रथमच पूर्णक्षमतेने भरले आहे.वेळोवेळी पाणी लिकेज होऊ नये म्हणून त्याची देखभाल दुरुस्ती होणे गरजेचे होते. परंतु या धरणाच्या क्षेत्रात पाऊस कमी असल्याने त्याच्याकडे जलसंधारण विभागाचे दुर्लक्ष झालेले होते. धरणाला धोका निर्माण होऊन काही कमी-जास्त घडले तर याची जबाबदारी कोणाची?-अभिमन पगार, सामाजिक कार्यकर्ते, उत्राने.  

 

टॅग्स :water pollutionजल प्रदूषणRainपाऊस