शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

तळवाडे भामेर कालव्याला गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2020 01:19 IST

सटाणा : बागलाण तालुक्यातील तळवाडे भामेर येथील धरण २५वर्षानंतर पहिल्यांदाच पूर्ण क्षमतेने भरून धरणाच्या बांधाखालून गढूळ पाणी मोठया प्रमाणावर ...

ठळक मुद्देअनर्थ टळला : पावसाचा जोर वाढल्यास धोका कायम, प्रशासनाकडून उपाययोजना

सटाणा : बागलाण तालुक्यातील तळवाडे भामेर येथील धरण २५वर्षानंतर पहिल्यांदाच पूर्ण क्षमतेने भरून धरणाच्या बांधाखालून गढूळ पाणी मोठया प्रमाणावर वाहून जात असल्याचे स्थानिक नागरिकांना आढळून आल्याने धरण फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. प्रशासनाने तात्पुरती उपाययोजना केल्याने मोठा अनर्थ तूर्तास टळला असला तरी पावसाचा जोर वाढल्यास धोका कायम असल्याचे सांगितले जात आहे.बागलाण तालुक्यातील तळवाडे भामेर येथील ४५ दलघफू क्षमता असलेले धरण १९९४ नंतर पहिल्यांदा पूर्ण क्षमतेने भरले. मात्र धरणाच्या बांधाखालून गढूळ पाणी मोठया प्रमाणात वाहू लागल्याने धरण फुटण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र स्थानिक नागरिकांनी हा धोका ओळखून आमदार दिलीप बोरसे यांना याबाबत माहिती दिली असता बोरसे यांनी प्रांत विजय भांगरे, तहसीलदार जितेंद्र इंगळे,जलसंपदा विभागाचे अभियंता अभिजित रौदळ,शाखा अभियंता वाय जी पगार,पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जितेंद्र कोल्हे आदींनी घटनास्थळी धाव घेत पॉकलँड मशीनव्दारे तातडीची उपाययोजना करत सांडवा मोठा केला.धरणातील पाणी कमी करून संभाव्य धोका टाळण्यासाठी अधिकाऱ्यांकडून शर्थीचे प्रयत्न करण्यात आले असून धरण फुटल्याची शोशल मिडियावर अफवा पसरल्याने धरण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.तळवाडे धरण फुटण्याची शक्यता आहे. यामुळे मोठे नुकसान होणार असल्याचा फोन आला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ प्रशासनाच्या अधिका?्यांशी संपर्क साधून घटनास्थळी गेलो. पोकलँड मशीन उपलब्ध करून सांडव्यातून वाढीव पाणी काढून धरण फुटण्याचा धोका कमी झाला असून पुढील काम देखील युद्धपातळीवर सुरू आहे.- दिलीप बोरसे, आमदारतळवाडे धरण १९९४ नंतर प्रथमच पूर्णक्षमतेने भरले आहे.वेळोवेळी पाणी लिकेज होऊ नये म्हणून त्याची देखभाल दुरुस्ती होणे गरजेचे होते. परंतु या धरणाच्या क्षेत्रात पाऊस कमी असल्याने त्याच्याकडे जलसंधारण विभागाचे दुर्लक्ष झालेले होते. धरणाला धोका निर्माण होऊन काही कमी-जास्त घडले तर याची जबाबदारी कोणाची?-अभिमन पगार, सामाजिक कार्यकर्ते, उत्राने.  

 

टॅग्स :water pollutionजल प्रदूषणRainपाऊस