शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

तळवाडे भामेर कालव्याला गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2020 01:19 IST

सटाणा : बागलाण तालुक्यातील तळवाडे भामेर येथील धरण २५वर्षानंतर पहिल्यांदाच पूर्ण क्षमतेने भरून धरणाच्या बांधाखालून गढूळ पाणी मोठया प्रमाणावर ...

ठळक मुद्देअनर्थ टळला : पावसाचा जोर वाढल्यास धोका कायम, प्रशासनाकडून उपाययोजना

सटाणा : बागलाण तालुक्यातील तळवाडे भामेर येथील धरण २५वर्षानंतर पहिल्यांदाच पूर्ण क्षमतेने भरून धरणाच्या बांधाखालून गढूळ पाणी मोठया प्रमाणावर वाहून जात असल्याचे स्थानिक नागरिकांना आढळून आल्याने धरण फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. प्रशासनाने तात्पुरती उपाययोजना केल्याने मोठा अनर्थ तूर्तास टळला असला तरी पावसाचा जोर वाढल्यास धोका कायम असल्याचे सांगितले जात आहे.बागलाण तालुक्यातील तळवाडे भामेर येथील ४५ दलघफू क्षमता असलेले धरण १९९४ नंतर पहिल्यांदा पूर्ण क्षमतेने भरले. मात्र धरणाच्या बांधाखालून गढूळ पाणी मोठया प्रमाणात वाहू लागल्याने धरण फुटण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र स्थानिक नागरिकांनी हा धोका ओळखून आमदार दिलीप बोरसे यांना याबाबत माहिती दिली असता बोरसे यांनी प्रांत विजय भांगरे, तहसीलदार जितेंद्र इंगळे,जलसंपदा विभागाचे अभियंता अभिजित रौदळ,शाखा अभियंता वाय जी पगार,पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जितेंद्र कोल्हे आदींनी घटनास्थळी धाव घेत पॉकलँड मशीनव्दारे तातडीची उपाययोजना करत सांडवा मोठा केला.धरणातील पाणी कमी करून संभाव्य धोका टाळण्यासाठी अधिकाऱ्यांकडून शर्थीचे प्रयत्न करण्यात आले असून धरण फुटल्याची शोशल मिडियावर अफवा पसरल्याने धरण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.तळवाडे धरण फुटण्याची शक्यता आहे. यामुळे मोठे नुकसान होणार असल्याचा फोन आला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ प्रशासनाच्या अधिका?्यांशी संपर्क साधून घटनास्थळी गेलो. पोकलँड मशीन उपलब्ध करून सांडव्यातून वाढीव पाणी काढून धरण फुटण्याचा धोका कमी झाला असून पुढील काम देखील युद्धपातळीवर सुरू आहे.- दिलीप बोरसे, आमदारतळवाडे धरण १९९४ नंतर प्रथमच पूर्णक्षमतेने भरले आहे.वेळोवेळी पाणी लिकेज होऊ नये म्हणून त्याची देखभाल दुरुस्ती होणे गरजेचे होते. परंतु या धरणाच्या क्षेत्रात पाऊस कमी असल्याने त्याच्याकडे जलसंधारण विभागाचे दुर्लक्ष झालेले होते. धरणाला धोका निर्माण होऊन काही कमी-जास्त घडले तर याची जबाबदारी कोणाची?-अभिमन पगार, सामाजिक कार्यकर्ते, उत्राने.  

 

टॅग्स :water pollutionजल प्रदूषणRainपाऊस