शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

तलाठी सर्व्हरमुळे मेटाकुटीस,कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 18:44 IST

नाशिक : सातबारा उताºयाचे आॅनलाइन संगणकीकरण करणाºया तलाठी, मंडळ अधिकाºयांना पुन्हा एकदा महा आॅनलाइनच्या सर्व्हरचा फटका बसला असून, गेल्या चार दिवसांपासून सर्व्हर वेळोवेळी डाउन होत असल्याने कामकाज करणे कठीण झाले आहे. येत्या १२ आॅक्टोबरपर्यंत सर्व्हरच्या गतीत सुधारणा न झाल्यास सातबारा संगणकीकरणाचे कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा इशारा देण्यात आला आहे.शुक्रवारी या संदर्भात ...

नाशिक : सातबारा उताºयाचे आॅनलाइन संगणकीकरण करणाºया तलाठी, मंडळ अधिकाºयांना पुन्हा एकदा महा आॅनलाइनच्या सर्व्हरचा फटका बसला असून, गेल्या चार दिवसांपासून सर्व्हर वेळोवेळी डाउन होत असल्याने कामकाज करणे कठीण झाले आहे. येत्या १२ आॅक्टोबरपर्यंत सर्व्हरच्या गतीत सुधारणा न झाल्यास सातबारा संगणकीकरणाचे कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा इशारा देण्यात आला आहे.शुक्रवारी या संदर्भात तलाठी संघाने निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना निवेदन सादर केले. त्यात म्हटले आहे की, ई फेरफार इडिट, रि-ईडिटचे काम करत असताना सर्व्हरला स्पिड नसल्याने काम होत नाही. याबाबत आॅगस्ट महिन्यातही निवेदन देऊन लक्ष वेधण्यात आले होते. परंतु सर्व्हरचा वेग वाढलेला नाही. मागील आठवड्यात चार दिवस सर्व्हर बंद होते. त्यावेळी सर्वांचा स्पिड वाढेल अशी अपेक्षा होती. परंतु सर्व्हरचा स्पिड वाढण्याऐवजी कमी झाला. शेतकºयांना सातबारा उतारा देण्यासाठी ३० ते ३५ मिनिटे लागत आहे. ई फेरफार नोंदी टाकणे व प्रमाणित करण्याच्या कामातही सर्व्हरला स्पिड नसल्याने अनेक दस्त नोंदी टाकण्यासाठी प्रलंबित आहेत. जनतेची कामे वेळेवर होत नसल्याने तलाठी व मंडळ अधिकाºयांवर शेतकरी व जनता नाराज आहे. त्यातून वादविवादाचे प्रसंग घडत असून, जिल्ह्यातील सर्व तलाठी व मंडळ अधिकारी मानसिक तणावाखाली आले आहेत. दिवस-रात्र पूर्ण क्षमतेने काम करूनही सर्व्हरमुळे कामाची प्रगती दिसत नाही. त्यामुळे जनतेत महसूल खात्याची प्रतिमा मलीन होऊ लागली आहे. तलाठी व मंडळ अधिकाºयांनी कामावर बहिष्कार टाकावा असा दबाव वाढू लागला आहे. त्यामुळे येत्या ११ आॅक्टोबरपर्यंत सर्व्हरचा स्पीड वाढला नाही, तर १२ आॅक्टोबरपासून नाशिक जिल्ह्यातील सर्व तलाठी, मंडळ अधिकारी सातबारा आॅनलाइन कामावर बहिष्कार टाकतील, असेही निवेदनात म्हटले आहे. यावेळी एन. वाय. उगले, एम. एल. पवार, बी. व्ही. खेडकर यांच्यासह सर्व पदाधिकारी उपस्थित होते.