शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
3
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
4
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
5
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
7
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
8
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
9
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
10
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
11
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
12
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
13
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
14
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
15
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
16
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
17
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
18
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
19
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
20
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...

तलहा परतला; मात्र कोरोना दहशतीने एकांतातच...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2020 01:25 IST

सध्या संपूर्ण जगात कोरोनाच्या विषाणूची दहशत असून, चीनच्या वुहानमध्ये एमबीबीएसचे शिक्षण घेत असलेला येथील तलहा खलील अहमद शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजता घरी परतला, मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तलहाच्या कुटुंबीयांना त्याच्याशी कोणताही संपर्क न ठेवण्याच्या सक्त सूचना दिल्याने तलहा सध्यातरी एकांतातच आहे.

ठळक मुद्देमालेगावचा तरुण : वैद्यकीय पथकाची कुटुंबीयांशी भेट; आवश्यक सूचनाही दिल्या

शफीक शेखमालेगाव : सध्या संपूर्ण जगात कोरोनाच्या विषाणूची दहशत असून, चीनच्या वुहानमध्ये एमबीबीएसचे शिक्षण घेत असलेला येथील तलहा खलील अहमद शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजता घरी परतला, मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तलहाच्या कुटुंबीयांना त्याच्याशी कोणताही संपर्क न ठेवण्याच्या सक्त सूचना दिल्याने तलहा सध्यातरी एकांतातच आहे. दरम्यान रात्री शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पथकाने त्याच्या घरी जाऊन त्याच्यासह कुटुंबीयांची वैद्यकीय तपासणी करून काही सूचना केल्या. शनिवारी सकाळी पत्रकार परिषद घेऊन तलहाच्या प्रकृती आणि कोरोना विषाणूच्या संसर्गाविषयी वैद्यकीय अधिकारी माहिती देणार आहेत.सर्व जग कोरोना विषाणूच्या भीतीने ग्रासलेले असताना चीनमध्ये एमबीबीएसच्या शिक्षणासाठी गेलेला तलहा अहमद मालेगावी परतत असल्याचे वृत्त सर्वत्र पसरल्याने शहरातही कुतुहल आणि भीतीचे वातावरण होते. डॉक्टरांनीही तलहाच्या वडिलांना सक्त सूचना दिल्याने शुक्रवारी तलहाला कुणालाही भेटू दिले नाही. पत्रकारांकडून वारंवार संपर्क साधला जात असताना त्याचे कुटुंबीय मात्र काहीही बोलत नव्हते. वैद्यकीय अधिकारीदेखील काही बोलत नव्हते.दरम्यान, तलहा अहमदशी त्याचे वडील खलील अहमद यांनी मोबाइलवरून संपर्क साधून दिला. तलहा म्हणाला, मी चीनमध्ये होतो तेव्हाही वडील आणि कुटुंबीयांच्या संपर्कात होतो. आम्हाला विद्यापीठात बंद करून टाकण्यात आले होते. सर्व व्यवहार बंद झाले होते. विद्यापीठात आम्हाला मास्क पुरविण्यात येत होते. बाहेर कुणाशी संपर्क साधू दिला जात नव्हता. विद्यापीठाबाहेरून कुणीही मदत करीत नव्हता. केवळ विद्यापीठाकडूनच आम्हाला मदत मिळत होती. आम्हाला दैनंदिन लागणारे साहित्य विद्यापीठ बाहेरून पुरवित होते, मात्र घरी प्रचंड दहशत होती. आम्ही सुरक्षित आणि सुखरूप असल्याचे आम्ही रोज पालकांना सांगत होतो. भारतीय दुतावासाने आम्हा विद्यार्थ्यांना भारतात आणण्यासाठी प्रयत्न केले. सुमारे सातशे विद्यार्थ्यांना दिल्लीत आणले गेले. तेथे रक्ताचे नमुने घेतले गेले, त्यानंतर हरियानाच्या मणिसार मिलिटरी ट्रेनिंग कॅम्पमध्ये हलविण्यात आले. तेथे डॉक्टर्स रोज येऊन चेकअप करीत. रोज नियमित जेवण नेहमीप्रमाणे असे. कोणतेही बंधन नव्हते. सर्वांना वेगेवेगळ्या खोल्यांमध्ये ठेवले होते; तर मुलींना मात्र दिल्लीतच वेगवेगळे ठेवण्यात आले होते. आम्हाला वारंवार फोनवरून सूचना दिल्या जायच्या, मात्र आता पुढे काय होईल, कुठे पाठविले जाईल, याबाबत काही सांगितले जायचे नाही. महाराष्ट्रातील माझ्या परिचयाचे चार जण होते. त्यात एक जण नाशिकचा, तर इतर मुंबई, ठाणे आणि कल्याणचे विद्यार्थी होते.अखेर कालपर्यंत हरियानात शासकीय वैद्यकीय अधिकाºयांच्या निगराणीखाली राहिल्यानंतर आम्हाला कोणताही आजार नसल्याचे सर्टिफिकेट देऊन घरी जाण्याची परवानगी देण्यात आली. आता तलहा जरी मालेगावात आला असला तरी त्याला पंधरा दिवस वैद्यकीय अधिकाºयांच्या निगराणीखाली राहावे लागणार आहे. रोज शासकीय वैद्यकीय पथक त्याच्या घरी जाऊन वैद्यकीय तपासणी करणार आहे. त्याच्या कुुटुंबीयांचीही वैद्यकीय तपासणी केली जाणार असून, परिसरावर वैद्यकीय अधिकाºयांकडून लक्ष ठेवण्यात येणार आहे.आम्ही सर्व कुटुंबीय दहशतीत आहोत. आपल्या मुलाला समाजाकडून काही त्रास होऊ नये म्हणून त्याचा फोटो देण्यास वा फोटो काढू देण्यास सक्त मनाई केली, मात्र तरी त्याचे नातेवाईक आणि मित्र परिवार फोनवर संपर्क साधून प्रकृतीची चौकशी करीत आहेत.- खलील अहमद, तलहाचे वडील

टॅग्स :corona virusकोरोनाHealth Tipsहेल्थ टिप्स