शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

तलाठी परीक्षा; कागदपत्रे तपासणीची कसोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2019 01:59 IST

गेल्या २ जुलैपासून सुरू झालेल्या तलाठी पदासाठीची परीक्षा विद्यार्थ्यांसाठी कसोटीची ठरत आहे. परीक्षेच्या अर्ध्या तास आगोदर पोहचण्याची सक्ती आणि पुरावे म्हणून सादर केलेल्या ओळखपत्रे अनेकविध कारणांनी नाकारले जात असल्याने काही विद्यार्थी परीक्षेला मुकले असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत.

ठळक मुद्देविद्यार्थी मुकले : वेळेच्या मर्यादेचाही फटका

नाशिक : गेल्या २ जुलैपासून सुरू झालेल्या तलाठी पदासाठीची परीक्षा विद्यार्थ्यांसाठी कसोटीची ठरत आहे. परीक्षेच्या अर्ध्या तास आगोदर पोहचण्याची सक्ती आणि पुरावे म्हणून सादर केलेल्या ओळखपत्रे अनेकविध कारणांनी नाकारले जात असल्याने काही विद्यार्थी परीक्षेला मुकले असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत.महाराष्टÑ शासनाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या तलाठी महाभरती परीक्षेला गेल्या २ पासून प्रारंभ झाला आहे. शहरातील विविध सहा केंद्रांवर अठरा दिवस सदर परीक्षा घेतली जात आहे. ६१ जागांसाठी सुमारे ३० हजारांच्या जवळपास अर्ज आल्याने परीक्षेचा कालावधी वाढला असून, एका केंद्रावर दररोज किमान १५० ते २०० विद्यार्थ्यांची परीक्षा देत आहेत.सकाळी १० ते १२, दुपारी २.३० ते ४.३० या कालावधीत सदर परीक्षा घेतली जात आहे. परीक्षेला येणाºया उमेदवाराला ओळख म्हणून एखादे ओळखपत्र सादर करावे लागते. गेल्या गुरुवारी म्हसरूळ येथील केंद्रावर सकाळच्या सत्रात काही विद्यार्थ्यांना परीक्षेलाच बसू दिले जात नसल्याची तक्रारी आहेत. एका महिला उमेदवाराच्या परीक्षा हॉल तिकिटावर लग्नानंतरचे तर आधार कार्डावर लग्नापूर्वीचे नाव असल्याने सदर महिलेस परीक्षेला बसण्यास अपात्र ठरविण्यात आले.सदर महिला उमेदवाराकडे पुरावा म्हणून अन्य ओळखपत्र किंवा लग्नाचे प्रमाणपत्रही मागण्यात आले. परंतु धावपळीत प्रमाणपत्र घेऊन येण्यास विलंब होणार असल्याने संबंधित महिलेला परीक्षेस मुकावे लागले.याच केंद्रावर एका उमेदवाराकडे असलेले पॅनकार्डचे रंगीत झेरॉक्स असलेले ओळखपत्र नाकारण्यात आले. ओरिजन ओळखपत्र सादर करू न शकल्याने त्यासही परीक्षेला बसू देण्यात आले नाही अशी तक्रार आहे.—इन्फो—उमेदवारांनी परीक्षेच्या ९० मिनिटे आधी किंवा ३० मिनिटे अगोदर केंद्राच्या आवारात असावे, असा परीक्षेसाठीचा नियम आहे. सकाळी ९.३० वाजता केंद्राचे प्रवेशद्वार बंद करण्यात येते. त्यानंतर आलेल्या उमेदवारांचा विचार केला जाणार नाही, असा नियम असल्याने या नियमाचादेखील अनेकांना फटका बसत आहे. धावपळ करीत प्रवेश केंद्रापर्यंत पोहचूनही प्रवेशद्वार बंद असल्यामुळे त्यांना परतावे लागते.

टॅग्स :Nashikनाशिकexamपरीक्षा