शहरं
Join us  
Trending Stories
1
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
2
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
3
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
4
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
5
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
6
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
7
House Arrest Ullu app: एजाज खानच्या अडचणी वाढल्या! 'हाउस अरेस्ट शो' प्रकरणात पोलिसांकडून पहिली अ‍ॅक्शन
8
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
9
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
10
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
11
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
12
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
13
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
14
मुकेश अंबानींची 'ही' कंपनी IPO साठी करतेय तयारी, नफ्यासाठी रणनीतीमध्ये केला बदल
15
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
16
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
17
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
18
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
19
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
20
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?

...त्यापेक्षा घरीच डीव्हीडी आणून सिनेमा बघू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2018 01:15 IST

मल्टिप्लेक्स सिनेमागृहांमध्ये खाद्यपदार्थांचे दर चौपट ते पाचपट महाग आकारले जातात. प्रेक्षकांनी घरून खाण्याची वस्तू, पाणी आदी नेल्यास त्याला बंदी केली जाते. यामुळे सुटीच्या दिवशी कुटुंबासह सिनेमाला गेलेल्या व्यक्तीच्या खिशाला तिकिटाचे दर, खाद्यपदार्थांचा खर्च, येण्या-जाण्याचा खर्च म्हणजे मोठा आर्थिक फटका बसण्यासारखे होत आहे.

नाशिक : मल्टिप्लेक्स सिनेमागृहांमध्ये खाद्यपदार्थांचे दर चौपट ते पाचपट महाग आकारले जातात. प्रेक्षकांनी घरून खाण्याची वस्तू, पाणी आदी नेल्यास त्याला बंदी केली जाते. यामुळे सुटीच्या दिवशी कुटुंबासह सिनेमाला गेलेल्या व्यक्तीच्या खिशाला तिकिटाचे दर, खाद्यपदार्थांचा खर्च, येण्या-जाण्याचा खर्च म्हणजे मोठा आर्थिक फटका बसण्यासारखे होत आहे. मल्टिप्लेक्सला जाऊन सिनेमा पाहण्यापेक्षा घरीच डीव्हीडी आणून का पाहू नये? असा सवाल आता प्रेक्षकांकडून केला जात आहे. मल्टिप्लेक्समधील खाद्यविक्रेत्यांची ही दादागिरी थांबविण्यासाठी शासनाने हस्तक्षेप करावा व विक्रेत्यांना तरीही दरवाढ मागे घेण्याची इच्छा नसेल तर प्रेक्षकांना घरून पदार्थ, पाणी देण्याची मुभा द्यावी, अशी मागणीही पुढे येत आहे. याबाबत प्रेक्षकांशी साधलेला हा संवाद...मल्टिप्लेक्समधील खाद्यपदार्थांचे दर अयोग्य आहेत. दर कमी केले पाहिजेत. त्या पदार्थांचे बाहेरचे दर आणि मल्टिप्लेक्समधले दर यात खूपच तफावत दिसून येते, शासनाने यात लक्ष घालावे. सर्वसामान्य माणसाला आर्थिकदृष्ट्या सिनेमा बघणे अवघड होऊन बसले आहे. हे दर कमी होणार नसतील तर घरून पदार्थ नेण्याची परवानगी द्यावी.- संजय शिंदे, हिरावाडीएखादा सिनेमा बघायला सहकुटुंब जायचे म्हटल्यावर खर्चाचा आकडा पाहता जावे की नाही असा प्रश्न पडतो. तिकिटाचेदर वेगळे, तिथल्या खाद्यपदार्थांचे  दर वेगळे एकूण बजेट कोलमडून जाते. त्यापेक्षा घरीच डीव्हीडीआणून सिनेमा बघितला तर ते सोयीस्कर पडेल असे आता वाटायला लागले आहे. सिनेमाघरात येणाऱ्या प्रत्येकालाच हे अव्वाच्या सव्वा दर परवडतील असे नाही. शासनाने याचा विचार करावा.  - नितीन शेलार, पंचवटी

टॅग्स :cinemaसिनेमा