शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

स्वच्छतेची खबरदारी न घेणाऱ्यांवर कारवाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2018 00:33 IST

नाशिक : शहरासह ग्रामीण भागातही स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या वाढत असून, वातावरणातील बदल व पूर्वानुभव लक्षात घेता सर्वेक्षण, निदान, उपचार, आरोग्य शिक्षण, प्रशिक्षण आदी बाबींकडे लक्ष देण्याच्या सूचना सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी केल्या आहेत. तसेच परिचारिकांनी नवजात शिशुंना हात स्वच्छ हात धुऊनचा हाताळावे, तसेच आवश्यक त्या सर्व खबरदारीच्या उपयायोजना करावी तसे न करणाºया परिचारिकांवर कारवाई करण्याचे निर्देशही दीपक सांवत यांनी दिले आहे.

ठळक मुद्देदीपक सावंत : आरोग्य विभागाच्या आढावा बैठकीत प्रशासनाला सूचना

नाशिक : शहरासह ग्रामीण भागातही स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या वाढत असून, वातावरणातील बदल व पूर्वानुभव लक्षात घेता सर्वेक्षण, निदान, उपचार, आरोग्य शिक्षण, प्रशिक्षण आदी बाबींकडे लक्ष देण्याच्या सूचना सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी केल्या आहेत. तसेच परिचारिकांनी नवजात शिशुंना हात स्वच्छ हात धुऊनचा हाताळावे, तसेच आवश्यक त्या सर्व खबरदारीच्या उपयायोजना करावी तसे न करणाºया परिचारिकांवर कारवाई करण्याचे निर्देशही दीपक सांवत यांनी दिले आहे.जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी (दि.३०) आयोजित केलेल्या साथरोग व आरोग्याच्या इतर समस्यांच्या आढावा बैठकीप्रसंगी डॉ. दीपक सावंत बोलत होते. येवेळी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश गिते, जिल्हा शल्य चिकित्सक सुरेश जगदाळे, जिल्हा आरोग्य अधिकारी विजय डेकाटे आदी उपस्थित होते.डॉ. सावंत म्हणाले, स्वाइन फ्ल्यूबाबत प्रत्येक नागरिकाने आपल्या स्तरावर काळजी घेणे आवश्यक असल्याचे सांगतानाच २०१८ मध्ये स्वाइन फ्ल्यूचे नऊ रु ग्ण दगावल्याने संबंधित आरोग्य विभागाने अधिक सतर्क राहण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या. आरोग्य मंत्र्यांच्या आढावा बैठकीत नाशिक मनपा हद्दीत हिवतापाचे २, डेंग्यूचे २२० व चिकनगुन्याचे १९ रुग्ण आढळून आले, तर ग्रामीण भागात हिवतापाचे सहा, डेंग्युचे ३३ आणि चिकनगुन्याचे २१ रुग्ण आढळून आले. मालेगाव मनपा क्षेत्रात फक्त डेंग्यूचे ३ रुग्ण आढळले. मालेगावच्या तुलनेत नाशिक शहरात साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असल्याने महापालिकेने याबाबत काळजी घेणे गरजेचे असल्याचे मत डॉ. सावंत यांनीव्यक्त करताना शहरासह ग्रामीण भागात नागरिकांमध्ये आरोग्य आणि स्वच्छतेविषयी विविध मार्गाने जनजागृती करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. कोरडा दिवस पाळावासाथीच्या आजारांना आळा घालण्यासाठी शहरातील संवेदनशील भागासह ग्रामीण भागातील डासांचे निर्मूलन करण्यासाठी कोरडा दिवस पाळावा, असे आवाहन डॉ. दीपक सावंत यांनी केले. सर्दी, खोकला आणि तापाची लक्षणे २४ तासांपेक्षा अधिक काळ राहिल्यास स्वाइन फ्ल्यू प्रतिबंधक औषधोपचार सुरू करावेत. तसेच खासगी रु ग्णालयांनी व वैद्यकीय महाविद्यालयांनी तत्काळ उपचारासाठी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.