शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
5
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
6
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
7
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
8
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
9
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
10
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
11
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
12
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
13
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
14
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
15
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
16
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
17
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
18
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
19
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
20
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Daily Top 2Weekly Top 5

तलाठ्यांच्या मेहनतान्यावर तहसीलदारांनीच डल्ला

By admin | Updated: November 23, 2014 00:41 IST

तलाठ्यांच्या मेहनतान्यावर तहसीलदारांनीच डल्ला

नाशिक : अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांपर्यंत शासनाची मदत पोहोचविण्याची महत्त्वाची कामगिरी बजावताना तलाठ्यांना आलेल्या खर्चाची तजवीज शासनाने करून त्यासाठी कोट्यवधींचा निधीही पाठविलेला असला तरी, गेल्या दोन वर्षांपासून ही रक्कमच गायब झाली आहे. जिल्हा प्रशासनाने ही सारी जबाबदारी तहसीलदारांवर ढकलल्यामुळे तलाठ्यांच्या मेहनतान्यावर तहसीलदारांनीच डल्ला मारल्याची भावना व्यक्त केली जात असून, त्यामुळे यापुढे अशा स्वरूपाचे काम न करण्याचा इशाराच तलाठी संघटनेने दिला आहे. तलाठ्यांना सर्वच प्रकारची शासकीय कामे करावी लागत असल्याचे पाहून शासनाने दोन वर्षांपूर्वी राज्यात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करणाऱ्या व त्यानंतर शेतकऱ्यांना मदत वाटणाऱ्या तलाठ्यांना झालेल्या खर्चापोटी रक्कम देण्याचे निश्चित केले होते. सन २०११-१२ व २०१२-१३ या दोन वर्षात राज्यात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तीन हजार रुपये अनुदान वाटप करण्याचे काम तलाठ्यांवर सोपविण्यात आले होते. त्यासाठी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या याद्या तयार करणे, त्याचे संगणकीकरण करणे, सी. डी. तयार करणे, झेरॉक्स काढणे, शेतकऱ्यांचे बॅँक खाते जमा करणे अशा विविध प्रकारचे कामे पदरमोड करून करावे लागले. प्रत्येक तलाठ्याला त्यासाठी दहा ते पंधरा हजार रुपये खर्च आल्याने शासनस्तरावरून त्याची पूर्तता व्हावी, अशी मागणी तलाठ्यांनी केल्यावर ज्या प्रमाणात जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे नुकसान झाले असेल व शासनाने मदतीसाठी अनुदान उपलब्ध करून दिले असेल त्याच्या ०.५ टक्के रक्कम तलाठ्यांना मेहनताना देण्याचे ठरविण्यात आले व तशी तरतूदही करण्यात आली होती. नाशिक जिल्ह्यासाठी जवळपास दोन कोटी रुपये तलाठ्यांना देण्यासाठी स्वतंत्र देण्यात आले, त्याच बरोबर त्या त्या तालुक्याची शेतकऱ्यांचे नुकसानीचे शासकीय अनुदान व तलाठ्यांना देण्यात येणारा मेहनताना याचा निधीही जिल्हाधिकारी कार्यालयाने तहसील कार्यालयात वर्ग करण्यात आला होता. परंतु तहसीलदारांनी या रकमेचे वाटप केलेले नाही. विशेष म्हणजे, राज्यातील प्रत्येक तालुक्यात तलाठ्यांच्या झालेल्या खर्चाची तजवीज प्रशासनाकडून करण्यात आली असून, नाशिक जिल्ह्यातच त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने आलेला निधी गेला कुठे, असा सवाल केला जात आहे. जिल्हा प्रशासनाने सदरची बाब तहसीलदारांच्या अखत्यारितील असल्याने आपले हात वर केले असल्याने दोन कोटी रुपयांचे गूढ वाढून तहसीलदारांभोवती संशयाचे ढग निर्माण झाले आहेत. सर्वच तहसीलदारांनी एकत्र येऊन ही रक्कम हडप केल्याचा संशयही घेतला जात आहे. त्यामुळे नजीकच्या काळात पुन्हा एकवार अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अनुदान वाटपाचा प्रश्न निर्माण झाल्यास तलाठ्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. (प्रतिनिधी)