शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

ताहाराबादला सत्तेसाठी रंगणार रस्सीखेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 20:34 IST

ताहाराबाद : येथील ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत माघारीवेळी झालेल्या चार बिनविरोध निवडीनंतर तेरा जागांसाठी तब्बल ३१ उमेदवारांनी आपले नशीब निवडणूक ...

ठळक मुद्देचुरशीच्या लढती : बिनविरोध उमेदवारांची भूमिका निर्णायक

ताहाराबाद : येथील ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत माघारीवेळी झालेल्या चार बिनविरोध निवडीनंतर तेरा जागांसाठी तब्बल ३१ उमेदवारांनी आपले नशीब निवडणूक रिंगणात आजमावले. यात सत्ताधारी गटाच्या श्री गुरुदत्त पॅनलला सात, तर विकास पॅनलला सहा जागा मिळाल्या आहेत. ग्रामपंचायतीच्या सत्तेच्या चाव्या मात्र बिनविरोध निवडून आलेल्या सदस्यांच्या हातात आहेत. त्यामुळे या ठिकाणी सत्तेसाठी रस्सीखेच बघायला मिळणार आहे.

अतिशय अटी-तटीच्या लढतीत निवडणूक झाली. वॉर्ड क्रमांक १ मधून अनुसूचित जाती पुरुष जागेसाठी निखिल राजेंद्र कासारे, महिलांचा मागास प्रवर्ग जागेसाठी प्रमिला सुभाष नंदन, सर्वसाधारण जागेसाठी डॉ. नितीन विजय पवार हे विजयी झाले.वॉर्ड क्रमांक दोनमधून अनुसूचित जमाती पुरुष जागेसाठी जीवला दलपत माळी, अनुसूचित जमाती महिला जागेसाठी भारती अजय सोनवणे हे विजयी झाले. या वॉर्डात महिलांचा मागास प्रवर्ग जागेसाठी शीतल योगेश नंदन बिनविरोध निवडून आलेल्या आहेत. वॉर्ड क्रमांक तीनमधून महिलांचा मागास प्रवर्ग जागेसाठी कल्पना सुनील जाधव व अनुसूचित जमाती पुरुष जागेसाठी यशवंत लक्ष्मण पवार दोन्ही बिनविरोध निवडून आले आहेत. वॉर्ड क्रमांक चारमध्ये सर्वसाधारण महिला जागेसाठी भाग्यश्री किशोर साळवे यांनी आपल्या आत्या वंदना वसंत नंदन यांचा पराभव केला.

नागरिकांचा मागास प्रवर्ग पुरुष जागेवर तुषार नामदेव अहिरे विजयी झाले. गावात लक्ष्यवेधी ठरलेल्या वॉर्ड क्रमांक पाचमध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग पुरुष जागेवर माजी सरपंच सीताराम तुकाराम साळवे यांनी त्यांचे पुतणे माजी सरपंच संदीप मधुकर साळवे, मिलिंद सुधाकर चित्ते, जगदीश साळवे यांचा पराभव केला. सर्वसाधारण जागेसाठी दोन्ही कांकरिया बंधूंमध्ये झालेल्या लढतीत निलेश सुभाष कांकरिया यांनी माजी उपसरपंच प्रदीप कांतीलाल कांकरिया यांचा पराभव केला. महिला सर्वसाधारण जागेसाठी शोभा अशोक कांकरिया विजयी झाल्या.वॉर्ड क्रमांक सहामधून अनुसूचित जमाती महिला जागेसाठी जिजाबाई मुरलीधर वनिस, अनुसूचित जमाती पुरुष जागेसाठी राजेश सजन माळी, महिला सर्वसाधारण जागेसाठी प्रीती सचिन कोठावदे विजयी झाल्या.सरपंच आरक्षणाकडे लक्षनिवडणूक झालेल्या तेरा जागांपैकी सत्ताधारी गुरुदत्त पॅनलला सात, तर विकास पॅनलला सहा जागांवर विजय मिळविता आला आहे. चार बिनविरोध निवडून आलेल्या सदस्यांच्या हातात आता सत्तेच्या चाव्या आहेत. बिनविरोध निवडून आलेले चार सदस्य कशी भूमिका बजावतात, यावर सत्तेचे समीकरण ठरणार आहे. त्यामुळे बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांच्या भूमिका महत्त्वाच्या ठरणार असून, सरपंचपदाच्या आरक्षणाकडेही लक्ष लागून राहिले आहे. 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक