शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
3
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
4
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
5
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
6
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
7
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
8
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
9
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
10
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
11
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
12
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
13
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
14
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
15
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
16
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
17
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
18
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
19
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
20
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल

येवला तालुकावासीयांचा पाण्यासाठी टाहो

By admin | Updated: April 2, 2016 00:02 IST

विहिरींनी गाठला तळ : घोटभर पाण्यासाठी मैलोन्मैल भटकंती

पाटोदा : येवला तालुक्यात तीव्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, पाण्यासाठी तालुक्यातील नागरिकांना भटकंती करण्याची वेळ आली आहे. निसर्गाच्या अवकृपेमुळे पाणी मिळेल का नाही, हा प्रश्न सर्वांसमोर उभा आहे. संपूर्ण तालुक्यातील जनता पाण्यासाठी टाहो फोडत आहे. तालुक्यातील नद्या, नाले व ओढे गेली तीन वर्षांमध्ये एकदाही भरले नाहीत. या गंभीर परिस्थितीमुळे तालुक्यातील वाड्या-वस्त्यांवर पिण्याच्या पाण्याकरिता नागरिकांना भटकंती करावी लागत आहे व आपली तहान भागवण्यासाठी मिळेल तेथून पाणी आणावे लागत असल्याने लहान मुलांसह वृद्धांनाही पाण्यासाठी कसरत करावी लागत आहे. एवढी भीषण परिस्थिती असतानाही प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे व कोणत्याही प्रकारची कारवाई होत नाही. सध्या ग्रामीण भागात सण, उत्सव, लग्नसराई कार्यक्रमाकरिता घरी आल्यानंतर पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. त्यात भर म्हणून भारनियमनाच्या वेळेत वाढ झाल्याने दुष्काळात तेरावा महिना म्हणण्याची वेळ आली आहे.तालुक्यातील पाण्याची पातळी प्रचंड खोलवर गेली आहे. सर्व पाण्याचे स्रोत कोरडेठाक पडले आहेत. असे असतानाही शेतकऱ्यांनी बोअरवेल घेऊन जमिनीची चाळण केली आहे; मात्र पाणी लागत नाही. ९०० / १००० फुटापर्यंत बोअर घेऊनही पाणी लागत नसल्याने नागरिकांसमोर पिण्याच्या पाण्याचे मोठे संकट उभे ठाकले आहे. आडातच नाही तर पोहऱ्यात कोठून येणार, अशी अवस्था झाली आहे.तालुक्यात गतवर्षी व यंदाही कमी पाऊस झाल्याने पाणीटंचाईच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. ज्यांच्याकडे थोड्या फार प्रमाणात पाणी उपलब्ध आहे, अशा लोकांनी पाण्याचा व्यवसाय चालू केला असून, नागरिकांची मोठ्या प्रमाणात पिळवणूक केली जात आहे. पण याबाबत बोलतंय कोण? जो कोणी बोलतो त्याला पाणीच बंद असा फतवाच काढला आहे. तांब्याभर पाणी व पोटभर जेवण दिल्यास पुण्याचे सार्थक होते. पण सध्याची परिस्थिती पाहता ती मोडीत निघाली आहे. विकत पाणी मिळेना मग फुकट कोण देणार. (वार्ताहर)