शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
2
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
3
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
4
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
5
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
6
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
7
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
8
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
9
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
10
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
11
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
12
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
13
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
14
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
15
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
16
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
17
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
18
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
19
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
20
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...

येवला तालुकावासीयांचा पाण्यासाठी टाहो

By admin | Updated: April 2, 2016 00:02 IST

विहिरींनी गाठला तळ : घोटभर पाण्यासाठी मैलोन्मैल भटकंती

पाटोदा : येवला तालुक्यात तीव्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, पाण्यासाठी तालुक्यातील नागरिकांना भटकंती करण्याची वेळ आली आहे. निसर्गाच्या अवकृपेमुळे पाणी मिळेल का नाही, हा प्रश्न सर्वांसमोर उभा आहे. संपूर्ण तालुक्यातील जनता पाण्यासाठी टाहो फोडत आहे. तालुक्यातील नद्या, नाले व ओढे गेली तीन वर्षांमध्ये एकदाही भरले नाहीत. या गंभीर परिस्थितीमुळे तालुक्यातील वाड्या-वस्त्यांवर पिण्याच्या पाण्याकरिता नागरिकांना भटकंती करावी लागत आहे व आपली तहान भागवण्यासाठी मिळेल तेथून पाणी आणावे लागत असल्याने लहान मुलांसह वृद्धांनाही पाण्यासाठी कसरत करावी लागत आहे. एवढी भीषण परिस्थिती असतानाही प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे व कोणत्याही प्रकारची कारवाई होत नाही. सध्या ग्रामीण भागात सण, उत्सव, लग्नसराई कार्यक्रमाकरिता घरी आल्यानंतर पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. त्यात भर म्हणून भारनियमनाच्या वेळेत वाढ झाल्याने दुष्काळात तेरावा महिना म्हणण्याची वेळ आली आहे.तालुक्यातील पाण्याची पातळी प्रचंड खोलवर गेली आहे. सर्व पाण्याचे स्रोत कोरडेठाक पडले आहेत. असे असतानाही शेतकऱ्यांनी बोअरवेल घेऊन जमिनीची चाळण केली आहे; मात्र पाणी लागत नाही. ९०० / १००० फुटापर्यंत बोअर घेऊनही पाणी लागत नसल्याने नागरिकांसमोर पिण्याच्या पाण्याचे मोठे संकट उभे ठाकले आहे. आडातच नाही तर पोहऱ्यात कोठून येणार, अशी अवस्था झाली आहे.तालुक्यात गतवर्षी व यंदाही कमी पाऊस झाल्याने पाणीटंचाईच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. ज्यांच्याकडे थोड्या फार प्रमाणात पाणी उपलब्ध आहे, अशा लोकांनी पाण्याचा व्यवसाय चालू केला असून, नागरिकांची मोठ्या प्रमाणात पिळवणूक केली जात आहे. पण याबाबत बोलतंय कोण? जो कोणी बोलतो त्याला पाणीच बंद असा फतवाच काढला आहे. तांब्याभर पाणी व पोटभर जेवण दिल्यास पुण्याचे सार्थक होते. पण सध्याची परिस्थिती पाहता ती मोडीत निघाली आहे. विकत पाणी मिळेना मग फुकट कोण देणार. (वार्ताहर)