शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

सय्यद महमूद अशरफ : प्रसिध्दीसाठी धार्मिक मुद्यांचा आधार घेणे गैर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2018 17:54 IST

शहरात अहैले सुन्नत रिसर्च सेंटरच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या विविध मार्गदर्शक धार्मिक साहित्यावर आधारित पुस्तकांच्या मोफत वाटपप्रसंगी अशरफ मिया रविवारी (दि.११) जुने नाशिक भागात आले होते.

ठळक मुद्दे भारत हा सुफीसंतांचा देश धार्मिक मुद्यांचा आधार घेत वक्तव्य करणे हे परिपक्वता व प्रगल्भतेचे लक्षण नाही भावनांचा खेळ करणे हे भारतीय संस्कृतीला न शोभणारे

नाशिक : प्रसिद्धीचा झोत ओढवून घेण्यासाठी धार्मिक भावनांचा खेळ करणे हे भारतीय संस्कृतीला न शोभणारे आहे. त्यामुळे जे लोक इस्लाम किंवा अन्य धर्माच्या विरोधी वारंवार भाष्य करतात, त्यांनी ते थांबवावे कारण ते भारतीय संस्कृतीला एकप्रकारे डाग लावण्याचे काम करत आहे, असे मत अहैले सुन्नत रिसर्च सेंटरचे प्रमुख ज्येष्ठ मुस्लीम धर्मगुरू हजरत सय्यद महमूद अशरफ जिलानी यांनी केले.शहरात अहैले सुन्नत रिसर्च सेंटरच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या विविध मार्गदर्शक धार्मिक साहित्यावर आधारित पुस्तकांच्या मोफत वाटपप्रसंगी अशरफ मिया रविवारी (दि.११) जुने नाशिक भागात आले होते.

यावेळी त्यांनी ‘खतीब हवेली’ येथे पत्रकार परिषद घेऊन तिहेरी तलाक, देशाची संस्कृती व इतिहास, पाश्चात्त्य देशांमध्ये उद्भवणारी युद्धजन्य परिस्थिती, देशाचे राजकीय धोरण, सरकारची भूमिका, मानवतावाद आणि इस्लाम या विषयांवर ओघवत्या शैलीत माहिती दिली. यावेळी ते म्हणाले, ज्यांना भारताची सिरियासारखी स्थिती होण्याची भीती वाटते त्यांनी आपली मानसिक तपासणी करून घ्यावी. भारत हा सुफीसंतांचा देश आहे. येथील समाजव्यवस्था संपूर्ण जगासाठी मार्गदर्शक आहे, असेही ते म्हणाले. धार्मिक मुद्यांचा आधार घेत वेगवेगळे वक्तव्य करणे हे परिपक्वता व प्रगल्भतेचे लक्षण तर नाहीच मात्र समाजात अस्थिर वातावरण पसरवत प्रसिध्दीच्या झोतात येण्यासाठी पुरक ठरणारे कृत्य नक्कीच आहे, असे ते म्हणाले. जे लोक अशाप्रकारे गरळ ओकतात ते राष्ट किंवा समाजहित व संस्कृतीचा कधीही विचार करु शकत नाही, किंबहूना त्यांच्याकडून तशी अपेक्षा ठेवणेही गैर आहे, असे अशरफ म्हणाले. याप्रसंगी शहर-ए-खतीब हिसामुद्दीन अशरफी, हाजी सय्यद मीर मुख्तार अशरफी उपस्थित होते.धार्मिक पुस्तकांचे वाटपअहैले सुन्नत रिसर्च सेंटरच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या तोहफ-ए-मोहम्मदीया, ट्रिपल तलाक अ‍ॅन्ड हलाला, फिरक-ए-यजीद, अहकाम-ए-मय्यत कोर्स, द मॅसेज आॅफ ह्युमॅनिटी, फिरक-ए-मुर्जिआ और वहाबिया, लकब-ए-इमाम-ए-आझम आदी पुस्तकांचे वाटप समाजातील डॉक्टर, वकील, शिक्षक, पत्रकार, साहित्यिक वर्गातील व्यक्तींना महमूद अशरफ यांच्या हस्ते करण्यात आले.

टॅग्स :Muslimमुस्लीमtriple talaqतिहेरी तलाकNashikनाशिक