शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
9
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
10
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
11
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
12
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
13
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
14
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
15
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
16
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
17
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
18
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
19
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
20
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

तिळाचा गोडवा; पतंगबाजीची धूम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2018 00:32 IST

नाशिक : सूर्याच्या उत्तरायणाने तीळ-तीळ वाढत जाणारा दिवस जेव्हापासून सुरू होतो तो मकर संक्रांतीचा सण शहरात उत्साहात साजरा करण्यात आला. सर्वांनी एकमेकांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देत ‘तीळगूळ घ्या, गोड गोड बोला’, असा स्नेहमय संदेश देऊन नाते वृद्धिंगत आणि दृढ करण्यासाठी तीळगुळाचे वाटप केले.

ठळक मुद्देमकर संक्रांत : तीळगूळ सोहळा रंगला; पतंग उडविण्याचा घेतला आनंदएकमेकींना वाण देण्यासाठी सुवासिनींना या सणाचे खास आकर्षण

नाशिक : सूर्याच्या उत्तरायणाने तीळ-तीळ वाढत जाणारा दिवस जेव्हापासून सुरू होतो तो मकर संक्रांतीचा सण शहरात उत्साहात साजरा करण्यात आला. सर्वांनी एकमेकांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देत ‘तीळगूळ घ्या, गोड गोड बोला’, असा स्नेहमय संदेश देऊन नाते वृद्धिंगत आणि दृढ करण्यासाठी तीळगुळाचे वाटप केले.भारतीय संस्कृतीत मकरसंक्रांत या सणाला महत्त्वाचे स्थान आहे. इंग्रजी महिन्यांनुसार वर्षातील पहिला सण मकरसंक्र ांत असल्याने याप्रती असलेली उत्सुकता दिसून आली. हिवाळा ऋ तूत हा सण येत असल्याने शरीराला उष्णतेची गरज भासते. त्यामुळे या दिवशी तीळ-गूळ देऊनच शुभेच्छा देण्याची प्रथा रु जली आहे. शहरातही पारंपरिक पद्धतीने आणि उत्साहात ही प्रथा साजरी करीत संक्र ांतीचा सण नाशिककरांनी उत्साहात सागरा केला.एकमेकींना वाण देण्यासाठी सुवासिनींना या सणाचे खास आकर्षण असते. नवी कोरी कोळ्या रंगाची साडी परिधान करून गृहिणींना सुगड पूजने केले. तसेच सुगड्याचे वाण देण्याची पारंपरिक प्रथा त्यांनी पार पाडली. महिलावर्ग संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत साजरी केल्या जाणाºया हळदी-कुंकवाच्या प्रथेला यादिवसापासून सुरु वात केली गेली. अनेक महिलांनी संक्रांतीच्या दिवशीच हळदी-कुंकवाचेही नियोजन करून कौटुंबिक उत्सव साजरा केला.दरम्यान, काही भागात मात्र सर्रासपणे नॉयलॉन मांजाचा वापर केला असल्याचे समोर आले आहे. या भागात काही पक्षी जखमी झाले तर अनेकांना ईजाही झाल्याने नॉयलॉन मांजा वापरात असल्याचे दिसून आले. मात्र, मांजा तपासणीसाठी पोलीस कुठेही दिसून न आल्याने नॉयलॉन मांजाचा वापर झाल्याचे बोलले जाते.‘गयी बोल रे धिन्ना’आवाज यंदा ओसरला नॉयलॉन मांजामुक्त पतंगोत्सव साजरा करण्याबाबत करण्यात आलेल्या आवाहनामुळे यंदा शहरात ‘गयी बोल रे धिन्ना’चा आवाज ओसरल्याचे चित्र होते. दरवर्षी पतंग काटाकाटीच्या खेळासाठी वाद्याच्या तालावर आणि डीजेच्या धामधुमीत पतंगबाजीला उधाण येत होते. परंतु यंदा शहरात पतंगबाजीचा असा उत्साह कुठेही दिसून आला नाही. सामाजिक भान म्हणून अनेकांनी यंदा त्यांच्या भावनांना मुरड घातली. शासन, प्रशासन आणि सामाजिक संस्थांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत यंदा पतंगबाजीचा उत्साह फारसा जाणवला नाही.