शहरं
Join us  
Trending Stories
1
Malegaon Blast Case Verdict : प्रज्ञासिंह यांच्यासह सर्व आरोपी निर्दोष सुटले, १७ वर्षांनंतर एनआयएच्या विशेष न्यायालयाने दिला निकाल
2
कोण आहेत कर्नल पुरोहित? ज्यांना मालेगाव स्फोटाप्रकरणी निर्दोष सोडलं; ९ वर्ष जेलमध्ये टॉर्चर केले
3
आता अंतराळात युद्ध पेटणार?, चीन-रशियावर जपानचा गंभीर आरोप; भारतालाही सावध राहावं लागणार
4
"काँग्रेसच्या विकृत राजकारणाला चपराक, हिंदू समाजाला दहशतवादी ठरवण्याचं कारस्थान हाणून पाडलं"
5
"हिंदू कधी दहशतवादी असू शकत नाही..."; संसदेत गृहमंत्री अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
6
अमेरिकेचा भारतावर 'टॅरिफ बॉम्ब'! आता iPhone महागणार, 'मेक इन इंडिया'ला मोठा धक्का!
7
'भारत-रशिया त्यांच्या मृत अर्थव्यवस्था आणखी बुडवणार...', डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले
8
"तो एकदम छपरी आहे...", अहान पांडेबद्दल हे काय बोलून गेला 'सैयारा'चा दिग्दर्शक मोहित सुरी
9
२ ऑगस्टला जग अंधारात बुडणार नाही; दा. कृ. सोमण यांचे स्पष्टीकरण
10
ट्रम्प यांच्या २५% टॅरिफच्या घोषणेनंतर भारतातील 'हे' शेअर्स जोरदार आपटले; विकण्यासाठी रांग, तुमच्याकडे आहेत?
11
ठाण्यात राजकीय वातावरण तापले; राजन विचारे यांच्या बॅनरवरून शिंदे गट आणि ठाकरे गटात जुंपली
12
अहो आश्चर्यम! गर्भाशयात नाही, लिव्हरमध्ये वाढतंय बाळ; काय आहे इंट्राहेपॅटिक एक्टोपिक प्रेग्नन्सी?
13
कौतुक करता-करता कर लादला; ट्रम्प यांच्या 25% टॅरिफवरुन विरोधकांचा मोदी सरकारवार निशाणा
14
Video - भीषण! अमेरिकेमध्ये F-35 फायटर जेट क्रॅश; पायलटने 'असा' वाचवला जीव
15
ज्वेलरी शॉपमध्ये अचानक पुराचे पाणी घुसले, २० किलो सोन्याचे दागिने, हिरे वाहून गेले; लोक चिखल रापत बसले...
16
एकेकाळी ५ रुपयांसाठी मजुरी करायच्या, आज अमेरिकन कंपनीच्या CEO बनून १०० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना देताहेत पगार
17
मेघा धाडेनं सांगितलं दुसरं लग्न करण्यामागचं कारण, म्हणाली - "त्या दिवशी मला..."
18
"हात जोडले, ५ मिनिटं मागितली, पण..."; बुलडोझर कारवाईनंतर भावाचा मृत्यू, भाजपा नेत्याची व्यथा
19
Hit and run: २१ वर्षांच्या मुलाला कारने चिरडलं अन् पळून गेली; कोण आहे नंदिनी कश्यप?
20
लेकीच्या जन्मानंतर इशिता दत्ताची तब्येत बिघडली, दोन वर्षांचा मुलगाही आजारी; दिली हेल्थ अपडेट

ऐन श्रावणात सणासुदीचा गोडवा कमी झाला; साखर महाग !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:17 IST

नाशिक : श्रावण सुरू झाल्यामुळे साखरेची मागणी वाढते. मात्र, साखरेच्या दरात वाढ झाल्याने ग्राहकांना याचा फटका बसणार असून सणासुदीच्या ...

नाशिक : श्रावण सुरू झाल्यामुळे साखरेची मागणी वाढते. मात्र, साखरेच्या दरात वाढ झाल्याने ग्राहकांना याचा फटका बसणार असून सणासुदीच्या काळात साखर महागल्याने स्वयंपाक घरातील गोड पदार्थांचे प्रमाण घटल्याने ऐन श्रावणात सणासुदीचा गोडवा कमी झाला आहे.

साखर प्रत्येक घराच्या स्वयंपाक घरातील मुख्य घटक असून कोणत्याही आनंदाच्या क्षणी, शुभप्रसंगी कुटुंबीयांसह गोड पदार्थांचा आस्वाद घेण्याची भारतीय संस्कृती आहे. परंतु, यावर्षी ऐन सणासुदीच्या तोंडावर साखरेचे भाव वाढले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना आपल्या खर्चात कपात करावी लागत असून गोड पदार्थांच्या आवडीलाही मुरड घालावी लागत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात ब्राझिलमधून मोठ्या प्रमाणात साखरेची आवक होते. परंतु, यावर्षी साखरेचे मोठ्या प्रमाणात उत्पादन करणाऱ्या ब्राझिलसारख्या राष्ट्रात दुष्काळ असल्याने त्याचा थेट परिणाम साखरेच्या उत्पादनावर झाला असून आंतरराष्ट्रीय स्तरावरील व्यापाऱ्यांनी त्यांचा मोर्चा आता भारताकडे वळविला आहे. साखरेला आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी वाढल्यामुळे भारतातही साखरेचे भाव वाढू लागले आहेत.

---

जिल्ह्याला दररोज लागते साखर (क्विंटलमध्ये) - ३४७० क्विंटल

श्रावणात मागणी वाढली

श्रावणात नागपंचमी, नारळी पौर्णिमा व रक्षाबंधन, श्री कृष्ण जन्माष्टमी तसेच गोपालकाला यासारखे वेगवेगळे सण येतात. यासोबतच सोमवार व शनिवारीही अनेक भाविक गोड पदार्थांचे नैवद्य करतात. परिणामी साखरेच्या मागणीत प्रमाणात भाव वाढ झाली आहे.

साखरेचे दर (प्रति किलो)

जानेवारी - ३४.५०

फेब्रुवारी - ३४.५०

मार्च - ३४

एप्रिल -३४.५०

मे - ३४

जून - ३४

जुलै - ३५

ऑगस्ट - ३६

का वाढले भाव

आंतरराष्ट्रीय बाजारात ब्राझिलमधून मोठ्या प्रमाणात साखरेची आ‌वक होते. परंतु ब्राझिलमधील दुष्काळामुळे साखरेचे उत्पादन घटले असून आंतरराष्ट्रीय बाजारातील ग्राहक आता भारताकडे वळल्याने साखरेचे दर काही प्रमाणात वाढले आहेत. भविष्यातही आणखी दरवाढ होण्याची शक्यता असल्याची माहिती साखरेचे व्यापारी राकेश भंडारी यांनी दिली आहे.

महिन्याचे बजेट वाढले

सध्या श्रावण सुरू झाला असून श्रावणापासून सणासुदीचा काळ सुरू होतो. त्यामुळे साखरेच्या पदार्थांचे प्रमाणही वाढत असल्याने साखरेचा वापर वाढला आहे. परंतु, साखरेचे भाव वाढल्यामुळे स्वयंपाक घराचे बजेटही बिघडले आहे.

- अंजली पवार, गृहिणी.

दिवसेंदिवस महागाई वाढत असताना त्यात आता साखरेचीही भर पडली आहे. त्यामुळे स्वयंपाक घरातील आर्थिक बजेटवर त्याचा परिणाम होत असून सणासुदीतही साखर जपून वापरावी लागत असल्याने गोड पदार्थ कमी प्रमाणात करावे लागत आहे.

- पूजा साळवी, गृहिणी