शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

शेततळ्याच्या पाण्याने ऊसाला आणली गोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2020 15:45 IST

लखमापूर : दिंडोरी तालुक्याला शेती मधील ग्रीन पट्टा म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ओळखले जाते. आता दिंडोरी बरोबरचं प्रगत शेती मध्ये चांदवड तालुक्यातील काही गावाचे पुढे येत आहे.उस शेतीला सुगीचे दिवस येण्याची चित्र पाहायला मिळत आहे.

ठळक मुद्दे एकरी शंभर टन उसाची अपेक्षा : बळीराजाला शेती प्रयोगात यश

लखमापूर : दिंडोरी तालुक्याला शेती मधील ग्रीन पट्टा म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ओळखले जाते. आता दिंडोरी बरोबरचं प्रगत शेती मध्ये चांदवड तालुक्यातील काही गावाचे पुढे येत आहे.उस शेतीला सुगीचे दिवस येण्याची चित्र पाहायला मिळत आहे.दिंडोरी तालुक्यातील कादवा सहकारी साखर कारखाना हा संपूर्ण महाराष्ट्रात सध्या अव्वल स्थानी आहे. सध्या कादवाला उस लागवडीची आकडेवारी पाहाता, यंदा बळीराजांकादवाला भरभरु न उस उपलब्ध करून देईल अशी स्थिती सध्या पाहायला मिळत आहे. यंदा कृषी विभागाच्या माहितीच्या आधारे नुसत्या दिंडोरी तालुक्यात सुमारे २६५० हेक्टर च्या आसपास उसाची लागवड झाल्याची माहिती सुत्राकडून मिळते.कादवाचा नवीन प्रयोग यशस्वी कादवाने सभासद वर्गासाठी विविध प्रकारचे ऊस बेणे देऊन सभासदांना ऊस लागवडीसाठी तयार केले.त्यामध्ये चांदवड तालुक्यातील शिंदे या गावचे व कादवा कारखान्याचे कर्तव्य दक्ष संचालक सुभाष शिंदे यांनी आपल्या शेतामध्ये शेततळे तयार करून अत्यंत कमी पाण्यात तसेच अवघ्या पाच महिन्यात ८६०३२ ही ऊसाची जात आणून जवळ जवळ तीन हेक्टर ऊस लावून अजब प्रयोग करून अत्यंत कमी दिवसात एकरी शंभर टन ऊस उत्पन्न मिळवण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. हा यशस्वी प्रयोग शिंदे यांनी आपल्या शेतामध्ये केला आहे. ही गोष्ट आदर्श घेण्यासारखी आहे.सध्या द्राक्षे बागापेक्षा उस शेती आधिक फायदेशीर व कमी कालावधीत आधिक उत्पन्न देणारी ठरत असून तालुक्यातील शेतकरी वर्गाने उस पिकांला पसंती दिली आहे. कादवा आता लवकरच सुरू होणार असुन उसाला जास्तीत जास्त भाव मिळेल, व दोन हंगामातील झालेले नुकसान भरून निघण्यास मदत होईल. अशी अपेक्षा बळीराजांला वाटत आहे.शेतकरी वर्गाने कुठलेही पिक घेण्यासाठी नियोजनावर ठाम राहावे. उस शेती सध्या शेतकरी वर्गाला उत्तम फल देणारी असून अत्यंत कमी मनुष्य बळात व कमी पाण्याच्या नियोजनावर उस शेती येत आहे. द्राक्षे बागापेक्षा उस शेतीला भांडवल, मनुष्यबळ, व अधिक उत्पन्न मिळण्याची शाश्वती राहाते.- सुभाष शिंदे, कादवा संचालक, शिंदेगाव.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी