शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

उन्हामुळे मुके प्राणी बेहाल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 15:14 IST

सिन्नर : तालुक्याचे सरासरी तापमान ४० अंश सेल्सिअसच्यावर जात असल्याने तालुक्यातील गुरांना उष्माघातासह विविध आजारांचा धोका वाढला आहे. उन्हात पशूधनांना फटका बसत असून या उन्हामुळे मुके प्राणी बेहाल झाले आहेत.

सिन्नर : तालुक्याचे सरासरी तापमान ४० अंश सेल्सिअसच्यावर जात असल्याने तालुक्यातील गुरांना उष्माघातासह विविध आजारांचा धोका वाढला आहे. उन्हात पशूधनांना फटका बसत असून या उन्हामुळे मुके प्राणी बेहाल झाले आहेत. त्यामुळे उन्हाळी आजारांपासून जनावरांना वाचविण्यासाठी लसीकरण मोहीम वेगाने राबविण्याची गरज निर्माण झाली आहे. मे महिना उजाडल्यापासून तालुक्याचे तपमान दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. सध्या तालुक्याचे सरासरी तापमान ४० अंश सेल्सिअसच्यावर राहत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. उन्हापासून मानव विविध मार्गांनी आपला बचाव करुन घेवू शकतात. मात्र जनावरांना या कडक उन्हाचा फटका बसत आहे. तालुक्यातील ३० टक्के गुरे ही प्रजननक्षम असल्याने त्यांच्यावर प्रामुख्याने लक्ष केंद्रीत करण्याची गरज आहे. चारा व पाणीटंचाईमुळे तालुक्यातील जनावरांची रानात भटकंती सुरू आहे. त्यात पाण्याची व ओल्या चाऱ्याची कमतरता असल्याने जनावरांवर विपरीत परिणाम होत आहे. वाढत असलेल्या उन्हाच्या तीव्रतेमुळे जनावरांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे. तालुक्यात उन्हाचा पारा वाढत असल्याने जनावरांना उष्माघाताचा धोका निर्माण झाला आहे. उष्माघातामध्ये जनावरांच्या शरिराचे तापमान १०३ ते १०७ अंशापर्यंत वाढते. यामुळे श्वसनाचा वेग, हृदयाचे ठोके वाढणे, जीभ बाहेर काढून तोंडाने श्वसन करणे, लाळ गाळणे, नाकातून स्त्राव येणे, भरपूर तहान लागणे, अस्वस्थता येणे, जनावरांचा तोल जावून ते खाली कोसळणे, झटके येणे व जनावरे दगावल्याची भीती वाढली आहे. चारा व पाण्याच्या शोधात अनेक जनावरांना उन्हाचा चटका बसत असून वेगवेगळ्या आजारांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे जनावरांची पशुधन विभागाकडून लसीकरण व पशुपालकांना मार्गदर्शनाची गरज निर्माण झाली आहे.----------------समर फिवरचा धोका वाढलाउन्हाच्या या तीव्रतेमुळे जनावरांची प्रजनन क्षमता कमी होणे, वजन घटणे, अतिप्रखर सूर्यप्रकाशामुळे जनावरांना विविध आजारांचा सामना करावा लागत आहे. तालुक्यातील तपमान वाढल्यामुळे जनावरांना समर फिवरचा धोका वाढला आहे. समर फिवरपासून जनावराांची वेळीच काळजी घेणे गरजेचे आहे.--------------मोकाट जनावरे आजारांचे बळीचारा व पाणीटंचाईमुळे अनेक पशूपालक आपली जनावरे मोकाट सोडत आहेत. शहरी भागातही असे अनेक जनावरे मोकाट फिरतांना दिसतात. या जनावरांना वेळेवर चारा व पाणी मिळत नसल्याने मोकाट जनावरे विविध आजारांचे बळी पडत आहे. चारा व पाण्याच्या शोधात फिरणाºया जनावरांना ऊन लागुन झटके येणे व जनावरांचा तोल जावून जनावर जमिनीवर कोसळण्याचे प्रमाण वाढले आहे. 

टॅग्स :Nashikनाशिक