शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

उन्हामुळे मुके प्राणी बेहाल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 15:14 IST

सिन्नर : तालुक्याचे सरासरी तापमान ४० अंश सेल्सिअसच्यावर जात असल्याने तालुक्यातील गुरांना उष्माघातासह विविध आजारांचा धोका वाढला आहे. उन्हात पशूधनांना फटका बसत असून या उन्हामुळे मुके प्राणी बेहाल झाले आहेत.

सिन्नर : तालुक्याचे सरासरी तापमान ४० अंश सेल्सिअसच्यावर जात असल्याने तालुक्यातील गुरांना उष्माघातासह विविध आजारांचा धोका वाढला आहे. उन्हात पशूधनांना फटका बसत असून या उन्हामुळे मुके प्राणी बेहाल झाले आहेत. त्यामुळे उन्हाळी आजारांपासून जनावरांना वाचविण्यासाठी लसीकरण मोहीम वेगाने राबविण्याची गरज निर्माण झाली आहे. मे महिना उजाडल्यापासून तालुक्याचे तपमान दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. सध्या तालुक्याचे सरासरी तापमान ४० अंश सेल्सिअसच्यावर राहत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. उन्हापासून मानव विविध मार्गांनी आपला बचाव करुन घेवू शकतात. मात्र जनावरांना या कडक उन्हाचा फटका बसत आहे. तालुक्यातील ३० टक्के गुरे ही प्रजननक्षम असल्याने त्यांच्यावर प्रामुख्याने लक्ष केंद्रीत करण्याची गरज आहे. चारा व पाणीटंचाईमुळे तालुक्यातील जनावरांची रानात भटकंती सुरू आहे. त्यात पाण्याची व ओल्या चाऱ्याची कमतरता असल्याने जनावरांवर विपरीत परिणाम होत आहे. वाढत असलेल्या उन्हाच्या तीव्रतेमुळे जनावरांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे. तालुक्यात उन्हाचा पारा वाढत असल्याने जनावरांना उष्माघाताचा धोका निर्माण झाला आहे. उष्माघातामध्ये जनावरांच्या शरिराचे तापमान १०३ ते १०७ अंशापर्यंत वाढते. यामुळे श्वसनाचा वेग, हृदयाचे ठोके वाढणे, जीभ बाहेर काढून तोंडाने श्वसन करणे, लाळ गाळणे, नाकातून स्त्राव येणे, भरपूर तहान लागणे, अस्वस्थता येणे, जनावरांचा तोल जावून ते खाली कोसळणे, झटके येणे व जनावरे दगावल्याची भीती वाढली आहे. चारा व पाण्याच्या शोधात अनेक जनावरांना उन्हाचा चटका बसत असून वेगवेगळ्या आजारांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे जनावरांची पशुधन विभागाकडून लसीकरण व पशुपालकांना मार्गदर्शनाची गरज निर्माण झाली आहे.----------------समर फिवरचा धोका वाढलाउन्हाच्या या तीव्रतेमुळे जनावरांची प्रजनन क्षमता कमी होणे, वजन घटणे, अतिप्रखर सूर्यप्रकाशामुळे जनावरांना विविध आजारांचा सामना करावा लागत आहे. तालुक्यातील तपमान वाढल्यामुळे जनावरांना समर फिवरचा धोका वाढला आहे. समर फिवरपासून जनावराांची वेळीच काळजी घेणे गरजेचे आहे.--------------मोकाट जनावरे आजारांचे बळीचारा व पाणीटंचाईमुळे अनेक पशूपालक आपली जनावरे मोकाट सोडत आहेत. शहरी भागातही असे अनेक जनावरे मोकाट फिरतांना दिसतात. या जनावरांना वेळेवर चारा व पाणी मिळत नसल्याने मोकाट जनावरे विविध आजारांचे बळी पडत आहे. चारा व पाण्याच्या शोधात फिरणाºया जनावरांना ऊन लागुन झटके येणे व जनावरांचा तोल जावून जनावर जमिनीवर कोसळण्याचे प्रमाण वाढले आहे. 

टॅग्स :Nashikनाशिक