शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरद पवार उलगडलेलं, पण न उमजलेलं कोडं, तर अजित पवार...'; CM फडणवीसांचे 'रॅपिड फायर' उत्तरे, शिंदे-ठाकरेंबद्दल काय म्हणाले? 
2
पुराचा धसका! चिखलातील स्वप्नांचा शोध..; पिकेच नाही तर मातीही वाहून गेल्याने भविष्य संकटात
3
हृदयद्रावक! खेळता खेळता उकळत्या दुधात पडून दीड वर्षांच्या मुलीचा मृत्यू, मांजरीच्या मागे गेली अन्...
4
सुपर ओव्हरमधील वादावरून श्रीलंकेचे प्रशिक्षक जयसूर्या संतप्त, ICCकडे केली अशी मागणी 
5
भारतीय औषध उद्योगाला ‘ट्रम्प’ झटका! १०.५ अब्ज डॉलरची निर्यात धोक्यात, अमेरिकेलाही बसणार झळ
6
अभिषेक शर्मा-अभिषेक बच्चनच्या नावात शोएब अख्तरचा गोंधळ; अभिनेता स्पष्टच म्हणाला- "तुझा आदर करतो, पण..."
7
Maharashtra Rain Alert: पुन्हा अतिवृष्टीचे संकट? आज, उद्या 'या' जिल्ह्यांत पाऊस घालणार धुमाकूळ, IMD सतर्कतेचा इशारा
8
Happy Birthday Google! २७ वा वाढदिवस साजरा करतोय गुगल! तुम्हाला Google चा फुल फॉर्म माहितीये का आणि कसं पडलं हे नाव?
9
२५ जण, ६ वाहनं... १ मिनिटात ९ कोटींवर डल्ला; दागिन्यांच्या दुकानात फिल्मी स्टाईल दरोडा
10
'शार्क टँक' फेम अश्नीर ग्रोव्हरला 'बिग बॉस १९'कडून ईमेल, वाइल्ड कार्ड एन्ट्रीची ऑफर; म्हणाला- "आधी सलमान खानला..."
11
TATA च्या बहुप्रतिक्षित आयपीओची तारीख अखेर ठरली, 'या' दिवशी मिळणार गुंतवणूकीची संधी, चेक करा डिटेल्स
12
"उद्ध्वस्त एअरबेस, जळालेले हँगर हा तुमचा विजय?"; भारताची पाकिस्तानला सणसणीत चपराक
13
काळाचा घाला! गुरुग्राममधील भीषण अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू, थारचा चक्काचूर
14
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केली तर २४ महिन्यांनंतर किती रुपये मिळतील? पटापट पाहा कॅलक्युलेशन
15
फ्लॅट वेळेत न दिल्यास बिल्डरला १८% व्याजासह भरपाई द्यावीच लागेल; सुप्रीम कोर्टाचा आदेश
16
चैतन्यनंदचे काळे कारनामे! मुलींची निवड करुन त्यांना कसं बनवायचा गुलाम?, खळबळजनक खुलासा
17
राज्यातील ८९ फार्मसी महाविद्यालयांची मान्यता रद्द; तंत्रशिक्षण विभागाचा मोठा निर्णय
18
देशातील प्रत्येक तिसरा लहानगा हार्ट अटॅकच्या मार्गावर?; मुलांच्या रक्तातील चरबीचे प्रमाण वाढले
19
आधी नगरपालिका की जिल्हा परिषद?;निवडणूक आयोगाची दोन्हींसाठी तयारी सुरू
20
कुजबुज! ओल्या दुष्काळात काजू-बदामची चर्चा; शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी अन् राजकीय चिखलफेक

उन्हामुळे मुके प्राणी बेहाल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 15:14 IST

सिन्नर : तालुक्याचे सरासरी तापमान ४० अंश सेल्सिअसच्यावर जात असल्याने तालुक्यातील गुरांना उष्माघातासह विविध आजारांचा धोका वाढला आहे. उन्हात पशूधनांना फटका बसत असून या उन्हामुळे मुके प्राणी बेहाल झाले आहेत.

सिन्नर : तालुक्याचे सरासरी तापमान ४० अंश सेल्सिअसच्यावर जात असल्याने तालुक्यातील गुरांना उष्माघातासह विविध आजारांचा धोका वाढला आहे. उन्हात पशूधनांना फटका बसत असून या उन्हामुळे मुके प्राणी बेहाल झाले आहेत. त्यामुळे उन्हाळी आजारांपासून जनावरांना वाचविण्यासाठी लसीकरण मोहीम वेगाने राबविण्याची गरज निर्माण झाली आहे. मे महिना उजाडल्यापासून तालुक्याचे तपमान दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. सध्या तालुक्याचे सरासरी तापमान ४० अंश सेल्सिअसच्यावर राहत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. उन्हापासून मानव विविध मार्गांनी आपला बचाव करुन घेवू शकतात. मात्र जनावरांना या कडक उन्हाचा फटका बसत आहे. तालुक्यातील ३० टक्के गुरे ही प्रजननक्षम असल्याने त्यांच्यावर प्रामुख्याने लक्ष केंद्रीत करण्याची गरज आहे. चारा व पाणीटंचाईमुळे तालुक्यातील जनावरांची रानात भटकंती सुरू आहे. त्यात पाण्याची व ओल्या चाऱ्याची कमतरता असल्याने जनावरांवर विपरीत परिणाम होत आहे. वाढत असलेल्या उन्हाच्या तीव्रतेमुळे जनावरांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे. तालुक्यात उन्हाचा पारा वाढत असल्याने जनावरांना उष्माघाताचा धोका निर्माण झाला आहे. उष्माघातामध्ये जनावरांच्या शरिराचे तापमान १०३ ते १०७ अंशापर्यंत वाढते. यामुळे श्वसनाचा वेग, हृदयाचे ठोके वाढणे, जीभ बाहेर काढून तोंडाने श्वसन करणे, लाळ गाळणे, नाकातून स्त्राव येणे, भरपूर तहान लागणे, अस्वस्थता येणे, जनावरांचा तोल जावून ते खाली कोसळणे, झटके येणे व जनावरे दगावल्याची भीती वाढली आहे. चारा व पाण्याच्या शोधात अनेक जनावरांना उन्हाचा चटका बसत असून वेगवेगळ्या आजारांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे जनावरांची पशुधन विभागाकडून लसीकरण व पशुपालकांना मार्गदर्शनाची गरज निर्माण झाली आहे.----------------समर फिवरचा धोका वाढलाउन्हाच्या या तीव्रतेमुळे जनावरांची प्रजनन क्षमता कमी होणे, वजन घटणे, अतिप्रखर सूर्यप्रकाशामुळे जनावरांना विविध आजारांचा सामना करावा लागत आहे. तालुक्यातील तपमान वाढल्यामुळे जनावरांना समर फिवरचा धोका वाढला आहे. समर फिवरपासून जनावराांची वेळीच काळजी घेणे गरजेचे आहे.--------------मोकाट जनावरे आजारांचे बळीचारा व पाणीटंचाईमुळे अनेक पशूपालक आपली जनावरे मोकाट सोडत आहेत. शहरी भागातही असे अनेक जनावरे मोकाट फिरतांना दिसतात. या जनावरांना वेळेवर चारा व पाणी मिळत नसल्याने मोकाट जनावरे विविध आजारांचे बळी पडत आहे. चारा व पाण्याच्या शोधात फिरणाºया जनावरांना ऊन लागुन झटके येणे व जनावरांचा तोल जावून जनावर जमिनीवर कोसळण्याचे प्रमाण वाढले आहे. 

टॅग्स :Nashikनाशिक