शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
5
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
6
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
7
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
8
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
9
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
10
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
11
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
12
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
13
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
14
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
15
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
16
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
17
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
18
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
19
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
20
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या

स्वामी विवेकानंदांचे विचार कृतीत परावर्तित व्हावेत - कल्याणात्मानंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2018 01:40 IST

स्वामी विवेकानंदांनी लोकांच्या कल्याणासाठी सर्व आयुष्य वेचले. स्वामी विवेकानंदांनी शंभर नचिकेत मिळावेत अशी इच्छा व्यक्त केली होती. हे नचिकेत आभाळातून पडणार नसून तत्कालीन बांधवांमधूनच ते येणे अपेक्षित होते व आलेही. आज त्यांच्या भाषणाच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित कार्यक्रमात त्यांच्या विचारांचे कृतीत परिवर्तन करणारे अनुयायी तयार झाले पाहिजेत आणि त्यांनी देशकल्याणात मोठे योगदान दिले पाहिजे, असे प्रतिपादन मुंबईच्या रामकृष्ण मठ मिशनचे स्वामी कल्याणात्मानंद यांनी केले.

नाशिक : स्वामी विवेकानंदांनी लोकांच्या कल्याणासाठी सर्व आयुष्य वेचले. स्वामी विवेकानंदांनी शंभर नचिकेत मिळावेत अशी इच्छा व्यक्त केली होती. हे नचिकेत आभाळातून पडणार नसून तत्कालीन बांधवांमधूनच ते येणे अपेक्षित होते व आलेही. आज त्यांच्या भाषणाच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित कार्यक्रमात त्यांच्या विचारांचे कृतीत परिवर्तन करणारे अनुयायी तयार झाले पाहिजेत आणि त्यांनी देशकल्याणात मोठे योगदान दिले पाहिजे, असे प्रतिपादन मुंबईच्या रामकृष्ण मठ मिशनचे स्वामी कल्याणात्मानंद यांनी केले. ते डॉ. कुर्तकोटी सभागृह येथे आयोजित कार्यक्रमात बोलत होते. ते पुढे म्हणाले, स्वामी विवेकानंद यांची आई धर्मप्रवण होती. ती विवेकानंदांना रामायण, महाभारत यांसारख्या प्रेरणादायी गोष्टी सांगत, त्यावर आधारित व्याख्यानांना घेऊन जात. त्यातून विवेकानंद घडत गेले. त्यांनी आयुष्यभर आपल्या पुस्तकांमधून, व्याख्यानांमधून देशहितावर भर दिला. संवेदनशील नागरिकांची फळी तयार केली. विवेकानंदांची ही शिकवण, कार्य आपण पुढे नेली पाहिजे असे आवाहनही त्यांनी यावेळी उपस्थिताना केले. रामकृष्ण विवेकानंद सेवाश्रम, रामकृष्ण शारदाश्रम, विवेकानंद केंद्र कन्याकुमारी व जिव्हाळा ग्रुप यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.विश्ववंद्य स्वामी विवेकानंद यांच्या शिकागो येथे भरलेल्या सर्वधर्म परिषदेतील व्याख्यानास मंगळवारी (दि. ११) १२५ वर्षं पूर्ण झाले आहे. या क्रांतिकारी व्याख्यानाची स्मृती जागृत करण्यासाठी व स्वामीजींचा संदेश सर्वदूर पोहोचविण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी खुशाल पोद्दार, जयंत दीक्षित, शशिकांत पिसू, डॉ. डी. एम. पवार, अमोल अहिरे आदी मान्यवर उपस्थित होते. बाळासाहेब मगर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी परीक्षेतील यशाबद्दल तेजश्री जाधव, मधुरा घोलप, मंदार घुले या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. मान्यवरांच्या उपस्थितीत ‘सेवा समर्पण’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

टॅग्स :cultureसांस्कृतिकNashikनाशिक