शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

स्वच्छ भारत अभियान : ९४ ग्रामपंचायतींत १८,२६२ शौचालयांची कामे पूर्ण इगतपुरी तालुक्याची स्वच्छतेकडे झेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2017 00:20 IST

पंचायत समिती प्रशासनाने केंद्र सरकारची स्वच्छ भारत अभियान योजना वेगाने राबविल्यामुळे इगतपुरी तालुक्याची वाटचाल हगणदारी-मुक्तीकडे सुरू झाली आहे.

ठळक मुद्दे१८ हजार २६२ शौचालयांची कामे पूर्णतीन कोटी ७९ लाख रुपयांचे अनुदान

इगतपुरी : पंचायत समिती प्रशासनाने केंद्र सरकारची स्वच्छ भारत अभियान योजना वेगाने राबविल्यामुळे इगतपुरी तालुक्याची वाटचाल हगणदारी-मुक्तीकडे सुरू झाली आहे.संपूर्ण इगतपुरी तालुका हगणदारीमुक्त झाल्याची घोषणा सभापती कल्पना हिंदोळे, उपसभापती भगवान आडोळे, गटविकास अधिकारी किरण जाधव यांनी संयुक्तपणे शनिवारी केली. मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीणा, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे, पाणी व स्वच्छ भारत अभियानाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रतिभा संगमनेरे यांच्या मार्गदर्शनातून इगतपुरी तालुक्याने स्वच्छतेकडे झेप घेतली आहे. तालुक्यातील ९४ ग्रामपंचायतींत एकूण १८ हजार २६२ शौचालयांची कामे पूर्ण झाली आहेत. पंचायत समितीच्या वतीने शौचालय बांधणाºया लाभार्थींना प्रत्येकी बारा हजार याप्रमाणे तालुक्यात तब्बल तीन कोटी ७९ लाख रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले आहे. ही संपूर्ण मोहीम यशस्वी झाली असल्याने इगतपुरी तालुक्याची मागास असलेली ओळख संपुष्टात आली आहे. केंद्र सरकारने स्वच्छ भारत अभियान योजनेंतर्गत संपूर्ण देश हगणदारीमुक्त करण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी भरीव अशी तरतूद करण्यात आली आहे. या योजनेचा पुरेपूर फायदा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी किरण जाधव व त्यांच्या अधिपत्याखालील प्रशासनाने घेतला. मागील पाच वर्षांत तालुक्यात केवळ काही गावे हगणदारीमुक्त झाली होती. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी किरण जाधव यांनी दोन गुडमॉर्निंग पथकाची स्थापना केली होती. त्यामध्ये विस्तार अधिकारी यांच्यासह ग्रामसेवक व पंचायत समितीच्या अनेक कर्मचाºयांचा समावेश होता.गावोगावी प्रबोधनअंगणवाडीसेविका व पशुधन अधिकारी यांना गावे वाटून देण्यात त्या त्या गावांत प्रबोधन करण्याचे काम त्यांच्यावर सोपविण्यात आले होते. गटविकास अधिकारी किरण जाधव व गुडमॉर्निंग पथकातील सदस्यांनी प्रत्येक गावात जाऊन हगणदारीमुक्त गावामुळे काय फायदा होतो याविषयी माहिती दिली. तसेच वेळ पडल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिल्यानंतर मोहिमेला सुरुवात करण्यात आली. या योजनेंतर्गत संपूर्ण इगतपुरी तालुका हगणदारीमुक्त झाल्याची घोषणा करण्यात आली. तांत्रिक अडचणी दूर होताच उर्वरित गावेही हगणदारीमुक्त होतील. जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर व इगतपुरी हे दोनच तालुके हगणदारीमुक्त असून, त्या पाठोपाठ इतर तालुक्यांचा क्र मांक लागत आहे. गुडमॉर्निंग पथकातील अधिकारी व कर्मचाºयांनी परिश्रम घेतल्याने तालुका लवकरच १०० टक्के हगणदारीमुक्त होणार आहे.