शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

रासाकासाठी स्वाभीमानी शेतकरी संघटना लढायला तयार - हंसराज वडघुले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2018 19:57 IST

रानवड साखरकारखाना सुरू व्हावा म्हणून मागील काळात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुढाकार घेतल्याने हा कारखाना सुरू झाला , या कारखान्याचे शेतकरी सभासद आणि कामगार यांच्यासाठी हा कारखाना कोणीही सुरू करणार असेल तर त्यांना आमचे सहकार्यच राहील. सरळ मार्गाने जर कारखाना चालू होणार नसेल तर स्वाभिमानी शेतकरी संघटना लढायला तयार आहे ,

निफाड : रानवड साखरकारखाना सुरू व्हावा म्हणून मागील काळात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुढाकार घेतल्याने हा कारखाना सुरू झाला , या कारखान्याचे शेतकरी सभासद आणि कामगार यांच्यासाठी हा कारखाना कोणीही सुरू करणार असेल तर त्यांना आमचे सहकार्यच राहील. सरळ मार्गाने जर कारखाना चालू होणार नसेल तर स्वाभिमानी शेतकरी संघटना लढायला तयार आहे , असे प्रतिपादन युवक स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष हंसराज वडघुले यांनी केले.  रानवड सहकारी साखर कारखान्यावर निफाड तालुक्यातील नेते व शेतकरी कामगार यांचा मेळावा झाला होता. या मेळाव्यात रानवड कारखाना सभासदांच्या ताब्यात द्यावा असा ठराव झाला होता. त्या पाशर््वभूमीवर भूमीका स्पष्ट करण्यासाठी निफाड येथे मंगळवारी (दि.१४) स्वाभिमानी शेतकरी संघटना व कामगार यांच्यावतीने आयोजित केलेल्या बैठकीत वडघुले बोलत होते.  वडघुले पुढे म्हणाले रानवड कारखाना चालू करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने लढा उभारन्याची वेळ आली तर त्या वेळी कामगारांनीही लढ्यात सहभागी व्हावे ,संघर्ष करायची तयारी ठेवावी,तरच न्याय मिळेल खासदार राजू शेट्टी जिल्ह्यात येणार आहेत. त्यावेळी त्यांच्यासमोर हा प्रश्न मांडून यामध्ये त्यांचे सहकार्य घेऊ असे ते म्हणाले.रानवड सहकारी साखर कारखाना कोणीही चालवायला घ्या त्याला आमचा आक्षेप नाही आमचे सहकार्यच राहील पण कोणत्याही परिस्थितीत हा कारखाना राज्याच्या साखर उद्योगाच्या धोरणांनुसार १ आॅक्टोबरलाच सुरू करा अशी एकमुखी मागणी रानवड सहकारी साखर कारखान्याच्या कर्मचारी वर्गाने यावेळी केली. याप्रसंगी , जिल्हाध्यक्ष सोमनाथ बोराडे, राजेंद्र मोगल, ए टी शिंदे, कामगार युनियन अध्यक्ष बळवंत जाधव, सुधाकर मोगल, साहेबराव शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.संघटनेचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ बोराडे म्हणाले रानवड कारखाना बंद असताना तालुक्यातील राजकीय व्यक्ती या विषयावर एक शब्दही बोलत नव्हते परंतु ५ आॅगस्टला रानवड येथील मेळाव्याला सर्व पक्षाचे नेते उपस्थित होते . मात्र रानवड कारखाना चालू व्हावा म्हणून वेळोवेळी लढा देणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला या मेळाव्याचे आमंत्रण दिले नाही याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला. राजेंद्र मोगल म्हणाले तालुक्यातील मुख्य नेत्यांना एकत्रित करून सर्वाना विश्वासात घेऊन याबाबत दिशा ठरवावी. कारखान्याचे कर्मचारी शिवराम रसाळ म्हणाले , कारखाना सभासदांनी चालवावा असा ठराव झाला आहे ,प्रत्येक कामगारांचे ४ ते ५ लाख रु कारखान्याकडे घेणे आहेत, ५ आॅगस्ट रोजी कारखाना कार्यस्थळावर झालेल्या मेळाव्यात या कारखान्याला फक्त ५ कोटी रु देणी असल्याचे सांगण्यात आले त्यात त्रृटी असून जवळपास २२ कोटी रु पये देणे असल्याचे त्यांनी  निदर्शनास आणून दिले. मार्च २०१२ पासून आजपर्यंत६०० कामगार निवृत्त झाले त्यांना ग्रॅज्युटी रक्कम मिळाली नसल्याचे सांगितले. यावेळी सुधाकर मोगल, सोमनाथ बोराडे, रासाका युनियन अध्यक्ष बळवंत जाधव ,ए टी शिंदे, कामगार युनूस उस्मान शेख ,अरु ण कुशारे,त्र्यंबक चव्हाणके,भाऊसाहेब तासकर, साहेबराव शिंदे, सुधाकर धारराव, बाळासाहेब काशीद, सुभाष गायकवाड यांनीही आपली भूमिका मांडली याप्रसंगी रानवड कारखान्याचे कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखाने