शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
2
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
3
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
4
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
5
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
6
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
7
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
8
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
9
एफडी विसरा, हायवेमध्ये करा गुंतवणूक! १०% पर्यंत मिळेल परतावा; 'राजमार्ग इनविट'ला सेबीची मंजुरी
10
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
11
'३ इडियट्स'च्या सीक्वलमधून शर्मन जोशीचा पत्ता कट?, अभिनेता म्हणाला- "मला तर..."
12
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
13
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
14
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
15
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
16
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
17
सीक्रेट सांतानं कर्मचाऱ्याला दिलेलं गिफ्ट पाहून तरुणी भलत्याच खूश झाल्या, असं काय मिळालं?
18
Travel : जगातील एक 'असे' ठिकाण, जिथे वेळेचे कोणतेच बंधन नाही! घड्याळ तर कुणी वापरतच नाही
19
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
20
'खेलरत्न'साठी हार्दिक! दिव्या देशमुखसह २४ खेळाडू अर्जुन पुरस्कारासाठी नामांकित; इथं पाहा संपूर्ण यादी
Daily Top 2Weekly Top 5

टंचाई आराखड्याचे गौडबंगाल कायम

By admin | Updated: February 24, 2015 01:59 IST

तिसऱ्यांदा फेरबदल : तेरा कोटी खर्च अपेक्षित

नाशिक : सलग दोन वेळेस विविध कारणे दाखवित टंचाई कृती आराखड्यात वेगवेगळे बदल करणाऱ्या जिल्हा परिषदेने अखेर जिल्हाधिकाऱ्यांना तिसऱ्यांदा आराखडा सादर केला असला तरी, पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी अंदाजित येणाऱ्या खर्चाच्या रकमेत कमालीची तफावत दर्शवितानाच टॅँकरद्वारे पाणीपुरवठ्यावरच अधिकाधिक भर देण्यात आल्याने त्या संदर्भातील गौडबंगाल कायम आहे. उन्हाळ्यात भेडसाविणाऱ्या पाणीटंचाईची समस्या कमी करण्यासाठी टंचाई कृती आराखड्यानुसार दरवर्षी नियोजन करणे अपेक्षित असल्याने जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने डिसेंबर महिन्यात जिल्हा प्रशासनाला पहिला आराखडा सादर केला व त्यात आॅक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यांत जिल्'ात कोसळलेल्या अवकाळी पावसाने ग्रामीण भागातील पाणीटंचाई दूर झाल्याचा दावा करून, त्यामुळे एकही योजना राबविण्याची गरज नसल्याचे म्हटले होते. एकीकडे अवकाळी पावसाने हात दिल्याचे सांगतानाच दुसरीकडे मात्र टंचाई निवारणासाठी १८ कोटी खर्च अपेक्षित असल्याचे म्हटले होते. जिल्हा प्रशासनाच्या लक्षात सदरची मेख येताच त्यांनी विचारणा केली असता, जिल्हा परिषदेने हा आराखडा मागे घेतला व चालू महिन्यात पुन्हा नव्याने २२ कोटी रुपये खर्चाचा दुसरा आराखडा तयार करून तो मंजुरीसाठी जिल्हा प्रशासनाकडे पाठविला. परंतु सदरचा आराखडा वस्तुस्थितीदर्शक नसल्याचा निष्कर्ष महसूल विभागाने काढून ग्रामीण पाणीपुरवठा विभागावर अविश्वास व्यक्त करताच जिल्हाधिकाऱ्यांनी सदरचा आराखडा फेटाळला व दोन दिवसांत नव्याने वस्तुस्थितीवर आधारित आराखडा तयार करण्याचे आदेश दिले. त्यानुसार दोन दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेने तिसऱ्यांदा आराखडा सादर केला असून, त्यात पाणीटंचाई निवारणार्थ १३ कोटी खर्च अपेक्षित असल्याचे म्हटले आहे.