शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

कत्तलीचा संशय : महापौरांच्या आरोपाला पुष्टी

By admin | Updated: February 8, 2015 23:57 IST

मालेगावी आढळली मृत जनावरे

मालेगाव : येथील पवारवाडी पोलीस ठाणे हद्दीत शनिवारी फार्मसी महाविद्यालयाच्या समोरील मैदानात सुमारे २५ ते ३० मयत जनावरे फेकलेले मिळून आले. राज्यात प्रथमच अपघात तसेच साथीव्यतिरिक्त एवढ्या मोठ्या प्रमाणावर मयत जनावरे मिळून आल्याने खळबळ उडाली आहे. शहरात मोठ्या प्रमाणावर अवैध कत्तल केली जात असल्याच्या महापौरांच्या आरोपाला यामुळे पुष्टी मिळाली आहे. शहराच्या आझादनगर भागात असलेल्या फार्मसी औषधशास्त्र महाविद्यालयाच्या समोरील बाजूस मोठे पटांगण आहे. या पटांगणाचा उपयोग मयत जनावरे फेकण्यासाठी केला जातो. अशा या जागेतून मोठी दुर्गंधी येत असल्याने परिसरातील रहिवाशांनी या भागात पाहणी केली असता त्यांना २५ ते ३० जनावरे मयत अवस्थेत आढळून आली. एवढ्या मोठ्या प्रमाणावर मेलेली जनावरे पाहून काही जागरूक नागरिकांनी पवारवाडी पोलीस ठाण्यात याची माहिती दिली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता नागरिकांच्या म्हणण्यात तथ्य आढळून आले. ही जनावरे गुदमरून मेल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज असून, ती दोन ते तीन दिवसांपूर्वी मयत झाली असल्याने दुर्गंधी येत आहे. पोलिसांनी या प्रकरणी पवारवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, या जनावरांना ओवाडी नाला परिसरात जेसीबीच्या सहाय्याने खड्डे खोदून पुरण्यात आले. ही जनावरे कत्तलीसाठी शहरात आणण्यात आली होती. जनावरांची वाहतूक करताना गाडीत गुदमरून मृत्यु झाल्याने त्यांना रात्रीच्या अंधारात फेकण्यात आल्याचे समजते. शहरात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीरपणे जनावरांची कत्तल केली जात असून, याकडे पोलीस दुर्लक्ष करीत असल्याच्या येथील महापौरांच्या आरोपाला यामुळे पुष्टी मिळते. शहरात मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीररीत्या वाहनांमध्ये जनावरे भरून आणली जात असताना, त्यांच्यावर कारवाई केली जात नसल्याचा आरोप नेहमीच करण्यात येतो. पोलीस या आरोपाचे खंडन करीत असले तरी राज्यासह इतर राज्यांतून रोज मोठ्या प्रमाणावर जनावरांची वाहतूक केली जात असल्याचे अनेकवेळा उघड झाले आहे. यातील काही जनावरे चोरी करून आणली जात असून, ही जनावरे निर्दयतेने कोंबल्याने गुदमरून मयत होतात. ही मयत जनावरे गुपचूप फेकून दिली जातात. यामुळे नेहमी कायदा व सुव्यवस्था धोक्यात येत असली तरी यावर कायमस्वरूपी उपाययोजना केली जात नाही. शहरात रोज सायंकाळी ते पहाटे यावेळेत नामपूर, सटाणा, कुसुंबा, दरेगाव, पवारवाडी, चंदनपुरी गेट या रस्त्यावरून जनावरांची वहातूक सुरु आहे. या प्रकारात सणाच्या काळात मोठी वाढ होेत असून, या काळात शहरातील जवळपास सर्वच रस्ते तसेच चौकात जनावरे बांधलेली असतात. या कत्तलीसाठी जनावरांची चोरी करण्यात येत असून, शेजारील जवळपास सर्व जिल्ह्यांतील पशुधनाच्या चोरीमुळे शेतकरी किंवा जनावरांचे मालक हवालदिल झाले आहेत. येथील जवळपास सर्वच पोलीस ठाण्यांत जनावरांच्या चोरीचे अनेक गुन्हे दाखल करण्यात आलेले असून, यातील जवळपास सर्व आरोपी अज्ञात आहेत.