शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

जंगलातून पळालेल्या मोरांना मातोरीत जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 18:09 IST

डोंगराळ भागातील पशु-पक्षी व जनावरे मानवी वस्तीकडे पाण्यासाठी वळू लागल्याची अनेक उदाहरणे आहेत. परंतु मातोरी येथे वन्य पशु-पक्ष्यांची गरज ओळखून ती पूर्ण करण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत. काही दिवसांपूर्वीच मातोरी गावातील डोंगरावरील जंगलाला अचानक आग लागल्याने आगीपासून

ठळक मुद्देआगीमुळे शेताकडे धाव : शिकाऱ्यांना गावबंदीचे फर्मान पशु-पक्षी व जनावरांना पिण्यासाठी पाणी मिळणे मुश्किल

लोकमत न्यूज नेटवर्कमातोरी : ग्रामीण भागात यंदा भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, पशु-पक्षी व जनावरांना पिण्यासाठी पाणी मिळणे मुश्किल झाले आहे. अशा परिस्थितीत काही दिवासांपूर्वी मातोरी नजीकच्या डोंगराला लागलेल्या आगीमुळे जीव वाचवून पायथ्याशी पळालेल्या पशु-पक्ष्यांसाठी गावातील शंकर पिंगळे यांनी पिण्याचे पाणी व खाद्याची व्यवस्था केल्याने दररोज शेकडो मोर व विविध पक्षी याठिकाणी आश्रयास येत आहेत.

डोंगराळ भागातील पशु-पक्षी व जनावरे मानवी वस्तीकडे पाण्यासाठी वळू लागल्याची अनेक उदाहरणे आहेत. परंतु मातोरी येथे वन्य पशु-पक्ष्यांची गरज ओळखून ती पूर्ण करण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत. काही दिवसांपूर्वीच मातोरी गावातील डोंगरावरील जंगलाला अचानक आग लागल्याने आगीपासून बचावासाठी तेथील पशु- पक्ष्यांनी अन्यत्र स्थलांतर केले. तर काहींनी पायथ्याशी असलेल्या शेतजमिनीकडे धाव घेतली. नेमकी हीच बाब शंकर पिंगळे या शेतकºयाच्या निदर्शनास आली. पिण्याचे पाणी व खाद्यासाठी अनेक पक्षी फिरत असल्याचे पाहून पिंगळे यांनी आपल्या शेतातच प्रारंभी पाण्याची व खाद्याची सोय केली. सुरुवातीला दोन-चार दिवस त्याला प्रतिसाद मिळाला नाही, मात्र त्यानंतर दररोज सकाळी पक्ष्यांचे थवेच्या थवे याठिकाणी येऊ लागले. विशेष करून त्यात मोरांची संख्या अधिक असून, सकाळी पाणी व खाद्यासाठी येणारे हे पक्षी दिवसभर मात्र अन्यत्र जात असले तरी, सायंकाळनंतर पुन्हा शेतात परतू लागले आहेत. त्यांची संख्या पाहता, पिंगळे यांनी मळ्याच्या शेजारी मोरांना पिण्यासाठी टाकी भरून ठेवली, त्याचबरोबर खाद्य म्हणून दाणे, वाळलेली द्राक्षे, धान्य आदी वस्तू ठेवल्या आहेत. त्यामुळे या पक्ष्यांना सदरचा भाग सुरक्षित वाटू लागला आहे. विशेष म्हणजे विविध जाती-प्रजातींच्या पक्ष्यांचे जतन करण्यासाठी मातोरी गावात शिकाऱ्यांना बंदी घालण्यात आली आहे.----डोंगराला अचानक आग लागल्याने मळ्यात काही मोर दिसले. त्यांच्या अन्न-पाण्याची गरज लक्षात आली त्यामुळे त्यांना गहू, द्राक्ष मनुके तसेच पाण्याची सोय केली. ते कोठेही दूरवर गेले तरी पाण्यासाठी व अन्नासाठी येथे येतात. त्यांच्यासाठी शेडची सोय केली असून, रात्री तेथे येऊन बसतात.

टॅग्स :WaterपाणीAnimal Abuseप्राण्यांवरील अत्याचार