वादळी पावसाने अंजनेरी गटात लाखोंचे नुकसाननाशिक : गेल्या दोन दिवसांपासून वादळी वार्यासह जोरदार झालेल्या पर्जन्यवृष्टीमुळे त्र्यंबकेश्वर तालुक्यात मोठ्या प्रमाणात घरांचे नुकसान झाल्याची माहिती जिल्हा परिषद उपाध्यक्ष संपतराव सकाळे यांनी दिली. त्यांच्या अंजनेरी गटातील टाके देवगाव येथील पावसामुळे पडझड झालेल्या घरांची पाहणी त्यांनी केली.गेल्या दोन दिवसांपासून नाशिक, त्र्यंबकेश्वर, सिन्नर, पेठ, सुरगाणा, देवळा, बागलाणसह अन्य तालुक्यांत वादळी पावसामुळे शेतीची व राहत्या घरांची तसेच शासकीय इमारतींची मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातही वादळी पावसामुळे अनेक घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. उपाध्यक्ष संपतराव सकाळे यांच्या अंजनेरी गटातील काही गावांमध्ये मोठ्या प्रमाणात घरांचे पत्रे उडून तसेच भिंती कोसळून लाखोंचे नुकसान झाले आहे. उपाध्यक्ष संपतराव सकाळे यांनी गुरुवारी (दि. २९) टाके देवगाव येथील पडझड झालेल्या घरांची पाहणी केली. (प्रतिनिधी)टीप- पडझड झालेल्या घरांची पाहणी करताना संपतराव सकाळे यांचा फोेटो स्कर्निंगला दिला आहे.
नुकसानग्रस्त गावांची उपाध्यक्षांकडून पाहणी
By admin | Updated: May 30, 2014 01:04 IST