शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
3
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
4
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
5
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
6
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
7
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
8
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
9
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
10
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
11
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
12
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
13
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
14
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
15
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
16
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
17
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
18
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
19
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 

मनपाकडून ७३२ नागरिकांचे सर्वेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2020 00:15 IST

नाशिक : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी महापालिकेने गेल्या महिनाभरापासून काटेकोर उपाययोजना केल्या आहे. विशेषत: देश-विदेशांतून आलेल्या ७३२ नागरिकांचे सर्र्वेक्षण करून प्रशासनाने त्यांच्याबाबत विशेष काळजी घेतली आहे.

नाशिक : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी महापालिकेने गेल्या महिनाभरापासून काटेकोर उपाययोजना केल्या आहे. विशेषत: देश-विदेशांतून आलेल्या ७३२ नागरिकांचे सर्र्वेक्षण करून प्रशासनाने त्यांच्याबाबत विशेष काळजी घेतली आहे. यातील ५८३ नागरिकांचा होम क्वारंटाइनचा कलावधी पूर्ण झाला आहे.उर्वरित नागरिकांवरदेखील विशेष नजर ठेवण्यात येत आहे. त्यामुळे मुंबई- पुण्याजवळ असूनदेखील नाशिक शहरात संसर्ग नियंत्रित ठेवण्यात नाशिक महापालिकेला मोठे यश मिळाले आहे. कोरोनाचा संसर्ग देशात सुरू झाल्यानंतर केंद्र आणि राज्य शासनाने अनेक प्रकारच्या उपाययोजना सुचविल्या होत्या. त्यात देश-विदेशांतून येणाऱ्या नागरिकांची माहिती घेऊन त्यांचा शोध घेणे तसेच त्यांची आरोग्य तपासणी करून त्यांना गरजेनुसार होम क्वॉरंटाइन ठेवण्याचे निर्देश होते.महापालिकेने त्यानुसार उपाययोजना करताना विमानतळ तसेच रेल्वे प्रशासनाकडून अलीकडील काळात नागरिक कोठून आले, त्याची माहिती घेतली व त्यांंची आरोग्य तपासणी केली आहे. नाशिकमध्ये अमेरिका, आॅस्ट्रेलिया, दुबई, इटलीसह अन्य देशांतून आलेल्या ३९९ नागरिकांची माहिती घेऊन त्याचे सर्वेक्षण केले. अन्य राज्यांत जाऊन आलेल्या ३३३ नागरिकांसह एकूण ७३२ नागरिकांचे सर्वेक्षण केले आहे. यातील ५८३ नागरिकांचा १४ दिवसांचा होम क्वॉॅरंटाइन कालावधी पूर्ण झाला आहे, तर १४९ नागरिक वैद्यकीय पथकांच्या निगराणीखाली आहेत. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी शासनाकडून आदेश येताच कठोर उपाययोजना राबविल्यामुळे अन्य शहरांच्या तुलनेत नाशिक शहरात कोरोना नियंत्रणात राहिल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे.-------देश-विदेशांतूनच नव्हे तर अन्य जिल्ह्यातून आलेल्या नागरिकांनी त्वरित मनपास कळवावे, असे आवाहन करण्यात आले होते किंबहूना कायद्याने ते बंधनकारक करण्यात आले होते. परंतु तसे न कळविल्याने नाशिकमध्ये अशा नागरिकांची प्राथमिक अवस्थेत तपासणी करता आली नाही आणि पुढे तेच बाधित आढळले, असे महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सांगितले.

टॅग्स :Nashikनाशिक