शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

सुळे डाव्या कालव्याची जलसंपदामंत्र्यांकडून पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2019 13:07 IST

खामखेडा : कडवा धरण उपविभागांतर्गत पुनंद प्रकल्पातून सुळे डावा कालव्याच्या ३७ ते ४२ टप्प्यातील कामाची पाहणी जलसंपदा तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी नुकतीच केली. लवकरच बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन महाजन यांनी यावेळी दिले.

खामखेडा : कडवा धरण उपविभागांतर्गत पुनंद प्रकल्पातून सुळे डावा कालव्याच्या ३७ ते ४२ टप्प्यातील कामाची पाहणी जलसंपदा तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी नुकतीच केली. लवकरच बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन महाजन यांनी यावेळी दिले. ३७ किमीच्या पुढील टप्प्यातील कालवा हा खामखेडा व सावकी गावाच्या पूर्णत: डोंगराळ भागातून गेलेला आहे. कालव्यातून पाणी मिळत नसल्याने या परिसरातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामात पिकांना तसेच जनावरांना पिण्यासाठी देखील पाणी प्रश्न नेहमीच उद्भवत असतो. खामखेडा व सावकी गावातील सुळे डावा कालवा ३७ ते ४२ किमी बारमाही करावा, खामखेडा तसेच सावकी शिवारातील पाझर तलावात पावसाळ्यातील पूरपाणी तलावात साठवण्यासाठी याठिकाणी कालव्यांना गेट बसवण्यात यावे तसेच या कालव्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याने ३७ किमीच्या पाठीमागे मोठ्या प्रमाणावर कालव्याची गळती होते, याबाबत आमदार डॉ. राहुल आहेर यांच्या नेतृत्वाखाली खामखेडा व सावकी येथील सरपंचासह सदस्यांनी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची विधानभवनात भेट घेऊन निवेदन दिले होते. दरम्यान, पालकमंत्री गिरीश महाजन हे देवळा तालुक्यात विविध विकास कामांच्या उद्घाटनासाठी आले असता त्यांनी सुळे डाव्या कालव्याच्या कामाची पाहणी केली.याबाबतीत लवकरच बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन यावेळी पालकमंत्र्यांनी शेतकºयांना दिले. याप्रसंगी जिल्हा बँकेचे अध्यक्ष केदा आहेर, देवळा जि.प.सदस्या धनश्री आहेर, देवळ्याच्या नगराध्यक्षा ज्योत्स्ना आहेर, पंचायत समिती सदस्य कल्पना देशमुख, पंकज निकम आदीसह शेतकरी उपस्थित होते.--------------------पुनंद धरणातून सुळे डाव्या कालव्याद्वारे पिळकोस (ता. कळवण) गावाच्या ३७ किमी हद्दीपर्यंत कालव्याला बारमाही पाणी मिळते. पिळकोस गावापासून ३७ किमीच्या पुढील ४२ किमीच्या टप्प्यात खामखेडा व सावकी गावातील कालव्याला फक्त पावसाळ्यातच पूरपाणी दिले जाते. खामखेडा व सावकी गावातून जवळजवळ पाच किमीहून अधिक सुळे डावा कालवा वाहतो. मात्र पावसाळ्यातील पूरपाणीच या कालव्यातून शेतकºयांना मिळते. त्यामुळे जमिनी देऊनही कालव्याच्या माध्यमातून शेतकºयांचा फायदा होत नाही.

टॅग्स :Nashikनाशिक