शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

सुळे डाव्या कालव्याची जलसंपदामंत्र्यांकडून पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2019 13:07 IST

खामखेडा : कडवा धरण उपविभागांतर्गत पुनंद प्रकल्पातून सुळे डावा कालव्याच्या ३७ ते ४२ टप्प्यातील कामाची पाहणी जलसंपदा तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी नुकतीच केली. लवकरच बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन महाजन यांनी यावेळी दिले.

खामखेडा : कडवा धरण उपविभागांतर्गत पुनंद प्रकल्पातून सुळे डावा कालव्याच्या ३७ ते ४२ टप्प्यातील कामाची पाहणी जलसंपदा तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी नुकतीच केली. लवकरच बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन महाजन यांनी यावेळी दिले. ३७ किमीच्या पुढील टप्प्यातील कालवा हा खामखेडा व सावकी गावाच्या पूर्णत: डोंगराळ भागातून गेलेला आहे. कालव्यातून पाणी मिळत नसल्याने या परिसरातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामात पिकांना तसेच जनावरांना पिण्यासाठी देखील पाणी प्रश्न नेहमीच उद्भवत असतो. खामखेडा व सावकी गावातील सुळे डावा कालवा ३७ ते ४२ किमी बारमाही करावा, खामखेडा तसेच सावकी शिवारातील पाझर तलावात पावसाळ्यातील पूरपाणी तलावात साठवण्यासाठी याठिकाणी कालव्यांना गेट बसवण्यात यावे तसेच या कालव्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याने ३७ किमीच्या पाठीमागे मोठ्या प्रमाणावर कालव्याची गळती होते, याबाबत आमदार डॉ. राहुल आहेर यांच्या नेतृत्वाखाली खामखेडा व सावकी येथील सरपंचासह सदस्यांनी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची विधानभवनात भेट घेऊन निवेदन दिले होते. दरम्यान, पालकमंत्री गिरीश महाजन हे देवळा तालुक्यात विविध विकास कामांच्या उद्घाटनासाठी आले असता त्यांनी सुळे डाव्या कालव्याच्या कामाची पाहणी केली.याबाबतीत लवकरच बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन यावेळी पालकमंत्र्यांनी शेतकºयांना दिले. याप्रसंगी जिल्हा बँकेचे अध्यक्ष केदा आहेर, देवळा जि.प.सदस्या धनश्री आहेर, देवळ्याच्या नगराध्यक्षा ज्योत्स्ना आहेर, पंचायत समिती सदस्य कल्पना देशमुख, पंकज निकम आदीसह शेतकरी उपस्थित होते.--------------------पुनंद धरणातून सुळे डाव्या कालव्याद्वारे पिळकोस (ता. कळवण) गावाच्या ३७ किमी हद्दीपर्यंत कालव्याला बारमाही पाणी मिळते. पिळकोस गावापासून ३७ किमीच्या पुढील ४२ किमीच्या टप्प्यात खामखेडा व सावकी गावातील कालव्याला फक्त पावसाळ्यातच पूरपाणी दिले जाते. खामखेडा व सावकी गावातून जवळजवळ पाच किमीहून अधिक सुळे डावा कालवा वाहतो. मात्र पावसाळ्यातील पूरपाणीच या कालव्यातून शेतकºयांना मिळते. त्यामुळे जमिनी देऊनही कालव्याच्या माध्यमातून शेतकºयांचा फायदा होत नाही.

टॅग्स :Nashikनाशिक