शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

सुळे डाव्या कालव्याची जलसंपदामंत्र्यांकडून पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2019 13:07 IST

खामखेडा : कडवा धरण उपविभागांतर्गत पुनंद प्रकल्पातून सुळे डावा कालव्याच्या ३७ ते ४२ टप्प्यातील कामाची पाहणी जलसंपदा तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी नुकतीच केली. लवकरच बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन महाजन यांनी यावेळी दिले.

खामखेडा : कडवा धरण उपविभागांतर्गत पुनंद प्रकल्पातून सुळे डावा कालव्याच्या ३७ ते ४२ टप्प्यातील कामाची पाहणी जलसंपदा तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी नुकतीच केली. लवकरच बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन महाजन यांनी यावेळी दिले. ३७ किमीच्या पुढील टप्प्यातील कालवा हा खामखेडा व सावकी गावाच्या पूर्णत: डोंगराळ भागातून गेलेला आहे. कालव्यातून पाणी मिळत नसल्याने या परिसरातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामात पिकांना तसेच जनावरांना पिण्यासाठी देखील पाणी प्रश्न नेहमीच उद्भवत असतो. खामखेडा व सावकी गावातील सुळे डावा कालवा ३७ ते ४२ किमी बारमाही करावा, खामखेडा तसेच सावकी शिवारातील पाझर तलावात पावसाळ्यातील पूरपाणी तलावात साठवण्यासाठी याठिकाणी कालव्यांना गेट बसवण्यात यावे तसेच या कालव्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याने ३७ किमीच्या पाठीमागे मोठ्या प्रमाणावर कालव्याची गळती होते, याबाबत आमदार डॉ. राहुल आहेर यांच्या नेतृत्वाखाली खामखेडा व सावकी येथील सरपंचासह सदस्यांनी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची विधानभवनात भेट घेऊन निवेदन दिले होते. दरम्यान, पालकमंत्री गिरीश महाजन हे देवळा तालुक्यात विविध विकास कामांच्या उद्घाटनासाठी आले असता त्यांनी सुळे डाव्या कालव्याच्या कामाची पाहणी केली.याबाबतीत लवकरच बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन यावेळी पालकमंत्र्यांनी शेतकºयांना दिले. याप्रसंगी जिल्हा बँकेचे अध्यक्ष केदा आहेर, देवळा जि.प.सदस्या धनश्री आहेर, देवळ्याच्या नगराध्यक्षा ज्योत्स्ना आहेर, पंचायत समिती सदस्य कल्पना देशमुख, पंकज निकम आदीसह शेतकरी उपस्थित होते.--------------------पुनंद धरणातून सुळे डाव्या कालव्याद्वारे पिळकोस (ता. कळवण) गावाच्या ३७ किमी हद्दीपर्यंत कालव्याला बारमाही पाणी मिळते. पिळकोस गावापासून ३७ किमीच्या पुढील ४२ किमीच्या टप्प्यात खामखेडा व सावकी गावातील कालव्याला फक्त पावसाळ्यातच पूरपाणी दिले जाते. खामखेडा व सावकी गावातून जवळजवळ पाच किमीहून अधिक सुळे डावा कालवा वाहतो. मात्र पावसाळ्यातील पूरपाणीच या कालव्यातून शेतकºयांना मिळते. त्यामुळे जमिनी देऊनही कालव्याच्या माध्यमातून शेतकºयांचा फायदा होत नाही.

टॅग्स :Nashikनाशिक