शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

लोकसहभागातून दसाणा धरणाचे पुरपाणी अखेर सुकड नाल्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2019 13:29 IST

विरगाव : दसाणा धरणाचे पुरपाणी सुकड नाल्यात टाकण्याच्या कामाला अखेर यश आले आहे. लोकसहभागातून तसेच विरगाव येथील शेतकरी वर्गांच्या सहकार्यातून हा नदीजोड प्रकल्प यशस्वी झाला आहे. यामुळे विरगाव, वनोली, तरसाळी व औंदाणे येथील शेकडो हेक्टर क्षेत्रावरील शेतीला जीवदान मिळणार आहे.

विरगाव : दसाणा धरणाचे पुरपाणी सुकड नाल्यात टाकण्याच्या कामाला अखेर यश आले आहे. लोकसहभागातून तसेच विरगाव येथील शेतकरी वर्गांच्या सहकार्यातून हा नदीजोड प्रकल्प यशस्वी झाला आहे. यामुळे विरगाव, वनोली, तरसाळी व औंदाणे येथील शेकडो हेक्टर क्षेत्रावरील शेतीला जीवदान मिळणार आहे.बागलाण तालुक्याच्या पश्चिमेला असलेल्या दसाणा लघुमध्यम प्रकल्पाची साठवण क्षमता ७९ दलघफु असून दरवर्षी हा प्रकल्प काठोकाठ भरून ओसांडत असतो. या प्रकल्पातून दरवर्षी कान्हेरी नदीपात्राद्वारे लाखो लिटर पाणी वाहून जात असते. हेच पुरपाणी विरगाव येथील ब्रिटिशकालीन पाटाद्वारे सुकड नाल्यात टाकून पाण्यापासून वंचित असलेल्या गावांचा पाणीप्रश्न सोडवावा अशी मागणी या परिसरातून केली जात होती. यासाठी खालील गावातील शेतकरी वर्गाने अनेक वेळा संबंधित विभागाकडे लेखी मागणीही केली होती. मात्र यात समाधानकारक तोडगा निघत नसल्याने डोळ्यासमोर वाहून जाणारे पुरपाणी पाहण्याशिवाय या भागातील जनतेला गत्यंतर नव्हते. चालू वर्षी मात्र तरसाळी व औंदाणे या गावातील शेतकरीवर्गाने याप्रश्नी समाधानकारक तोडगा काढण्यासाठी पुन्हा एकदा प्रयत्न केला असता विरगाव येथील शेतकरीवर्गांचे मन वळविण्यात अखेर त्यांना यश आले आहे. यासाठी विरगावचे सरपंच ज्ञानेश्वर देवरे, तरसाळीचे प्रगतिशील शेतकरी सुधाकर पाटील, तुषार खैरणार आदींसह गावागावातील शेतकरी वर्गांची शिष्टाई कामी आली आहे. संपूर्ण तालुक्याभरात गत महिनाभरापासून संततधार चालू असून कान्हेरी नदीला सद्यस्थितीत मोठ्या प्रमाणात पुरपाणी चालू आहे. यातूनच गत महिन्याभरापासून हे पुरपाणी लोकसहभागाच्या जोरावर सुकड नाल्यात टाकण्यात आले असून यातून वनोली येथील खडक्या बंधाऱ्यासह विरगाव तसेच तरसाळी येथील लोकसहभागातून तयार करण्यात आलेले नालाबांध भरले गेले आहेत. शनिवारपासून हे पुरपाणी औंदाणे गावाकडे मार्गस्थ झाले आहे. कुठलीही शासकीय मदत न घेता हा नदी जोड प्रकल्प स्थानिक शेतकरीवर्गाने यशस्वी करून दाखविला आहे.

टॅग्स :Nashikनाशिक