शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
2
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
3
इस्राइलने इराणचा आणखी एक बडा मोहरा टिपला, चीफ ऑफ आर्मी स्टाफ अली शादमानी यांना मारल्याचा दावा  
4
हुल्लडबाजांच्या दुचाकी पुलावर आल्याने गर्दी झाली अन् होत्याचे नव्हते झाले!
5
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
6
मैत्री, न्यूड कॉल अन् धमकी...; तरुणाकडे सापडले तब्बल १३ हजार अश्लील फोटो, पोलिसांनाही बसला धक्का
7
डॉली चायवाला Starbucks चा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनणार का? समोर आलं सत्य, कंपनी म्हणाली...
8
Maharashtra Teachers: 'मी आजारी आहे किंवा...' बदलीसाठी खोटे बोलल्यास शिक्षकांच्या अंगलट येणार!
9
Sonam Raghuwanshi Video: सोनम आणि राजाच्या पुढे चालत होते तिन्ही आरोपी, नवीन व्हिडीओ व्हायरल
10
Video: ५ चेंडूत ५ बळी... IPL नंतरही दिग्वेश राठीचा जलवा कायम, केली अप्रतिम गोलंदाजी
11
Wedding Ritual: लग्नकार्य निर्विघ्नपणे पार पडावे म्हणून 'या' पाच देवतांना ठेवली जाते लग्नपत्रिका!
12
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
13
हद्दच झाली राव! वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बुक केली रुग्णवाहिका अन्...; 'अशी' झाली पोलखोल
14
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
15
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
16
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
17
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
18
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
19
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
20
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?

रणरणत्या उन्हात विद्यार्थ्यांची अनवाणी पायपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2019 17:49 IST

नांदूरशिंगोटे : मार्चपासून उन्हाचा तडाखा चांगलाच जाणवू लागला आहे. पाणी टंचाई तसेच उन्हामुळे प्राथमिक शाळेच्या वेळेत केलेला बदल विद्यार्थ्यांना त्रासदायक ठरत आहे. त्यामुळे शाळेच्या वेळेत बदल करण्याच्या मागणीचे निवेदन पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड यांना शालेय व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी व पालकांनी दिले आहे.

जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थी शाळा भर दुपारी दीड वाजता सुटत असल्याने चिमुकल्यांना कडक उन्हामध्ये पायी चालत दोन ते तीन किलोमीटर घरी यावे लागते. दुपारच्या कडक उन्हात शाळेची सुट्टी होत असल्याने लहानग्यांना उन्हाच्या तीव्र झळा सोसणे भाग पडत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. तसेच पाल्यांना उन्हामुळे उष्माघाताचा त्रास होवू लागल्याचे पालकांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. सकाळी ७.५० मिनिटांनी शाळा भरल्यानंतर दुपारी सव्वा वाजता शाळेची सुट्टी होत असल्याने लहान मुलांना अनवाणी वस्त्यांवर जावे लागते. बहुतेक मुलांच्या पायात चप्पलच नसल्याने डांबरी रस्त्यावरून जाताना चटके सोसणे भाग पडत आहे. अनेक विद्यार्थ्यांचे पालक शेतकरी, शेतमजूर तसेच वीटभट्टीवर कामावर असल्याने पालकांकडून शाळा सकाळी आठ ते साडेआकराच्या सत्रात भरण्यात यावी किंवा १०.४५ ते सायंकाळी ५ वा. करण्यात यावी अशी मागणी निवेदनात केली आहे. उन्हाचा तडाखा वाढल्यामुळे काही विद्यार्थी आजारी पडल्याचे पालकांचे म्हणणे आहे. आठ दिवसात शाळेच्या वेळेत बदल न केल्यास विद्यार्थ्यांना शाळेत पाठवले जाणार नसल्याचे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर सरपंच दत्तोपंत सांगळे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जयराम सांगळे, सतिष आव्हाड, कचरू मेंगाळ, बस्तीराम सांगळे, मारूती बोडके, सोनू मेंगाळ, मुक्ता आव्हाड, संदीप सांगळे, भोराबाई मेंगाळ, अंबादास आव्हाड आदींच्या स्वाक्षरी आहेत

टॅग्स :Schoolशाळा