शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाळ कांद्याचा आता बसेना मेळ, भाव वाढताच निर्यातबंदीचा खेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2020 17:29 IST

जळगाव नेऊर : कोरोना संकटकाळात उन्हाळं कांद्याला लागलेली साडेसाती शेतकऱ्यांची पाठ सोडायला तयार नाही, सहा महिन्यापासून भाववाढीच्या आशेने चाळीत साठवलेला कांदा सडलेला असताना उरलेला कांद्याला भाव वाढून चार पैसे पदरात पडतील या आशेवर असलेल्या शेतकऱ्यांचे मात्र केंद्र शासनाने कांदा निर्यातबंदी करु न तोंडचे पाणी पळविले आहे.

ठळक मुद्देसाठवणुकीवर परिणाम : तीन महिन्यापुर्वीच कांदा जीवनाश्यक वस्तुतून वगळला होता

जळगाव नेऊर : कोरोना संकटकाळात उन्हाळं कांद्याला लागलेली साडेसाती शेतकऱ्यांची पाठ सोडायला तयार नाही, सहा महिन्यापासून भाववाढीच्या आशेने चाळीत साठवलेला कांदा सडलेला असताना उरलेला कांद्याला भाव वाढून चार पैसे पदरात पडतील या आशेवर असलेल्या शेतकऱ्यांचे मात्र केंद्र शासनाने कांदा निर्यातबंदी करु न तोंडचे पाणी पळविले आहे. सन २०१९-२० वर्षात इतर राज्यात झालेल्या पावसाने त्या राज्यातील कांदा सडल्याने महाराष्ट्रातील बळीराजाच्या लाल कांद्याला सर्वाधिक भाव मिळाला, आणि चार पैसे पदरात पडले पण अतिवृष्टीने उन्हाळ कांद्याची रोपे सडुन गेली होती, म्हणून सोन्याच्या भावात रोपे खरेदी करून उन्हाळ कांदा लागवड केल्या, पण मागील वर्षी पाऊस जास्त पडल्यामुळे दव आणि धुके, तर कधी पाऊस तर कधी उष्ण दमट वातावरण राहिल्याने त्याचा परिणाम उन्हाळ कांद्यावर झाला. शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात औषधे फवारणी करु न कांदा वाचवला.मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी कांदा सडण्याचे प्रमाण अधिक आहे ,तसेच अनेक शेतकर्यांनी कोरोना संसर्ग साथीमुळे भाव वाढतात कि नाही यामुळे आहे त्या भावात कांदा विकला. जून महिन्यात केंद्र सरकारने जीवनावश्यक वस्तू कायद्यात बदल करु न त्यामधून कांदा वगळण्यात आला होता. त्यानंतर देशांतर्गत व विदेशात कांद्याला चांगला दर मिळत असल्याने बळीराजाच्या चेहºयावर समाधानी भाव उमटताना दिसत होते. खिशात चांगले पैसे जमा होत असल्याच्या या त्यांच्या आनंदावर निर्यातबंदी निर्णयाने विरजण पडले आहे.शेतकºयांचा कांदा पन्नास साठ टक्के चाळीतच सडल्याने उकिरड्यावर फेकावा लागला, उरलेल्या कांद्यातुन चार पैसे पदरात पडतील अशी अशा होती, मात्र केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी करु न तोंडचे पाणी पळविले आहे. त्यामुळे यापुढे शेतकरºयांनी कांदा साठवणूक करावी कि नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.- केदारनाथ कुराडे,जळगाव नेऊर. 

टॅग्स :agricultureशेतीonionकांदा