शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
2
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
3
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
4
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
5
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
6
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
7
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
8
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
9
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
10
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
11
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
12
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
13
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
14
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
15
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
16
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
17
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
18
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
19
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का
20
'सोन्याची आहे की चंद्रावरून आणलीत?'; प्राडाच्या सेफ्टी पिनचा सोशल मीडियावर धुमाकूळ! किंमत किती?

उन्हाळ कांदा सडला, शेतकऱ्यांवर आर्थिक संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2018 14:16 IST

जळगाव नेऊर : वर्षेभर केलेल्या कष्टातून खर्चही निघत नसल्याने भाववाढीच्या आशेने शेतकºयांनी गेल्या सहा महिन्यांपासून चाळीत साठविलेला उन्हाळ कांदा सडल्याने उकिरड्यावर फेकण्याची वेळ आली आहे. शेती व्यवसाय निसर्गाच्या लहरीपणावर अवलंबून आहे, कधी उत्पादन जास्त तर भाव कमी, तर कधी उत्पादन कमी तर भाव जास्त. सरकारचे धरसोड धोरण, बाजार पेठेतील असुरक्षित ...

जळगाव नेऊर : वर्षेभर केलेल्या कष्टातून खर्चही निघत नसल्याने भाववाढीच्या आशेने शेतकºयांनी गेल्या सहा महिन्यांपासून चाळीत साठविलेला उन्हाळ कांदा सडल्याने उकिरड्यावर फेकण्याची वेळ आली आहे. शेती व्यवसाय निसर्गाच्या लहरीपणावर अवलंबून आहे, कधी उत्पादन जास्त तर भाव कमी, तर कधी उत्पादन कमी तर भाव जास्त. सरकारचे धरसोड धोरण, बाजार पेठेतील असुरक्षित वातावरण, कोणत्याही अधिक उत्पादित मालाच्या निर्यातीच्या ठोस योजना नाही की भावाबाबत ठोस आश्वासन नसल्याने बºयाच वेळा शेतीमाल रस्त्यावर फेकण्याची वेळ शेतकºयांच्या नशिबी आली आहे. एक रु पया खर्चून पंचविस पैसे कमवायचे अशी स्थिती शेतकºयांवर आली आहे. आँगस्ट महिन्यात सुरू असलेल्या रिमझिम पाऊस व गारव्याने मोठ्या प्रमाणात शेतकºयांचा कांदा चाळीतच सडला आहे. सुरवातीला पोळ कांद्याला भाव असल्याने झालेल्या चार पैशातून मोठ्या प्रमाणात खर्च शेतकºयांनी उन्हाळ कांद्यावर केला. साधारणपणे सप्टेंबर महिन्यापासून उन्हाळ कांद्याची रोपे टाकण्याची लगबग सुरु होते. म्हणजे रोपे टाकण्यापासुन एक वर्षाचा कालावधी उन्हाळ कांद्याला झालेला आहे. उन बेमोसमी पाऊस, गारा , खराब हवामान या संकटातून उन्हाळ कांद्याचे पिक वाचवुन साठवलेला उन्हाळ कांदा चाळीतच खराब झाल्याने बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे. आज मिळणा-या भावातून शेतकºयांचा खर्चही वसुल होत नसल्याने पर्यायाने मिळेल त्या भावात कांदा विक्र ी करावा लागत आहे.********************कांद्याचे उळे टाकण्यापासून आज वर्षाचा कालावधी संपत आलेला आहे पण सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत कांद्याचे भाव कमी झाल्यामुळे चाळीमध्ये साठविलेला उन्हाळ कांदा चाळीतच खराब होत असल्याने कवडीमोल भावाने विकणे अथवा उकिरड्यावर फेकण्याची वेळ शेतक-यांवर आली आहे. त्यामुळे शासनाने वेळीच लक्ष घालून कांदयांस किमान दोन हजार रूपये हमी भाव द्यावा व शेतक-यांना आधार द्यावा.-केदारनाथ कुराडे, कांदा उत्पादक शेतकरी, जळगाव नेऊर

टॅग्स :Nashikनाशिक