शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
3
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
4
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
5
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
6
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
7
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
8
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
9
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
10
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
11
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
12
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
13
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
14
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
15
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
16
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
17
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
18
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
19
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!

उन्हाळ कांदा सडला, शेतकऱ्यांवर आर्थिक संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2018 14:16 IST

जळगाव नेऊर : वर्षेभर केलेल्या कष्टातून खर्चही निघत नसल्याने भाववाढीच्या आशेने शेतकºयांनी गेल्या सहा महिन्यांपासून चाळीत साठविलेला उन्हाळ कांदा सडल्याने उकिरड्यावर फेकण्याची वेळ आली आहे. शेती व्यवसाय निसर्गाच्या लहरीपणावर अवलंबून आहे, कधी उत्पादन जास्त तर भाव कमी, तर कधी उत्पादन कमी तर भाव जास्त. सरकारचे धरसोड धोरण, बाजार पेठेतील असुरक्षित ...

जळगाव नेऊर : वर्षेभर केलेल्या कष्टातून खर्चही निघत नसल्याने भाववाढीच्या आशेने शेतकºयांनी गेल्या सहा महिन्यांपासून चाळीत साठविलेला उन्हाळ कांदा सडल्याने उकिरड्यावर फेकण्याची वेळ आली आहे. शेती व्यवसाय निसर्गाच्या लहरीपणावर अवलंबून आहे, कधी उत्पादन जास्त तर भाव कमी, तर कधी उत्पादन कमी तर भाव जास्त. सरकारचे धरसोड धोरण, बाजार पेठेतील असुरक्षित वातावरण, कोणत्याही अधिक उत्पादित मालाच्या निर्यातीच्या ठोस योजना नाही की भावाबाबत ठोस आश्वासन नसल्याने बºयाच वेळा शेतीमाल रस्त्यावर फेकण्याची वेळ शेतकºयांच्या नशिबी आली आहे. एक रु पया खर्चून पंचविस पैसे कमवायचे अशी स्थिती शेतकºयांवर आली आहे. आँगस्ट महिन्यात सुरू असलेल्या रिमझिम पाऊस व गारव्याने मोठ्या प्रमाणात शेतकºयांचा कांदा चाळीतच सडला आहे. सुरवातीला पोळ कांद्याला भाव असल्याने झालेल्या चार पैशातून मोठ्या प्रमाणात खर्च शेतकºयांनी उन्हाळ कांद्यावर केला. साधारणपणे सप्टेंबर महिन्यापासून उन्हाळ कांद्याची रोपे टाकण्याची लगबग सुरु होते. म्हणजे रोपे टाकण्यापासुन एक वर्षाचा कालावधी उन्हाळ कांद्याला झालेला आहे. उन बेमोसमी पाऊस, गारा , खराब हवामान या संकटातून उन्हाळ कांद्याचे पिक वाचवुन साठवलेला उन्हाळ कांदा चाळीतच खराब झाल्याने बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे. आज मिळणा-या भावातून शेतकºयांचा खर्चही वसुल होत नसल्याने पर्यायाने मिळेल त्या भावात कांदा विक्र ी करावा लागत आहे.********************कांद्याचे उळे टाकण्यापासून आज वर्षाचा कालावधी संपत आलेला आहे पण सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत कांद्याचे भाव कमी झाल्यामुळे चाळीमध्ये साठविलेला उन्हाळ कांदा चाळीतच खराब होत असल्याने कवडीमोल भावाने विकणे अथवा उकिरड्यावर फेकण्याची वेळ शेतक-यांवर आली आहे. त्यामुळे शासनाने वेळीच लक्ष घालून कांदयांस किमान दोन हजार रूपये हमी भाव द्यावा व शेतक-यांना आधार द्यावा.-केदारनाथ कुराडे, कांदा उत्पादक शेतकरी, जळगाव नेऊर

टॅग्स :Nashikनाशिक