शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

पाटणे परिसरात उन्हाळ कांदा लागवड सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:18 IST

अतिवृष्टीमुळे उन्हाळ कांद्याची रोपे खराब झाल्याने शेतक-यांनी पुन्हा बियाणे ३ ते ४ हजार रुपये किलो दराने खरेदी ...

अतिवृष्टीमुळे उन्हाळ कांद्याची रोपे खराब झाल्याने शेतक-यांनी पुन्हा बियाणे ३ ते ४ हजार रुपये किलो दराने खरेदी करून रोपे तयार केली. त्यामुळे एकाच वेळी सध्या कांद्याची लागवड सुरू आहे. यावर्षी मुबलक पावसामुळे सर्वत्र विहिरींना मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने तसेच मध्यंतरी कांद्याचे भाव वाढल्यामुळे कांदा पिकांच्या लागवड क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कांदा लागवडीसाठी मजुरी एकरी ७ ते ८ हजार रुपये किंवा अडीचशे ते तीनशे रुपये रोजाने मजूर वर्ग कांद्याची लागवड करताना दिसून येत आहेत. लागवडीचा वाढता खर्च, रोपांचा भाव, मजुरांची टंचाई, रासायनिक खतांचे वाढीव दर, भारनियमन अशा सर्व संकटांना सामोरे जाऊन बळीराजा कांदा लागवड करताना दिसत आहे.

खर्च वाढल्याने शेतकरी हतबल झाला आहे. कांदा लागवडीपूर्वीची मशागत ५ हजार रुपये, कांदा लागवड मजुरी ८ हजार रुपये, कांदा बियाणे व रोप लागवड करण्यायोग्य होईपर्यंत १० हजार रुपये खर्च, ३ हजार रुपये रासायनिक खते, ५ हजार रुपये शेणखत तसेच मजुरांची वाहतूक खर्च वेगळाच असतो. इतका खर्च करावा लागत असल्याने बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे. शिवाय कांद्याचे उत्पादन चांगले मिळेलच याची शाश्वती नाही. उन्हाळ कांद्याची विक्रमी लागवड सुरू असतानाच शेतकऱ्यांना अधिक प्रमाणात खर्च करावा लागत आहे. तसेच मजुरांची टंचाई, वाढती मजुरी, रोपांचा तुटवडा, भारनियमनाचा फटका, वाढती थंडी या सर्व समस्यांना सामोरे जाण्याची वेळ बळीराजावर येऊन ठेपली आहे.