शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक इनिंग; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

पाटणे परिसरात उन्हाळ कांदा लागवड सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:18 IST

अतिवृष्टीमुळे उन्हाळ कांद्याची रोपे खराब झाल्याने शेतक-यांनी पुन्हा बियाणे ३ ते ४ हजार रुपये किलो दराने खरेदी ...

अतिवृष्टीमुळे उन्हाळ कांद्याची रोपे खराब झाल्याने शेतक-यांनी पुन्हा बियाणे ३ ते ४ हजार रुपये किलो दराने खरेदी करून रोपे तयार केली. त्यामुळे एकाच वेळी सध्या कांद्याची लागवड सुरू आहे. यावर्षी मुबलक पावसामुळे सर्वत्र विहिरींना मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने तसेच मध्यंतरी कांद्याचे भाव वाढल्यामुळे कांदा पिकांच्या लागवड क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कांदा लागवडीसाठी मजुरी एकरी ७ ते ८ हजार रुपये किंवा अडीचशे ते तीनशे रुपये रोजाने मजूर वर्ग कांद्याची लागवड करताना दिसून येत आहेत. लागवडीचा वाढता खर्च, रोपांचा भाव, मजुरांची टंचाई, रासायनिक खतांचे वाढीव दर, भारनियमन अशा सर्व संकटांना सामोरे जाऊन बळीराजा कांदा लागवड करताना दिसत आहे.

खर्च वाढल्याने शेतकरी हतबल झाला आहे. कांदा लागवडीपूर्वीची मशागत ५ हजार रुपये, कांदा लागवड मजुरी ८ हजार रुपये, कांदा बियाणे व रोप लागवड करण्यायोग्य होईपर्यंत १० हजार रुपये खर्च, ३ हजार रुपये रासायनिक खते, ५ हजार रुपये शेणखत तसेच मजुरांची वाहतूक खर्च वेगळाच असतो. इतका खर्च करावा लागत असल्याने बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे. शिवाय कांद्याचे उत्पादन चांगले मिळेलच याची शाश्वती नाही. उन्हाळ कांद्याची विक्रमी लागवड सुरू असतानाच शेतकऱ्यांना अधिक प्रमाणात खर्च करावा लागत आहे. तसेच मजुरांची टंचाई, वाढती मजुरी, रोपांचा तुटवडा, भारनियमनाचा फटका, वाढती थंडी या सर्व समस्यांना सामोरे जाण्याची वेळ बळीराजावर येऊन ठेपली आहे.