शहरं
Join us  
Trending Stories
1
GST: जीएसटी कपातीच्या बैठकीत मोठे राजकारण रंगले; विरोधी राज्यांचे अर्थमंत्री अडून बसले, गोष्ट मतदानापर्यंत गेलेली...
2
मोठा गाजावाजा करत मुंबईकडे कूच करणार त्याआधीच वैभव खेडेकरांचा भाजपा पक्षप्रवेश स्थगित; कारण काय?
3
नाशिक मंडळ : अल्प उत्पन्न गटासाठी म्हाडाची ४७८ घरे
4
पुरामुळे भारत-पाकिस्तान सीमेचे मोठे नुकसान; ११० किमीच्या कुंपणाची पडझड, बीएसएफच्या ९० चौक्या पाण्यात
5
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेल्या नूर खान एअरबेसच्या दुरुस्तीचे काम सुरू; भारताने ब्राह्मोस टाकून उद्ध्वस्त केले होते
7
फार्महाऊसवर सीक्रेट बैठक, असीम मुनीरचा तगडा प्लॅन; पुढील १० वर्ष पाकिस्तानवर करणार 'राज्य'
8
बस फक्त पेट्रोल, डिझेल तेवढे जीएसटीमध्ये आणायचे राहिले...; तिजोरीत फक्त २० रुपयेच आले असते...
9
शिक्षक दिनानिमित्त मराठी Messages, Quotes, Whatsapp Status आणि Greetings शेअर करुन द्या लाडक्या शिक्षकांना शुभेच्छा!
10
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
11
मुंबई उपनगरात ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल, ५ सप्टेंबरची सुट्टी कधी? जाणून घ्या
12
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
13
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
14
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?
15
देवाची प्रत्यक्ष भेट! उपेंद्र लिमये यांना भेटले सुपरस्टार रजनीकांत, थलायवाला पाहून अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
16
खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ...
17
US Open 2025: अमेरिकन ओपन स्पर्धेत भारतीयाचा जलवा! जेतेपदाच्या अगदी जवळ पोहचलाय; आता फक्त...
18
पीएम किसानचा २१ वा हप्ता अडकणार? 'ही' चूक तात्काळ दुरुस्त करा, अन्यथा २००० रुपये मिळणार नाहीत!
19
१८ तास असेल राम मंदिर बंद, ‘या’ दिवशी अयोध्येत अजिबात जाऊ नका; रामलला विश्रांती घेणार?
20
हुंड्याने घेतला आणखी एक बळी! २८ वर्षांच्या पूजाश्रीने संपवलं जीवन, पतीला अटक, काय-काय घडलं?

उन्हाळ कांदा संकटातकांदा भावात घसरण सुरूच

By admin | Updated: October 25, 2016 22:55 IST

शेतकऱ्यांमध्ये नाराजी : कांद्याची आवक वाढली;

येवला : गेल्या वर्षाच्या तुलनेत दक्षिणेकडील राज्यातून नवीन लाल कांद्याची आवक दहा पटीने वाढली असून, नाशिकसह काही भागातील शेतकऱ्यांनी एप्रिलपासून साठवून ठेवलेला कांदा आता नव्या कांद्याच्या तुलनेत चवीतदेखील फरक दाखवत असल्याने त्याची मागणी घटली आहे. त्यामुळे साठवण केलेला उन्हाळ कांदा संकटात सापडला असून, भाव मिळण्याची आशा तर सोडाच कांदा फेकण्याची वेळ आल्याने अशा परिस्थितीत शासनाने मदतीचा हात देण्याची अपेक्षा व्यक्त जात आहे.कर्नाटक (बंगळुरू) या मार्केटला सध्या एक लाख क्विंटल लाल कांद्याची आवक होत आहे. येथून संपूर्ण भारतात व परदेशात कांद्याची निर्यात होते. सध्या बंगळुरूला या नवीन लाल कांद्याला ८०० ते ११०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे. या मालाचा दर्जा आणि प्रतवारीदेखील चांगली आहे. नाशिक परिसरातील उन्हाळ कांदा हा शेतकऱ्याने एप्रिलमध्ये साठवला आहे. सहा महिने साठवलेला कांदा मोठ्या प्रमाणावर खराब झाला. जो कांदा शिल्लक राहिला त्याची गुणवत्ता काहीशी खराब झाली आहे. त्यामुळे लाल नवीन कांद्यापुढे साठवलेला उन्हाळ कांदा फिक्का पडत असल्याने त्याला व्यापारीपेठेत मागणी कमी झाली आहे. याशिवाय येवल्यासह नाशिक परिसरात १० ते १५ नोव्हेंबरपासून नवीन लाल कांद्याची आवक वाढण्यास सुरुवात होईल.सध्या उन्हाळ कांद्याला भाव कमी असला तरी उत्पादन खर्चाच्या ४० टक्के रक्कम तरी मोठ्या जिकिरीने मिळत आहे. नुकसान होत असले तरी आता उन्हाळ कांदा मार्केटला आणून कांदा चाळीखाली करण्याशिवाय पर्याय नाही. दीपावलीच्या कालावधीत २६ आॅक्टोबर ते २ नोव्हेंबरपर्यंत येवला कांदा मार्केट बंद असणार आहे. नोव्हेंबरमध्ये नवा कांदा बाजारात येईल आणि साठवण केलेल्या उन्हाळ कांद्याची कवडीमोल किंमत होईल या धास्तीने येवला कांदा बाजार आवारात उन्हाळ कांद्याची आवक स्थिर असून, बाजारभाव मात्र घसरत आहे. यामुळे आताच कांद्याला भाव नाही तर नव्या पोळ लाल कांद्याला भाव कसा मिळणार, असा सवाल बाजार समितीच्या परिसरात कांदा उत्पादक शेतकरी विचारत आहेत.कांद्याने शेतकऱ्याची पुरती निराशा केली आहे. वाहतूक खर्चदेखील फिटत नसल्याने हवालदिल झाला आहे. उन्हाळ कांदा साठवला तेव्हा १५०० ते २००० रु पये भाव मिळेल अशी अपेक्षा होती. कांदा बाजारभावाला लागलेली उतरती कळा आणि कांद्याचे ४५० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत भाव आल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अत्यंत वाईट दिवसाचा सामना करावा लागत आहे. गेल्या १५ दिवसांपासून दररोज कांद्याच्या बाजारभावात सारखा चढउतार चालू आहे.शेतकऱ्याला शेतकामातून थोडी उसंत मिळाली की पुन्हा कांद्याची प्रचंड आवक होईल आणि पुन्हा कांदा भरडला जाण्याची चिन्हे गडद झाली आहे.देशभरात विक्र मी कांदा उत्पादन असताना अतिरिक्त कांदा निर्यात करण्यासाठी शासनाने निश्चित पावले उचलावीत. निर्यात धोरणात कुचराई झाल्याने देशात मोठ्या प्रमाणावर कांदा पडून आहे. याचा फटका कांदा भाव कोसळण्यावर होत आहे. (वार्ताहर)