शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

संरक्षण सामग्रीच्या उत्पादन प्रक्रि येत नाशिक क्षेत्र योग्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2018 00:10 IST

संरक्षण साहित्य व सामग्रीच्या देशांतर्गत उत्पादन प्रक्रि येत नाशिकचे औद्योगिक क्षेत्र योग्य असल्याचे मत संरक्षण (उत्पादन) मंत्रालयाचे संयुक्त सचिव संजय जाजू यांनी निमात आयोजित चर्चासत्रात व्यक्त केल्याने प्रस्तावित डिफेन्स इनोव्हेशन हबद्वारे नवनिर्मितीस उत्सुक असलेल्या उद्योगांना प्रोत्साहन मिळणार आहे.

ठळक मुद्देसंजय जाजू : डिफेन्स इनोव्हेशन हबवर संवाद

सातपूर : संरक्षण साहित्य व सामग्रीच्या देशांतर्गत उत्पादन प्रक्रि येत नाशिकचे औद्योगिक क्षेत्र योग्य असल्याचे मत संरक्षण (उत्पादन) मंत्रालयाचे संयुक्त सचिव संजय जाजू यांनी निमात आयोजित चर्चासत्रात व्यक्त केल्याने प्रस्तावित डिफेन्स इनोव्हेशन हबद्वारे नवनिर्मितीस उत्सुक असलेल्या उद्योगांना प्रोत्साहन मिळणार आहे.नाशिकच्या प्रस्तावित डिफेन्स इनोव्हेशन हबसंदर्भात संरक्षण (उत्पादन) मंत्रालयाचे संयुक्त सचिव संजय जाजू यांनी निमाला भेट देऊन उद्योजकांशी संवाद साधला. यावेळी जाजू यांनी सांगितले की, नाशिक औद्योगिक क्षेत्र उत्पादक हब म्हणून आधीच नावाजलेले आहे. नाशिकच्या उद्योगांची क्षमता पाहता डिफेन्स इनोव्हेशन हबद्वारे संरक्षण क्षेत्रातदेखील मोठे योगदान देतील. बऱ्याच वर्षांनंतर संरक्षण साहित्याच्या आयातीला पर्याय म्हणून देशांतर्गत उत्पादन प्रक्रि येस सुरु वात झाली आहे. त्यामुळे आगामी डिफेन्स इनोव्हेशनद्वारे नवनिर्मितीस उत्सुक असलेल्या उद्योगांना प्रोत्साहन मिळणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.कर्नल सुजित भोसले यांनी डिफेन्स पीएस यूज इस्टॅब्लिशमेन्ट अराउंड नाशिक या विषयावर पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन सादर केले. यावेळी एचएएलचे उपमहाव्यवस्थापक गिरीश कर्वे, निमाचे अध्यक्ष हरिशंकर बॅनर्जी, सायबर तज्ज्ञ अमर ठाकरे यांनी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनद्वारे नाशिकच्या क्षमतांची माहिती दिली.व्यासपीठावर निमाचे उपाध्यक्ष शशिकांत जाधव, सरचिटणीस तुषार चव्हाण, प्रदीप पेशकार, महिंद्र कंपनीचे उपाध्यक्ष हिरामण आहेर, डिफेन्स इनोव्हेशन हबचे समन्वयक प्रशांत पाटील, संरक्षण खात्याचे उपसंचालक संजीव चड्डा, नौदलातील एव्हीएशन विंगचे कमांडर राजेश बाबू आदी उपस्थित होते. स्वागत प्रदीप पेशकार यांनी केले. आभार तुषार चव्हाण यांनी मानले. यावेळी सुधाकर देशमुख, कैलास आहेर, संदीप भदाणे, संजय सोनवणे, देवेंद्र बापट, मनीष कोठारी, मंगेश पाटणकर, अखिल राठी, मनीष रावळ, उदय रकिबे, एम. जी. कुलकर्णी, हिमांशू कनानी, गौरव धारकर, राजेंद्र जाधव, समीर पटवा, जयंत खेडकर, राजेश गडाख आदींसह उद्योजक व अधिकारी उपस्थित होते.नवीन उद्योगांना प्रोत्साहन मिळेलइनोव्हेशन म्हणजेच नवनिर्मितीस प्रोत्साहन देण्यासाठी प्रत्येक उद्योगाने इंनोव्हेशन ग्रुप तयार करून आउट आॅफ द बॉक्स विचार प्रणाली अंमलात आणावी. अशक्यप्राय वाटणाºया गोष्टी उद्योजक इनोव्हेशनद्वारे प्रत्यक्षात उतरवतील व डिफेन्स इनोव्हेशनद्वारे नवनिर्मितीस उत्सुक असलेल्या उद्योगांना प्रोत्साहन मिळेल. एचएएल व भारत इलेक्ट्रॉनिक्स यांची इनोव्हेशन हबमध्ये भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. त्यातून देशांतर्गत उत्पादन प्रक्रि येची भावी दिशा ठरणार असल्याचेही संजय जाजू यांनी सांगितले.

टॅग्स :Defenceसंरक्षण विभागGovernmentसरकार