शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
मुंबई, पुणे, कोल्हापूर, लातूरचे १०० जण अडकले नेपाळमध्ये; प्रवास टाळा, राज्यातील पर्यटकांना सरकारच्या सूचना 
3
नेपाळचं नेतृत्व करण्यास सज्ज झालेल्या सुशीला कार्की यांनी नरेंद्र मोदी आणि भारताबाबत केलं मोठं विधान, म्हणाल्या... 
4
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
5
भयंकर! ज्या प्रियकराच्या मदतीनं पतीच्या हत्येचा रचला कट; त्याचाच मृतेदह झाडाला लटकलेला आढळला
6
"त्यांचं रिलेशनशिप टॉक्झिक होतं", कुमार सानू आणि कुनिकाच्या अफेअरबद्दल लेक अयान म्हणाला- "आई आजही..."
7
"धोनीने मला 'सरडा' बनायला भाग पाडलं..."; दिनेश कार्तिकने सांगितलं टीम इंडियाचं मोठं गुपित
8
Stock Markets Today: सुस्त सुरुवातीनंतर शेअर बाजारात पुन्हा खरेदी, Nifty २५,००० च्या जवळ; Adani Ports, TCS, NTPC टॉप गेनर्स
9
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
10
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
11
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
13
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
14
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
15
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
16
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
17
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
18
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
19
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
20
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?

दोन शेतकऱ्यांच्या जिल्ह्यात आत्महत्त्या

By admin | Updated: June 28, 2016 01:06 IST

दोन शेतकऱ्यांच्या जिल्ह्यात आत्महत्त्या

नाशिक : जिल्ह्यात शेतकरी आत्महत्त्येच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून, सोमवारी पुन्हा त्र्यंबक व निफाड तालुक्यांतील दोघा शेतकऱ्यांनी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. चालू वर्षी आत्महत्त्या करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या ५२ वर पोहोचली असून, या वाढत्या घटनांनी प्रशासन चिंतित सापडले आहे. दशरथ त्र्यंबक भोये (४२) व शांताराम नथू वाजे (६०) असे या दोघांची नावे आहेत. भोये हे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील दलपतपूर येथील रहिवासी असून, त्यांच्या नावे दोन एकर जमीन आहे. नापिकी व आर्थिक विवंचनेतून २२ जून रोजी घरातच गळफास घेऊन त्यांनी आत्महत्त्या केली. दोन दिवसांनी त्यांच्या कुटुंबीयांनी प्रशासनाला याची माहिती दिली. तहसीलदारांनी त्यांच्या घरी भेट दिली असता, प्रथम दर्शनी कर्जबाजारीपणाला कंटाळूनच त्यांनी आत्महत्त्या केल्याचे सांगण्यात आले. दुसरी घटना निफाड तालुक्यातील श्रीरामपूर येथे घडली शांताराम वाजे यांनी मध्यरात्री राहत्या घरातच गळफास घेऊन आत्महत्त्या केली. वाजे यांच्या स्वत:च्या नावावर शेतजमीन नसली तरी, पत्नी रेखाबाई हिच्या नावावर ६२ आर इतकी जमीन आहे. दरम्यान, जिल्ह्यात आत्महत्त्या करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या सहा महिन्यांत ५२ इतकी झाली असून, दरमहिन्याला सरासरी सहा ते सात शेतकरी आत्महत्त्या करू लागल्याने प्रशासन चिंतित सापडले आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्त्या रोखण्यासाठी गावपातळीवर समुपदेशन शिबिरे घेतली जात आहेत. (प्रतिनिधी)