शहरं
Join us  
Trending Stories
1
“बोले तैसा चाले आहे की वाकडी यांची पाऊले ते कळेल”; निवृत्तीवरून ठाकरेंचा RSS-मोदींना टोला
2
"कमी जागा मिळो अथवा जास्त, मुख्यमंत्री नितीश कुमारच होणार", जदयूचा भाजपला स्पष्ट मेसेज, एनडीएमध्ये पेच
3
पाकिस्तान समर्थक जमात ए इस्लामीने बांगलादेशात दाखवली ताकद; देशात इस्लामिक राजवटीचे संकेत?
4
तेल ते टेलिकॉमपर्यंत... उद्योगपती मुकेश अंबानींचं साम्राज्य किती मोठं? इतक्या कंपनीचे आहेत मालक
5
महाराष्ट्रातील ४-५ मंत्र्यांना मिळणार डच्चू?; संजय राऊतांचा दावा, एका मंत्र्याचं नावही सांगितले
6
लँडिंगची तयारी अन् अचानक उड्डाण; दोन विमानांच्या २५ मिनिटे आकाशात! इंडिगोच्या विमानांमध्ये प्रवाशांचा थरकाप
7
शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित, कृषीमंत्री ‘रमी’ खेळण्यात मग्न; रोहित पवारांनी व्हिडिओच दाखवला
8
"दिवसाला ८ शेतकरी आत्महत्या अन् कृषिमंत्री विधानसभेत बसून रमी खेळतायेत, लाज वाटत नाही का?"
9
'स्लीपिंग प्रिन्स'ची २० वर्षांची लढाई संपली! वडिलांनी लाईफ सपोर्ट काढण्यास दिला होता नकार!
10
ओडिशात नराधमांनी किशोरवयीन मुलीला पेटवले, ७० टक्के भाजल्याने प्रकृती गंभीर
11
Live in Partner Murder: 'एएसआय' लिव्ह पार्टनरची हत्या, ज्या पोलीस ठाण्यात होती सेवेत तिथेच गेला शरण
12
भारत-पाकिस्तान सामना रद्द; तीव्र नाराजीनंतर WCL आयोजकांनी मागितली जाहीर माफी, म्हणाले...
13
विधानसभा विरोधी पक्षनेतेपद रिकामेच, आता नागपूर अधिवेशनापर्यंत प्रतीक्षा!
14
ठाकरे बंधू एकत्रच, कुणाला काय प्रॉब्लेम?, मी आणि राज एकत्र आल्यानं..."; उद्धव ठाकरे कडाडले
15
सभागृहाबाहेरच्या कारनाम्यांनी सरकारची अधिवेशनातील कामगिरी झाकोळली!
16
महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या निवडणुकीत 'सहकार पॅनेल'ची आघाडी: २१ पैकी ९ उमेदवार बिनविरोध
17
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘भक्तशिरोमणी संत श्री नामदेव महाराज पुरस्कार’ जाहीर
18
भारताची ताकद जग बघेल! शुभांशू शुक्लांच्या अनुभवातून गगनयानला बळ, स्वदेशी मोहिमेची तयारी
19
यूट्यूबवरून आयडिया मिळाली; क्यूआर कोड बदलून दुकानदारांची फसवणूक केली
20
ड्रग्ज विक्रीसाठी आलेले सहा जण अटकेत, ५४ लाख ४६ हजार रुपयांचा अमली पदार्थांचा साठा जप्त

दोन शेतकऱ्यांच्या जिल्ह्यात आत्महत्त्या

By admin | Updated: June 28, 2016 01:06 IST

दोन शेतकऱ्यांच्या जिल्ह्यात आत्महत्त्या

नाशिक : जिल्ह्यात शेतकरी आत्महत्त्येच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून, सोमवारी पुन्हा त्र्यंबक व निफाड तालुक्यांतील दोघा शेतकऱ्यांनी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. चालू वर्षी आत्महत्त्या करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या ५२ वर पोहोचली असून, या वाढत्या घटनांनी प्रशासन चिंतित सापडले आहे. दशरथ त्र्यंबक भोये (४२) व शांताराम नथू वाजे (६०) असे या दोघांची नावे आहेत. भोये हे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील दलपतपूर येथील रहिवासी असून, त्यांच्या नावे दोन एकर जमीन आहे. नापिकी व आर्थिक विवंचनेतून २२ जून रोजी घरातच गळफास घेऊन त्यांनी आत्महत्त्या केली. दोन दिवसांनी त्यांच्या कुटुंबीयांनी प्रशासनाला याची माहिती दिली. तहसीलदारांनी त्यांच्या घरी भेट दिली असता, प्रथम दर्शनी कर्जबाजारीपणाला कंटाळूनच त्यांनी आत्महत्त्या केल्याचे सांगण्यात आले. दुसरी घटना निफाड तालुक्यातील श्रीरामपूर येथे घडली शांताराम वाजे यांनी मध्यरात्री राहत्या घरातच गळफास घेऊन आत्महत्त्या केली. वाजे यांच्या स्वत:च्या नावावर शेतजमीन नसली तरी, पत्नी रेखाबाई हिच्या नावावर ६२ आर इतकी जमीन आहे. दरम्यान, जिल्ह्यात आत्महत्त्या करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या सहा महिन्यांत ५२ इतकी झाली असून, दरमहिन्याला सरासरी सहा ते सात शेतकरी आत्महत्त्या करू लागल्याने प्रशासन चिंतित सापडले आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्त्या रोखण्यासाठी गावपातळीवर समुपदेशन शिबिरे घेतली जात आहेत. (प्रतिनिधी)