शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
IPL 2025 Playoffs Race : आता ४ जागेसाठी ७ दावेदार! कोणत्या संघासाठी कसे आहे प्लेऑफ्सचे समीकरण?
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
5
दोन्ही दिल्लीकर एकाच क्रीजमध्ये; रन आउटसाठी स्टँडमध्ये काव्या मारनची 'दातओठ खात' तळमळ (VIDEO)
6
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
7
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
8
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
9
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
10
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
11
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
12
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
13
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
14
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
15
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
16
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
17
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
18
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
19
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
20
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला

दोन शेतकऱ्यांच्या जिल्ह्यात आत्महत्त्या

By admin | Updated: June 28, 2016 01:06 IST

दोन शेतकऱ्यांच्या जिल्ह्यात आत्महत्त्या

नाशिक : जिल्ह्यात शेतकरी आत्महत्त्येच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून, सोमवारी पुन्हा त्र्यंबक व निफाड तालुक्यांतील दोघा शेतकऱ्यांनी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. चालू वर्षी आत्महत्त्या करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या ५२ वर पोहोचली असून, या वाढत्या घटनांनी प्रशासन चिंतित सापडले आहे. दशरथ त्र्यंबक भोये (४२) व शांताराम नथू वाजे (६०) असे या दोघांची नावे आहेत. भोये हे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील दलपतपूर येथील रहिवासी असून, त्यांच्या नावे दोन एकर जमीन आहे. नापिकी व आर्थिक विवंचनेतून २२ जून रोजी घरातच गळफास घेऊन त्यांनी आत्महत्त्या केली. दोन दिवसांनी त्यांच्या कुटुंबीयांनी प्रशासनाला याची माहिती दिली. तहसीलदारांनी त्यांच्या घरी भेट दिली असता, प्रथम दर्शनी कर्जबाजारीपणाला कंटाळूनच त्यांनी आत्महत्त्या केल्याचे सांगण्यात आले. दुसरी घटना निफाड तालुक्यातील श्रीरामपूर येथे घडली शांताराम वाजे यांनी मध्यरात्री राहत्या घरातच गळफास घेऊन आत्महत्त्या केली. वाजे यांच्या स्वत:च्या नावावर शेतजमीन नसली तरी, पत्नी रेखाबाई हिच्या नावावर ६२ आर इतकी जमीन आहे. दरम्यान, जिल्ह्यात आत्महत्त्या करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या सहा महिन्यांत ५२ इतकी झाली असून, दरमहिन्याला सरासरी सहा ते सात शेतकरी आत्महत्त्या करू लागल्याने प्रशासन चिंतित सापडले आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्त्या रोखण्यासाठी गावपातळीवर समुपदेशन शिबिरे घेतली जात आहेत. (प्रतिनिधी)