शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जुलै महिन्यात बारा शेतकºयांच्या आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 01:12 IST

जिल्ह्यात यंदा मान्सूनचे वेळेवर आगमन होऊन जून व जुलै महिन्यात तो विक्रमी बरसल्यानंतरही जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबण्याची चिन्हे दिसत नसल्याने प्रशासन कोड्यात पडले असून, शेतकरी आत्महत्येमागची मुख्य कारणे शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे.

नाशिक : जिल्ह्यात यंदा मान्सूनचे वेळेवर आगमन होऊन जून व जुलै महिन्यात तो विक्रमी बरसल्यानंतरही जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबण्याची चिन्हे दिसत नसल्याने प्रशासन कोड्यात पडले असून, शेतकरी आत्महत्येमागची मुख्य कारणे शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे. एकट्या जुलै महिन्यात बारा शेतकºयांनी जीवनयात्रा संपविण्याची बाब अधिक गांभीर्याने घेण्यात आली आहे.जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र कायम असून, चालू वर्षी जुलैअखेर ६७ शेतकºयांनी आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे. कर्जबाजारीपणा व नापिकीला कंटाळूनच शेतकरी आत्महत्या करीत असल्याचे आजवरच्या चौकशीतून पुढे आले आहे. लहरी हवामान, मान्सूनच्या चुकलेल्या अंदाजामुळे निसर्गावर अवलंबून असलेल्या शेतकºयाच्या पदरी दरवर्षी निराशाच पडू लागल्याने त्याच्यावर कर्जाचा डोंगर दरवर्षी मोठा होऊ लागल्याने परिस्थितीला कंटाळून शेतकºयांनी आत्महत्येचा मार्ग जवळचा म्हणून पत्करला. गेल्या काही वर्षांत आकडेवारीत भरच पडत गेली असली तरी, गेल्या वर्षी जिल्ह्णात सरासरीपेक्षा अधिक पाऊस नोंदविला तरीही जवळपास ८७ शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहेत. चालू वर्षी आत्महत्येच्या प्रमाणात घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात असताना तीदेखील फोल ठरली आहे. जानेवारी महिन्यापासून दरमहा साधारणत: सहा ते सात शेतकरी आत्महत्या करीत आहेत. यंदा मान्सूनचे वेळेवर म्हणजेच जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनपूर्व पावसाचे आगमन झाले व त्यानंतर मान्सूनही वेळेवर दाखल झाला. जून महिन्यात सरासरीच्या ११३ टक्के इतकी पावसाची नोंद होऊन शेतकºयांनी पेरण्याही पूर्ण केल्या तर जुलै महिन्यातही सुरुवातीचा आठवडा सोडला तर पावसाने आपली हजेरी कायम ठेवली. जुलै महिन्यात १४७ टक्के इतक्या पावसाची नोंद करण्यात आली असली तरी, संपूर्ण महिन्यात जिल्ह्णातील बारा शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहेत. हा आकडा गेल्या सात महिन्यांतील सर्वाधिक असून, जिल्ह्णात पाऊस, पाणी मुबलक असतानाही शेतकºयांनी आत्महत्येचा टोकाचा मार्ग अवलंबिल्याने नेमके त्यामागच्या कारणांचा शोध घेतला जात आहे.