शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
2
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
3
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
4
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
5
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
6
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
7
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
8
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
9
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
10
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
11
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
12
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
13
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
14
LIC ने गुंतवणूकदारांना केले मालामाल; ५ दिवसात केली १७००० कोटींची कमाई...
15
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
16
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
17
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
18
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
19
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
20
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश

जुलै महिन्यात बारा शेतकºयांच्या आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 01:12 IST

जिल्ह्यात यंदा मान्सूनचे वेळेवर आगमन होऊन जून व जुलै महिन्यात तो विक्रमी बरसल्यानंतरही जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबण्याची चिन्हे दिसत नसल्याने प्रशासन कोड्यात पडले असून, शेतकरी आत्महत्येमागची मुख्य कारणे शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे.

नाशिक : जिल्ह्यात यंदा मान्सूनचे वेळेवर आगमन होऊन जून व जुलै महिन्यात तो विक्रमी बरसल्यानंतरही जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबण्याची चिन्हे दिसत नसल्याने प्रशासन कोड्यात पडले असून, शेतकरी आत्महत्येमागची मुख्य कारणे शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे. एकट्या जुलै महिन्यात बारा शेतकºयांनी जीवनयात्रा संपविण्याची बाब अधिक गांभीर्याने घेण्यात आली आहे.जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र कायम असून, चालू वर्षी जुलैअखेर ६७ शेतकºयांनी आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे. कर्जबाजारीपणा व नापिकीला कंटाळूनच शेतकरी आत्महत्या करीत असल्याचे आजवरच्या चौकशीतून पुढे आले आहे. लहरी हवामान, मान्सूनच्या चुकलेल्या अंदाजामुळे निसर्गावर अवलंबून असलेल्या शेतकºयाच्या पदरी दरवर्षी निराशाच पडू लागल्याने त्याच्यावर कर्जाचा डोंगर दरवर्षी मोठा होऊ लागल्याने परिस्थितीला कंटाळून शेतकºयांनी आत्महत्येचा मार्ग जवळचा म्हणून पत्करला. गेल्या काही वर्षांत आकडेवारीत भरच पडत गेली असली तरी, गेल्या वर्षी जिल्ह्णात सरासरीपेक्षा अधिक पाऊस नोंदविला तरीही जवळपास ८७ शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहेत. चालू वर्षी आत्महत्येच्या प्रमाणात घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात असताना तीदेखील फोल ठरली आहे. जानेवारी महिन्यापासून दरमहा साधारणत: सहा ते सात शेतकरी आत्महत्या करीत आहेत. यंदा मान्सूनचे वेळेवर म्हणजेच जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनपूर्व पावसाचे आगमन झाले व त्यानंतर मान्सूनही वेळेवर दाखल झाला. जून महिन्यात सरासरीच्या ११३ टक्के इतकी पावसाची नोंद होऊन शेतकºयांनी पेरण्याही पूर्ण केल्या तर जुलै महिन्यातही सुरुवातीचा आठवडा सोडला तर पावसाने आपली हजेरी कायम ठेवली. जुलै महिन्यात १४७ टक्के इतक्या पावसाची नोंद करण्यात आली असली तरी, संपूर्ण महिन्यात जिल्ह्णातील बारा शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहेत. हा आकडा गेल्या सात महिन्यांतील सर्वाधिक असून, जिल्ह्णात पाऊस, पाणी मुबलक असतानाही शेतकºयांनी आत्महत्येचा टोकाचा मार्ग अवलंबिल्याने नेमके त्यामागच्या कारणांचा शोध घेतला जात आहे.