शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

जुलै महिन्यात बारा शेतकºयांच्या आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 01:12 IST

जिल्ह्यात यंदा मान्सूनचे वेळेवर आगमन होऊन जून व जुलै महिन्यात तो विक्रमी बरसल्यानंतरही जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबण्याची चिन्हे दिसत नसल्याने प्रशासन कोड्यात पडले असून, शेतकरी आत्महत्येमागची मुख्य कारणे शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे.

नाशिक : जिल्ह्यात यंदा मान्सूनचे वेळेवर आगमन होऊन जून व जुलै महिन्यात तो विक्रमी बरसल्यानंतरही जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबण्याची चिन्हे दिसत नसल्याने प्रशासन कोड्यात पडले असून, शेतकरी आत्महत्येमागची मुख्य कारणे शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे. एकट्या जुलै महिन्यात बारा शेतकºयांनी जीवनयात्रा संपविण्याची बाब अधिक गांभीर्याने घेण्यात आली आहे.जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र कायम असून, चालू वर्षी जुलैअखेर ६७ शेतकºयांनी आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे. कर्जबाजारीपणा व नापिकीला कंटाळूनच शेतकरी आत्महत्या करीत असल्याचे आजवरच्या चौकशीतून पुढे आले आहे. लहरी हवामान, मान्सूनच्या चुकलेल्या अंदाजामुळे निसर्गावर अवलंबून असलेल्या शेतकºयाच्या पदरी दरवर्षी निराशाच पडू लागल्याने त्याच्यावर कर्जाचा डोंगर दरवर्षी मोठा होऊ लागल्याने परिस्थितीला कंटाळून शेतकºयांनी आत्महत्येचा मार्ग जवळचा म्हणून पत्करला. गेल्या काही वर्षांत आकडेवारीत भरच पडत गेली असली तरी, गेल्या वर्षी जिल्ह्णात सरासरीपेक्षा अधिक पाऊस नोंदविला तरीही जवळपास ८७ शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहेत. चालू वर्षी आत्महत्येच्या प्रमाणात घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात असताना तीदेखील फोल ठरली आहे. जानेवारी महिन्यापासून दरमहा साधारणत: सहा ते सात शेतकरी आत्महत्या करीत आहेत. यंदा मान्सूनचे वेळेवर म्हणजेच जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनपूर्व पावसाचे आगमन झाले व त्यानंतर मान्सूनही वेळेवर दाखल झाला. जून महिन्यात सरासरीच्या ११३ टक्के इतकी पावसाची नोंद होऊन शेतकºयांनी पेरण्याही पूर्ण केल्या तर जुलै महिन्यातही सुरुवातीचा आठवडा सोडला तर पावसाने आपली हजेरी कायम ठेवली. जुलै महिन्यात १४७ टक्के इतक्या पावसाची नोंद करण्यात आली असली तरी, संपूर्ण महिन्यात जिल्ह्णातील बारा शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहेत. हा आकडा गेल्या सात महिन्यांतील सर्वाधिक असून, जिल्ह्णात पाऊस, पाणी मुबलक असतानाही शेतकºयांनी आत्महत्येचा टोकाचा मार्ग अवलंबिल्याने नेमके त्यामागच्या कारणांचा शोध घेतला जात आहे.