शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

शहरात वेगवेगळ्या घटनांमध्ये तिघांची गळफास घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 00:18 IST

शहर परिसरात वेगवेगळ्या घटनांमध्ये तिघांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले आहे़ यामध्ये दोन पुरुष व एका वृद्ध महिलेचा समावेश आहे़

नाशिक : शहर परिसरात वेगवेगळ्या घटनांमध्ये तिघांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले आहे़ यामध्ये दोन पुरुष व एका वृद्ध महिलेचा समावेश आहे़ भारतनगरमधील सकुबाई काशीनाथ काळे (७३, भारतनगर, शिवाजीवाडी झोपडपट्टी, नाशिक) या वृद्ध महिलेने रविवारी (दि.२२) राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली़ आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. मुंबई नाका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़आत्महत्येची दुसरी घटना मखमलाबाद रस्त्यावरील शांतीनगर, रामकृष्णनगरमध्ये घडली़ प्रकाश वसंत म्हस्के (४२, रा़ साईलीला बंगला, फ्लॅट नंबर ६) यांनी शनिवारी (दि़२१) रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास बंगल्याच्या टेरेसवरील पाण्याच्या टाकीच्या पाइपला नायलॉन दोरीद्वारे गळफास घेऊन आत्महत्या केली़ ही बाब कुटुंबीयांना समजताच त्यांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाºयांनी तपासून मयत घोषित केले़ दरम्यान आत्महत्येचे कारण समजू शकले नसून म्हसरूळ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़  आत्महत्येची तिसरी घटना इंदिरानगरमधील श्री गुरुदत्त हौसिंग सोसायटीत घडली़ शरद लहानू दाते (५१) यांनी शनिवारी (दि़२१) रात्री सव्वाआठ वाजेच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली़ ही बाब कुटुंबीयांना समजताच त्यांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाºयांनी तपासून मयत घोषित केले़दरम्यान आत्महत्येचे कारण समजू शकले नसून, इंदिरानगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़