शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

प्रेमीयुगुलाची गळफास घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2020 22:48 IST

बागलाण तालुक्याच्या आदिवासी पट्ट्यातील पठावे येथे प्रेमीयुगुलाने आंब्याच्या झाडाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी (दि.२४) उघडकीस आली. रवींद्र पोपट पवार (२२) व सावरगाव येथील पूजा बंडू गांगुर्डे (१८) अशी मयतांची नावे आहेत. रवींद्र या तरुणास हळदीच्याच दिवशी अग्निडाग देण्याचा दुर्दैवी प्रसंग पित्यावर आला.

ठळक मुद्देपठावे : तरुणास हळदीच्याच दिवशी अग्निडाग देण्याची वेळ

तळवाडे दिगर : बागलाण तालुक्याच्या आदिवासी पट्ट्यातील पठावे येथे प्रेमीयुगुलाने आंब्याच्या झाडाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी (दि.२४) उघडकीस आली. रवींद्र पोपट पवार (२२) व सावरगाव येथील पूजा बंडू गांगुर्डे (१८) अशी मयतांची नावे आहेत. रवींद्र या तरुणास हळदीच्याच दिवशी अग्निडाग देण्याचा दुर्दैवी प्रसंग पित्यावर आला.रवींद्रच्या घरी लग्नाची धामधूम सुरू होती. त्याच्या हळदीसाठी व मांडवासाठी आंब्याचे डहाळे तोडायला गेलेल्या मंडळींनी दोघांचे मृतदेह आंब्याच्या झाडाला लटकलेले पाहिले. ही माहिती रवींद्रच्या वडिलांना समजताच त्यांनी हंबरडा फोडला. घरात लग्नाच्या निमित्ताने मंगलमय वातावरण असताना क्षणार्धात सर्वत्र स्मशानशांतता पसरली.पोलीसपाटील दयाराम पवार यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करून सटाणा पोलीस स्टेशनला दूरध्वनीवरून खबर दिली. पोलीस उपनिरीक्षक किरण पाटील, हवालदार प्रकाश जाधव, पोलीस नाईक जयंतसिंग सोळंके आदी घटनास्थळी दाखल झाले. गावकऱ्यांच्या मदतीने दोघांचे पार्थिव झाडावरून उतरवण्यात आले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले.अधिक तपास पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार प्रकाश जाधव करत आहेत.मागील काही वर्षांपासून पठावे दिगर परिसरात प्रेमीयुगुलांच्या आत्महत्या घडत आहेत. यामुळे परिसराची बदनामी होत आहे. पोलीस यंत्रणेमार्फत तसेच विविध स्वयंसेवी संस्थांमार्फत या घटनांना आळा घालण्यासाठी परिवर्तनाचे उपक्रम राबवावेत, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

रवींद्र हा माझा एकुलता एक मुलगा होता. लहानपणापासून लाडाकोडात वाढवला. कटकसरीने संसाराचा गाडा ओढत त्याच्या हौसेप्रमाणे त्याच्यासाठी घर, कांद्याच्या चाळी, वेल्डिंगचे मशीन, बागायत शेती उभी केली. भलामोठा कर्जाचा डोंगर असल्यामुळे आम्ही पती-पत्नी रात्रंदिवस शेतात राबत होतो. रवींद्रही कष्टाळू होता. त्याचे दोनाचे चार झाले की आम्ही एका जबाबदारीतून मुक्त होऊ असे वाटत होते. पण नियतीच्या मनात काय दडले होते कुणास ठाऊक? त्याचे हळदीने अंग पिवळे करण्याअगोदरच त्याला अग्निडाग देण्याची दुर्दैवी वेळ आली.- पोपट पवार, (रवींद्रचे वडील)

टॅग्स :Suicideआत्महत्याDeathमृत्यू