शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
9
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
10
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
11
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
12
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
15
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
16
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
17
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
18
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
19
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
20
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...

रेशनवर दिवाळीसाठी साखर, मीठ उपलब्ध

By श्याम बागुल | Updated: November 3, 2018 15:20 IST

खुल्या बाजारात साखरेचे भाव ३५ रुपयांपर्यंत गेल्याने यंदा गोरगरिबांची दिवाळी साखरेविनाच साजरी करण्याची वेळ आलेली असताना राज्य सरकारने यंदा मात्र खुल्या बाजारातून साखर खरेदी करून ती रेशनवर प्रत्येक शिधापत्रिकाधारकाला एक किलोप्रमाणे वाटप करण्याचे ठरविले आहे. यापूर्वी केंद्र सरकारकडून राज्य सरकारला लेव्हीची साखर उपलब्ध

नाशिक : राज्य सरकारने गोरगरिबांची दिवाळी गोड करण्यासाठी रेशनमधून प्रत्येक शिधापत्रिकेवर एक किलो साखर देण्याचा निर्णय घेऊन त्यानुसार नाशिक जिल्ह्यासाठी सुमारे १० हजार क्विंटलहून अधिक साखर उपलब्ध करून दिली असून, त्याच बरोबर रेशनमधून ‘टाटा नमक’ देण्यासही चालू महिन्यापासून सुरुवात करण्यात येणार आहे. त्यासाठी मालेगाव शहरासाठी अडीचशे क्विंटल मीठ पाठविण्यात आले आहे. जिल्ह्याच्या अन्य भागात टप्पाटप्प्याने मीठ उपलब्ध करून देण्यात येईल.खुल्या बाजारात साखरेचे भाव ३५ रुपयांपर्यंत गेल्याने यंदा गोरगरिबांची दिवाळी साखरेविनाच साजरी करण्याची वेळ आलेली असताना राज्य सरकारने यंदा मात्र खुल्या बाजारातून साखर खरेदी करून ती रेशनवर प्रत्येक शिधापत्रिकाधारकाला एक किलोप्रमाणे वाटप करण्याचे ठरविले आहे. यापूर्वी केंद्र सरकारकडून राज्य सरकारला लेव्हीची साखर उपलब्ध करून दिली जात असे व दसरा-दिवाळी सणाला प्रती मानसी साडेपाचशे ग्रॅम साखर दिली जात होती. गेल्या चार वर्षांपासून सरकारने ही योजनाच बंद केल्यामुळे आगामी वर्ष निवडणुकीचे असल्याकारणाने यंदा राज्य सरकारने आपल्या अखत्यारित साखर देण्याचा निर्णय घेतला. प्रति किलो २० रुपये या दराने प्रत्येक शिधापत्रिकाधारकाला साखर देण्यासाठी नाशिक जिल्ह्यात प्राधान्य कुटुंबीयांसाठी ५७१० क्विंटल, तर अन्नपूर्णा, अंत्योदय योजनेसाठी ५३२९ क्विंटल नियतन मंजूर केले आहे. नोव्हेंबर महिन्यात या साखरेचे रेशनमधून वितरण करण्यात येणार असल्याचे पुरवठा खात्याने म्हटले आहे. नाशिक जिल्ह्यात सुमारे साडेसात लाख शिधापत्रिकाधारक असून, या सर्वांना ही साखर दिली जाणार आहे.साखरेबरोबरच रेशनमधून मीठ देण्याचाही निर्णय अन्न व नागरी पुरवठा विभागाने घेतला आहे. महिला व बालकांच्या रक्तात लोहाचे प्रमाण कमी असल्यामुळे त्यांना अन्नातून आयोडीन व लोहयुक्त मीठ देण्यासाठी राज्य सरकारने ‘टाटा नमक’शी करार केला आहे. सरकार १४ रुपये दराने मीठ खरेदी करणार असून, शिधापत्रिकाधारकांना अकरा रुपये दराने विक्री करण्यात येणार आहे. गेल्या महिन्यात पुरवठामंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते मीठ वाटपाचा शुभारंभ करण्यात आला होता. नाशिक जिल्ह्यासाठी एक हजार क्विंटलची मागणी नोंदविण्यात आली असून, त्यापैकी फक्त अडीचशे क्विंटल मीठ उपलब्ध झाले आहे. सदरचे मीठ सध्या मालेगाव शहरासाठी देण्यात आले असून, उर्वरित मीठ उपलब्ध होताच जिल्ह्यातील अन्य तालुक्यांमध्ये ते वितरीत करण्यात येणार आहे.

टॅग्स :GovernmentसरकारNashikनाशिक