शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
5
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
6
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
7
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
8
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
9
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
10
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
11
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
12
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
13
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
14
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
15
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
16
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
17
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
18
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
19
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
20
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 

रेशनवर दिवाळीसाठी साखर, मीठ उपलब्ध

By श्याम बागुल | Updated: November 3, 2018 15:20 IST

खुल्या बाजारात साखरेचे भाव ३५ रुपयांपर्यंत गेल्याने यंदा गोरगरिबांची दिवाळी साखरेविनाच साजरी करण्याची वेळ आलेली असताना राज्य सरकारने यंदा मात्र खुल्या बाजारातून साखर खरेदी करून ती रेशनवर प्रत्येक शिधापत्रिकाधारकाला एक किलोप्रमाणे वाटप करण्याचे ठरविले आहे. यापूर्वी केंद्र सरकारकडून राज्य सरकारला लेव्हीची साखर उपलब्ध

नाशिक : राज्य सरकारने गोरगरिबांची दिवाळी गोड करण्यासाठी रेशनमधून प्रत्येक शिधापत्रिकेवर एक किलो साखर देण्याचा निर्णय घेऊन त्यानुसार नाशिक जिल्ह्यासाठी सुमारे १० हजार क्विंटलहून अधिक साखर उपलब्ध करून दिली असून, त्याच बरोबर रेशनमधून ‘टाटा नमक’ देण्यासही चालू महिन्यापासून सुरुवात करण्यात येणार आहे. त्यासाठी मालेगाव शहरासाठी अडीचशे क्विंटल मीठ पाठविण्यात आले आहे. जिल्ह्याच्या अन्य भागात टप्पाटप्प्याने मीठ उपलब्ध करून देण्यात येईल.खुल्या बाजारात साखरेचे भाव ३५ रुपयांपर्यंत गेल्याने यंदा गोरगरिबांची दिवाळी साखरेविनाच साजरी करण्याची वेळ आलेली असताना राज्य सरकारने यंदा मात्र खुल्या बाजारातून साखर खरेदी करून ती रेशनवर प्रत्येक शिधापत्रिकाधारकाला एक किलोप्रमाणे वाटप करण्याचे ठरविले आहे. यापूर्वी केंद्र सरकारकडून राज्य सरकारला लेव्हीची साखर उपलब्ध करून दिली जात असे व दसरा-दिवाळी सणाला प्रती मानसी साडेपाचशे ग्रॅम साखर दिली जात होती. गेल्या चार वर्षांपासून सरकारने ही योजनाच बंद केल्यामुळे आगामी वर्ष निवडणुकीचे असल्याकारणाने यंदा राज्य सरकारने आपल्या अखत्यारित साखर देण्याचा निर्णय घेतला. प्रति किलो २० रुपये या दराने प्रत्येक शिधापत्रिकाधारकाला साखर देण्यासाठी नाशिक जिल्ह्यात प्राधान्य कुटुंबीयांसाठी ५७१० क्विंटल, तर अन्नपूर्णा, अंत्योदय योजनेसाठी ५३२९ क्विंटल नियतन मंजूर केले आहे. नोव्हेंबर महिन्यात या साखरेचे रेशनमधून वितरण करण्यात येणार असल्याचे पुरवठा खात्याने म्हटले आहे. नाशिक जिल्ह्यात सुमारे साडेसात लाख शिधापत्रिकाधारक असून, या सर्वांना ही साखर दिली जाणार आहे.साखरेबरोबरच रेशनमधून मीठ देण्याचाही निर्णय अन्न व नागरी पुरवठा विभागाने घेतला आहे. महिला व बालकांच्या रक्तात लोहाचे प्रमाण कमी असल्यामुळे त्यांना अन्नातून आयोडीन व लोहयुक्त मीठ देण्यासाठी राज्य सरकारने ‘टाटा नमक’शी करार केला आहे. सरकार १४ रुपये दराने मीठ खरेदी करणार असून, शिधापत्रिकाधारकांना अकरा रुपये दराने विक्री करण्यात येणार आहे. गेल्या महिन्यात पुरवठामंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते मीठ वाटपाचा शुभारंभ करण्यात आला होता. नाशिक जिल्ह्यासाठी एक हजार क्विंटलची मागणी नोंदविण्यात आली असून, त्यापैकी फक्त अडीचशे क्विंटल मीठ उपलब्ध झाले आहे. सदरचे मीठ सध्या मालेगाव शहरासाठी देण्यात आले असून, उर्वरित मीठ उपलब्ध होताच जिल्ह्यातील अन्य तालुक्यांमध्ये ते वितरीत करण्यात येणार आहे.

टॅग्स :GovernmentसरकारNashikनाशिक