शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

रेशनवर दिवाळीसाठी साखर, मीठ उपलब्ध

By श्याम बागुल | Updated: November 3, 2018 15:20 IST

खुल्या बाजारात साखरेचे भाव ३५ रुपयांपर्यंत गेल्याने यंदा गोरगरिबांची दिवाळी साखरेविनाच साजरी करण्याची वेळ आलेली असताना राज्य सरकारने यंदा मात्र खुल्या बाजारातून साखर खरेदी करून ती रेशनवर प्रत्येक शिधापत्रिकाधारकाला एक किलोप्रमाणे वाटप करण्याचे ठरविले आहे. यापूर्वी केंद्र सरकारकडून राज्य सरकारला लेव्हीची साखर उपलब्ध

नाशिक : राज्य सरकारने गोरगरिबांची दिवाळी गोड करण्यासाठी रेशनमधून प्रत्येक शिधापत्रिकेवर एक किलो साखर देण्याचा निर्णय घेऊन त्यानुसार नाशिक जिल्ह्यासाठी सुमारे १० हजार क्विंटलहून अधिक साखर उपलब्ध करून दिली असून, त्याच बरोबर रेशनमधून ‘टाटा नमक’ देण्यासही चालू महिन्यापासून सुरुवात करण्यात येणार आहे. त्यासाठी मालेगाव शहरासाठी अडीचशे क्विंटल मीठ पाठविण्यात आले आहे. जिल्ह्याच्या अन्य भागात टप्पाटप्प्याने मीठ उपलब्ध करून देण्यात येईल.खुल्या बाजारात साखरेचे भाव ३५ रुपयांपर्यंत गेल्याने यंदा गोरगरिबांची दिवाळी साखरेविनाच साजरी करण्याची वेळ आलेली असताना राज्य सरकारने यंदा मात्र खुल्या बाजारातून साखर खरेदी करून ती रेशनवर प्रत्येक शिधापत्रिकाधारकाला एक किलोप्रमाणे वाटप करण्याचे ठरविले आहे. यापूर्वी केंद्र सरकारकडून राज्य सरकारला लेव्हीची साखर उपलब्ध करून दिली जात असे व दसरा-दिवाळी सणाला प्रती मानसी साडेपाचशे ग्रॅम साखर दिली जात होती. गेल्या चार वर्षांपासून सरकारने ही योजनाच बंद केल्यामुळे आगामी वर्ष निवडणुकीचे असल्याकारणाने यंदा राज्य सरकारने आपल्या अखत्यारित साखर देण्याचा निर्णय घेतला. प्रति किलो २० रुपये या दराने प्रत्येक शिधापत्रिकाधारकाला साखर देण्यासाठी नाशिक जिल्ह्यात प्राधान्य कुटुंबीयांसाठी ५७१० क्विंटल, तर अन्नपूर्णा, अंत्योदय योजनेसाठी ५३२९ क्विंटल नियतन मंजूर केले आहे. नोव्हेंबर महिन्यात या साखरेचे रेशनमधून वितरण करण्यात येणार असल्याचे पुरवठा खात्याने म्हटले आहे. नाशिक जिल्ह्यात सुमारे साडेसात लाख शिधापत्रिकाधारक असून, या सर्वांना ही साखर दिली जाणार आहे.साखरेबरोबरच रेशनमधून मीठ देण्याचाही निर्णय अन्न व नागरी पुरवठा विभागाने घेतला आहे. महिला व बालकांच्या रक्तात लोहाचे प्रमाण कमी असल्यामुळे त्यांना अन्नातून आयोडीन व लोहयुक्त मीठ देण्यासाठी राज्य सरकारने ‘टाटा नमक’शी करार केला आहे. सरकार १४ रुपये दराने मीठ खरेदी करणार असून, शिधापत्रिकाधारकांना अकरा रुपये दराने विक्री करण्यात येणार आहे. गेल्या महिन्यात पुरवठामंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते मीठ वाटपाचा शुभारंभ करण्यात आला होता. नाशिक जिल्ह्यासाठी एक हजार क्विंटलची मागणी नोंदविण्यात आली असून, त्यापैकी फक्त अडीचशे क्विंटल मीठ उपलब्ध झाले आहे. सदरचे मीठ सध्या मालेगाव शहरासाठी देण्यात आले असून, उर्वरित मीठ उपलब्ध होताच जिल्ह्यातील अन्य तालुक्यांमध्ये ते वितरीत करण्यात येणार आहे.

टॅग्स :GovernmentसरकारNashikनाशिक